शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पर्यावरण संवर्धनासाठी विज्ञाननिष्ठेचा आग्रह धरा, शिक्षण मंत्री तावडे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:03 AM

पर्यावरण संवर्धन हा सध्या जगभर कळीचा मुद्दा झाला आहे. महाराष्ट्र सरकारही पर्यावरणाच्या रक्षणासाठी आग्रही आहे. निदान तसे दाखविण्याचा प्रयत्न तरी असतो.

पर्यावरण संवर्धन हा सध्या जगभर कळीचा मुद्दा झाला आहे. महाराष्ट्र सरकारही पर्यावरणाच्या रक्षणासाठी आग्रही आहे. निदान तसे दाखविण्याचा प्रयत्न तरी असतो. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव हा येथील समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र उत्सवाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार त्यात शिरले. ध्वनिप्रदूषण हा असाच एक प्रकार. कोल्हापूर विभागात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणपती मंडळे व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने यंदा ‘डीजे’मुक्त विसर्जन मिरवणुका यशस्वीपणे पार पडल्या. एकीकडे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला असताना विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश पुणे उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिल्याचे उघड झाले. लोकमतनेच सर्वप्रथम त्याचे वृत्त दिले. एका हिंदुत्ववादी संघटनेने कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे धार्मिकतेशी विसंगत आहे. महाविद्यालयातील तरुण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी लोकांवर दबाब टाकतात. त्यांना मनाई करण्यात यावी, असे धक्कादायक पत्र शिक्षण विभागाला दिले. त्यावर उच्च शिक्षण सहसंचालकांनी सारासार विचार न करता तातडीने पत्र जारी करत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जनापासून दूर राहण्यास सांगितले. राज्य सरकार एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कृत्रिम कुंडात गणेश विसर्जन केले. मात्र शिक्षक विभागाच्या पत्राने शासनाच्या धोरणालाच हरताळ फासला. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाºयांसह इतर सामाजिक संस्था, संघटनांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला. त्याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने दखल घेत परिपत्रक रद्द तर केलेच मात्र संबंधित अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावली. कोणत्या अधिकारात हा निर्णय घेतला, याचा त्यांनी खुलासा मागविला आहे. महाराष्टÑ सरकार पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर हिंदुत्ववादी संघटनेला त्यावर राजकारण करायचे असल्यास त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे किंवा संयुक्त राष्टÑात जावे, असा उपरोधिक टोलाही लगावला. मी स्वत: पर्यावरणपूरक पद्धतीने घरातच गणपती विसर्जन करतो. धर्माच्या नावाखाली पर्यावरणाशी खेळण्याचा कुणाला अधिकार नाही, हे तावडे यांनी स्पष्ट केले. देशातील सध्याचे कलुषित सामाजिक वातावरण पाहता भाजपाच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतलेली ही कठोर भूमिका निश्चितच अभिनंदनीय आहे.

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव