शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अंतर्युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:55 IST

प्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली.

- डॉ भूषण कुमार उपाध्यायप्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली. आज संपूर्ण जग हे या धोक्याचा सामना करीत आहे, जर परमाणु हत्यारांचा वापर झाला तर संपूर्ण जग नष्ट होईल. बाहेरचे युद्ध हे मानवाच्या मनात चालणाऱ्या युद्धाचा प्रतिध्वनी आहे. सर्वात प्रथम हे युद्ध मानवाच्या मनात उत्पन्न होते व नंतर ते भौतिक जगामध्ये प्रकट होते. शेवटी जर बाहेरच्या युद्धाला नियंत्रित करावयाचे असेल तर सर्वप्रथम मनामध्ये चालणाºया युद्धाला नियंत्रित करणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की भारतीय तत्त्वज्ञांनी बाहेरील युद्ध व हिंसेला मनाच्या वृत्तीचे प्रतिरूप म्हटले आहे. भारतीय योग व अध्यात्मशास्त्रामध्ये मनाच्या या वृत्तीची अतिशय खोलवर चर्चा झालेली आहे. या तत्त्वज्ञांचे असे म्हणणे आहे की मनामध्ये सात्विक वृत्ती असेल तर मानवाची वाणी व त्याचे कर्म सात्विक व चांगले असतात. मनाच्या वृत्तीला कसे शुद्ध बनविले पाहिजे व त्याला कसे नियंत्रित करून रंजनात्मक कार्यामध्ये गुंतविले गेले पाहिजे यासाठी भारत वर्षामध्ये विचारवंतानी एक महत्त्वपूर्ण शास्त्र विकसित केले आहे त्याला योगशास्त्र या नावाने ओळखले जाते. चित्ताच्या वृत्तीचा निरोध व मानवाची चेतना त्या परमचेतनेशी जोडणे हा योगाचा प्रमुख उद्देश आहे. जेव्हा मानवाची चेतना विस्तृत होऊन त्या परमचेतनेशी जोडली जाते, तेव्हा मानवाच्या मनात एकत्वाचा भाव निर्माण होतो. सध्या योगासंदर्भात अनेक वैज्ञानिक प्रयोग झाले आहेत, या प्रयोगातून असे निष्पन्न झाले आहे की शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबरोबरच मानवाच्या मनात एक वैश्विक भाव निर्माण होतो. जर आपल्याला मानव समाजातील हिंसेला कमी करावयाचे आहे व युद्धाला थांबवायचे आहे तर मानवाच्या मनाचे शुद्धीकरण होणे आवश्यक आहे व त्यासाठी योग हा एक सशक्त उपाय आहे.

टॅग्स :warयुद्धnewsबातम्या