शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: मैदानात मृत्यूचा ‘खेळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 08:39 IST

इंडोनेशियातून रविवारी धक्कादायक वृत्त आले.

इंडोनेशियातून रविवारी धक्कादायक वृत्त आले. फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार घडला. हिंसाचारात १२५ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींची संख्या १८०च्या वर गेली आहे. अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय या क्लबमधील लढतीत सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करीत ३-२ ने सामना जिंकला.  सामन्यानंतर पराभूत अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. नाराज चाहत्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी आधी लाठ्यांचा प्रसाद दिला. पाठोपाठ अश्रुधुराचा मारा केला. पोलिसांच्या मते, स्टेडियमवर ४२ हजार प्रेक्षक होते, हे सर्वजण अरेमा संघाचे पाठीराखे होते. 

आयोजकांनी सुराबायच्या पाठीराख्यांवर बंदी घातली होती.  अरेमा आणि सुराबाय हे कट्टर वैरी संघ. दोन दशकानंतर त्यांच्यात सामना झाला; पण चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यानंतरही सुराबायने बाजी मारताच पराभव पचनी न पडलेले अरेमाचे चाहते भडकले. त्यांनी रेफ्री, अधिकारी आणि पोलिसांना लक्ष्य केले.  ३४ जणांचा  जागेवर मृत्यू झाला. काहींनी इस्पितळात प्राण सोडले. ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फटिंनो यांनी फुटबॉलसाठी हा काळा दिवस असल्याचे वक्तव्य केले. ‘फिफा’चा नियम सांगतो, की पोलीस स्टेडियममध्ये शस्त्र सोबत बाळगू शकतात. मात्र, गोळीबार करू शकत नाहीत. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यासही बंदी आहे. देशातील मानवाधिकार आयोगाने नेमके याच गोष्टीवर बोट ठेवले. या दृष्टीने चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 

इंडोनेशियात याआधीही खेळात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. १९९० ला अशाच एका घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. यानंतरही १९९१ ते २०१९ या काळात जवळपास ७१ चाहत्यांना अशा प्रकारच्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला. जागतिक फुटबॉलचा विचार केल्यास १९८९ ला ब्रिटनच्या हिल्सबोरो स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत लिव्हरपूल क्लबच्या ९७ चाहत्यांना जीव गमवावा लागला होता. २०१२ ला इजिप्तच्या पोर्ट सॅड स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेत ७४ चाहते मृत्युमुखी पडले होते. १९६४ ला पेरू-अर्जेंटिना यांच्यातील पात्रता सामन्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात जवळपास ३२० जण मारले गेले. काही हजार जखमी झाले होते. इंडोनेशियात अशा घटना का घडतात? त्यामागे अनेक कारणे देता येतील. भारतात क्रिकेट जितके लोकप्रिय, तितकीच इंडोनेशियात फुटबॉलची लोकप्रियता. या खेळावर जीव ओवाळून टाकणारे सर्व वयोगटातील लोक सामन्याला हजेरी लावण्यासाठी अक्षरश: वेडे असतात. चाहते आपापल्या क्लबवर जीव ओवाळतात. स्थानिक लीगची मोठी क्रेझ आहे. कडवेपणा हिंसेचे रूप धारण करतो. चाहत्यांमधील ही झडप स्टेडियमच्या बाहेर अनेक दिवस पाहायला मिळते. बदल्याच्या भावनेतून भोसकाभोसकीचे प्रकार घडतात. खेळाच्या माध्यमातून टोळीयुद्ध घडत असते. खेळातील जय- पराजयावर पैशाचा खेळ रंगत असतो. त्यातून हिंसेचा उद्रेक होतो. 

क्लब फुटबॉलवर होणारी आर्थिक उलाढाल हे हिंसेमागील मोठे कारण. आपला संघ हरण्याचा अर्थ मोठे आर्थिक नुकसान. या नुकसानीचा वचपा प्रतिस्पर्धी खेळाडूवर हल्ला चढवून काढला जातो. या देशात पर्सिजा जकार्ता आणि परसिब बांदुंग या दोन्ही क्लबचे पाठीराखे तर कधीही एकमेकांसोबत पंगा घेतात. २०१८ ला तर परसिब बांदुंगच्या एका चाहत्याने पर्सिजा जकार्ताच्या चाहत्याला जीव जाईपर्यंत चिरडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडोनेशियाच्या फुटबॉल चाहत्यांची प्रतिमा खराब आहे. जगात कुठेही सामना असेल तेव्हा त्यांच्या कृतीवर विशेष नजर ठेवली जाते. कडवे प्रतिस्पर्धी असलेले मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यात २०१९ च्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान राडा झाला होता. जकार्ता येथे  मलेशियाच्या चाहत्यांवर दगडफेक झाली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

२०१९ ला दक्षिणपूर्व आशियाई २२ वर्षांखालील आशियाई फुटबॉल सामन्यात व्हिएतनामकडून झालेला पराभव पचनी न पडल्याने इंडोनेशियाच्या चाहत्यांनी  विजयी संघातील खेळाडूंना शिवीगाळ केली होती. पराभूत संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांना देखील संपवून टाकण्याचा इशारा दिला होता. यंदा जूनमध्ये प्रेसिडेंट चषक सामन्याच्यावेळी परसिंग बांदुंगचे दोन चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करू इच्छित होते. अधिकाऱ्यांनी त्यांना रोखताच हिंसाचाराला तोंड फुटले होते. खेळ आणि खिलाडूवृत्ती, जय-पराजयाचा स्वीकार या गोष्टींचा विसर पडल्याने हिंसक चाहते कुठल्याही स्तराला जातात. इंडोनेशियाच्या चाहत्यांची ही एकांगीवृत्ती क्रीडाविश्वाला मारक अशीच आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :FootballफुटबॉलIndonesiaइंडोनेशिया