शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

अंतर्युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:55 IST

प्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली.

- डॉ भूषण कुमार उपाध्यायप्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली. आज संपूर्ण जग हे या धोक्याचा सामना करीत आहे, जर परमाणु हत्यारांचा वापर झाला तर संपूर्ण जग नष्ट होईल. बाहेरचे युद्ध हे मानवाच्या मनात चालणाऱ्या युद्धाचा प्रतिध्वनी आहे. सर्वात प्रथम हे युद्ध मानवाच्या मनात उत्पन्न होते व नंतर ते भौतिक जगामध्ये प्रकट होते. शेवटी जर बाहेरच्या युद्धाला नियंत्रित करावयाचे असेल तर सर्वप्रथम मनामध्ये चालणाºया युद्धाला नियंत्रित करणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की भारतीय तत्त्वज्ञांनी बाहेरील युद्ध व हिंसेला मनाच्या वृत्तीचे प्रतिरूप म्हटले आहे. भारतीय योग व अध्यात्मशास्त्रामध्ये मनाच्या या वृत्तीची अतिशय खोलवर चर्चा झालेली आहे. या तत्त्वज्ञांचे असे म्हणणे आहे की मनामध्ये सात्विक वृत्ती असेल तर मानवाची वाणी व त्याचे कर्म सात्विक व चांगले असतात. मनाच्या वृत्तीला कसे शुद्ध बनविले पाहिजे व त्याला कसे नियंत्रित करून रंजनात्मक कार्यामध्ये गुंतविले गेले पाहिजे यासाठी भारत वर्षामध्ये विचारवंतानी एक महत्त्वपूर्ण शास्त्र विकसित केले आहे त्याला योगशास्त्र या नावाने ओळखले जाते. चित्ताच्या वृत्तीचा निरोध व मानवाची चेतना त्या परमचेतनेशी जोडणे हा योगाचा प्रमुख उद्देश आहे. जेव्हा मानवाची चेतना विस्तृत होऊन त्या परमचेतनेशी जोडली जाते, तेव्हा मानवाच्या मनात एकत्वाचा भाव निर्माण होतो. सध्या योगासंदर्भात अनेक वैज्ञानिक प्रयोग झाले आहेत, या प्रयोगातून असे निष्पन्न झाले आहे की शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबरोबरच मानवाच्या मनात एक वैश्विक भाव निर्माण होतो. जर आपल्याला मानव समाजातील हिंसेला कमी करावयाचे आहे व युद्धाला थांबवायचे आहे तर मानवाच्या मनाचे शुद्धीकरण होणे आवश्यक आहे व त्यासाठी योग हा एक सशक्त उपाय आहे.

टॅग्स :warयुद्धnewsबातम्या