शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 06:19 IST

लेवोटोबी पर्वतरांगांमधील लाकी-लाकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अवकाशात तब्बल १० हजार फूट उंचीपर्यंत राख व धूर पसरल्यामुळे एकूणच हवाई प्रवास धोक्याचा बनला आहे.

अख्खे जग हादरवून सोडणाऱ्या अहमदाबाद येथील १२ जूनच्या विमान अपघाताला गुरुवारी एक आठवडा पूर्ण होईल. तिथल्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनजवळच्या गॅटविककडे झेपावलेले विमान लगतच्या रहिवासी वस्तीत पडले. प्रवासी व पायलटसह कर्मचारी मिळून २४२ जणांपैकी केवळ एक जण वाचला. विश्वास कुमार रमेश नावाचा तो प्रवासी बचावला हा केवळ चमत्कार मानला गेला. टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीकडून चालविले जाणारे बोइंग कंपनीचे ७८७ ड्रीमलायनर हे महाकाय विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहावर कोसळले. तिथे राहणारे काही भावी डॉक्टर, परिसरातील नागरिक मिळून पावणे तीनशेच्या आसपास जीव या अपघातात गेले. जळालेल्या मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शेकडो कुटुंबे या महाभीषण अपघाताने उद्ध्वस्त झाली.

मृतांमध्ये कर्तबगारीचा झेंडा सातासमुद्रापार रोवणारे प्रतिभावंत होते, व्यापारी-उद्योजक होते. भविष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन लंडनला निघालेले काही होतकरू होते. घरगुती समारंभ, काही कार्यक्रम आटोपून दूरदेशी स्थायिक झालेल्या आप्तेष्टांकडे निघालेले काही जण होते. गेला आठवडाभर देशात व जगभर या भयंकर अपघाताचीच चर्चा आहे. प्रत्येक संवेदनशील माणूस पुन: पुन्हा हळहळतो आहे. मनामनांत आक्रोश सुरू आहे. अपघाताच्या दृश्यांनी अनेकांची झोप उडाली आहे.

केवळ सामान्य माणूसच नव्हे, तर देशाचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय म्हणजेच ‘डीजीसीए’देखील हादरले आहे. असा अपघात देशाच्या कोणत्याही भागात घडला असता तरी भारतीय जनमानस असेच स्तब्ध झाले असते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरात या गृहराज्यात हा अपघात घडला आणि संपूर्ण यंत्रणा थोडी अधिक हलली, खडबडून जागी झाली. आता सगळ्या विमानतळांवर विमानांची सर्व प्रकारची तपासणी सुरू आहे. कोणत्याही प्रकारची थोडी जरी शंका आली तरी उड्डाण थांबविण्यात येते. पूर्णपणे निर्दोष व्यवस्थेत विमान आकाशात झेपावेल याची काळजी घेतली जाते. हजारो किलोमीटर अंतर कापावे लागते अशा आंतरराष्ट्रीय उड्डाणाविषयी तर डोळ्यांत तेल घालून पहारे दिले जात आहेत. त्यामुळेच मंगळवारी एकाच दिवशी एअर इंडियाच्या सहा ड्रीमलायनर विमानांची उड्डाणे ऐनवेळी थांबविण्यात आली. त्याशिवाय सॅन फ्रान्सिस्कोवरून मुंबईला येणाऱ्या बोइंग-७७७ विमानाचा प्रवास सायंकाळी उशिरा कोलकाता येथेच थांबविण्यात आला.

प्रवाशांना मुंबईपर्यंत पोहोचविण्यासाठी दुसरी व्यवस्था करण्यात आली. पश्चिम आशियातील ओमान देशातील मस्कतवरून कोचीमार्गे दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे ते नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. तपासणीअंती स्पष्ट झाले की, बॉम्ब वगैरे काही नाही. तेव्हा, काही तासांनंतर ते विमान दिल्लीकडे झेपावले. बुधवारी सकाळी दिल्लीवरून इंडोनेशियातील बाली बेटाकडे निघालेले विमान त्या भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या कारणाने माघारी वळविले गेले. लेवोटोबी पर्वतरांगांमधील लाकी-लाकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अवकाशात तब्बल १० हजार फूट उंचीपर्यंत राख व धूर पसरल्यामुळे एकूणच हवाई प्रवास धोक्याचा बनला आहे. थोडक्यात, देशातील हवाई प्रवासात पुन्हा कोणताही अपघात होणार नाही, प्रवास सुखरूप होईल, याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. 

अहमदाबाद अपघातानंतर तांत्रिक दोष किंवा अन्य संशयावरून मंगळवारपर्यंत तब्बल ८३ फेऱ्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यात ७८७ ड्रीमलायनरची संख्या ६६ आहे. या दक्षतेसाठी ‘डीजीसीए’ची पाठ थोपटायला हवी हे खरे. तथापि, हे करताना अहमदाबाद अपघाताचे कारण शोधण्याचे काम थांबायला नको. कारण, अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बोइंग ७८७ ड्रीमलायनरची दोन्ही इंजिने एकावेळी बंद पडणे, उड्डाणानंतर विमानाने जेमतेम ६२५ फूट एवढीच उंची गाठणे, उंची गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या पंखांवरील ॲलिराॅनच्या झडपा उघडलेल्या नसणे, एअरब्रेक व लँडिंग गीअर अंमलात येणे हे सारे एकाचवेळी घडणे अपवादातील अपवाद म्हणूनदेखील पटण्यासारखे नाही. केवळ अपघात म्हणून ही घटना सोडून देणे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य होणार नाही. तेव्हा, डीजीसीए सध्या दाखवत असलेली सजगता, दक्षता कायम ठेवतानाच अहमदाबाद अपघाताच्या चौकशीलाही वेग द्यायला हवा. प्रत्येक प्रवासासाठी अशीच काळजी घ्यायला हवी. तरच आकाशीचा देव हवाई प्रवासावर प्रसन्न राहील. प्रवासी सुरक्षित राहतील आणि हरेक प्रवास आनंददायी असेल.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाInternationalआंतरराष्ट्रीय