शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

आतले व बाहेरचे

By admin | Updated: December 22, 2015 02:18 IST

पूर्वीचा जनसंघ आणि आताचा त्याचा भाजपावतार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती असून संघाचा राजकारणाशी संबंध नसून ती केवळ एक सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगणे ही शुद्ध थाप आहे.

पूर्वीचा जनसंघ आणि आताचा त्याचा भाजपावतार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती असून संघाचा राजकारणाशी संबंध नसून ती केवळ एक सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगणे ही शुद्ध थाप आहे. भाजपाने संघाच्या नियंत्रणात राहून काम करणे हे संघाच्या परिवाराने गृहीतच धरले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या काळात भाजपाच्या आमदारांनी संघ स्थानावर जाऊन तेथील वडिलधाऱ्यांचे राजकारण कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन घेणे व त्याबरहुकूम ते करणे हेही त्या परिवाराला त्याचमुळे अपेक्षित आहे. मात्र जे कार्यकर्ते संघाबाहेरून भाजपात आले आहेत त्यांना हे समजणे अजून बाकी आहे. वाजपेयींच्या कार्यकाळात याविषयीचा आग्रह धरला गेला नव्हता. नरेंद्र मोदींच्या काळात मात्र संघाने त्याविषयीचा आपला आग्रह आणि दबाव वाढविला आहे. मागल्या वर्षी झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनच्या वेळी भाजपाच्या आमदारांना संघस्थानावर बोलवून संघाच्या नेतृत्वाने त्यांचा अभ्यास घेतला होता. तोच प्रकार याहीवेळी झाला तेव्हा भाजपाचे २२ आमदार त्या बौद्धिक वर्गाकडे फिरकले नाहीत. हा प्रकार तपशीलाने सांगण्याचे कारण संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे, या संघाच्या घोषवाक्याचे खोटेपण स्पष्ट करणे हे आहे. काही काळापूर्वी दूरचित्रवाहिनीवर झालेल्या एका चर्चेत ‘संघ ही सांस्कृतिक संघटना असून तिचा भाजपाच्या राजकारणाशी वा तिच्या राजकीय कार्यक्रमाशी काहीएक संबंध नसल्याचे’ त्या पक्षाचे एक जुने आमदार व प्रवक्ते ठासून सांगताना दिसले. १९७७ मध्ये मधु लिमयांनी तेव्हाच्या जनता पक्षात सामील झालेल्या जनसंघातील लोकांच्या दुहेरी सदस्यत्वाचा (जनता पक्ष आणि संघ यांच्या) वाद पुढे आणला तेव्हा त्यांनाच ‘पक्ष फोडण्याच्या कारवायांसाठी’ अनेकांनी दोष दिला होता. वास्तव हे की जनसंघावरच्या संघाच्या वर्चस्वाचे वास्तव लिमयांना तेव्हा व त्या अगोदरही ठाऊक होते. भाजपात संघातून आलेले व संघाबाहेरून आलेले असे दोन तट आरंभापासूनच आहेत. संघाचा आताचा प्रयत्न, पक्षातून निवडून आलेले आमचे व आमचे नसलेले असे सारेच आमचे असावे असा आहे. त्यामुळे संघाच्या ताब्यात जाऊ न इच्छिणाऱ्यांनी अशा संघटनातील प्रवेशाबाबत आरंभीच सावध होणे गरजेचे आहे. भाजपा किंवा विद्यार्थी परिषद यातील प्रवेश हा त्या संघटनांपुरताच मर्यादित राहत नाही. तो त्यांना थेट संघस्थानावर पोहचवित असतो. आरंभीच्या प्रवेशद्वारी तसे सांगण्याची व्यवस्था त्यात नाही. मात्र ती नसणे हा सोयीएवढाच राजकारणाचाही भाग आहे. पुढच्या प्रवासाची पूर्वकल्पना नसलेले कारणे दर्शवा नोटीसा मिळालेल्यातील अनेकजण त्यामुळे संभ्रमात आहेत. मात्र त्यांना मिळालेल्या नोटिशीमुळे यापुढले लोकही आवश्यक तो धडा घेतील आणि शिस्तीत वागतील हे अपेक्षित आहे.