शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आजचा अग्रलेख: मैदानात मृत्यूचा ‘खेळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 08:39 IST

इंडोनेशियातून रविवारी धक्कादायक वृत्त आले.

इंडोनेशियातून रविवारी धक्कादायक वृत्त आले. फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार घडला. हिंसाचारात १२५ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींची संख्या १८०च्या वर गेली आहे. अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय या क्लबमधील लढतीत सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करीत ३-२ ने सामना जिंकला.  सामन्यानंतर पराभूत अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. नाराज चाहत्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी आधी लाठ्यांचा प्रसाद दिला. पाठोपाठ अश्रुधुराचा मारा केला. पोलिसांच्या मते, स्टेडियमवर ४२ हजार प्रेक्षक होते, हे सर्वजण अरेमा संघाचे पाठीराखे होते. 

आयोजकांनी सुराबायच्या पाठीराख्यांवर बंदी घातली होती.  अरेमा आणि सुराबाय हे कट्टर वैरी संघ. दोन दशकानंतर त्यांच्यात सामना झाला; पण चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यानंतरही सुराबायने बाजी मारताच पराभव पचनी न पडलेले अरेमाचे चाहते भडकले. त्यांनी रेफ्री, अधिकारी आणि पोलिसांना लक्ष्य केले.  ३४ जणांचा  जागेवर मृत्यू झाला. काहींनी इस्पितळात प्राण सोडले. ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फटिंनो यांनी फुटबॉलसाठी हा काळा दिवस असल्याचे वक्तव्य केले. ‘फिफा’चा नियम सांगतो, की पोलीस स्टेडियममध्ये शस्त्र सोबत बाळगू शकतात. मात्र, गोळीबार करू शकत नाहीत. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यासही बंदी आहे. देशातील मानवाधिकार आयोगाने नेमके याच गोष्टीवर बोट ठेवले. या दृष्टीने चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 

इंडोनेशियात याआधीही खेळात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. १९९० ला अशाच एका घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. यानंतरही १९९१ ते २०१९ या काळात जवळपास ७१ चाहत्यांना अशा प्रकारच्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला. जागतिक फुटबॉलचा विचार केल्यास १९८९ ला ब्रिटनच्या हिल्सबोरो स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत लिव्हरपूल क्लबच्या ९७ चाहत्यांना जीव गमवावा लागला होता. २०१२ ला इजिप्तच्या पोर्ट सॅड स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेत ७४ चाहते मृत्युमुखी पडले होते. १९६४ ला पेरू-अर्जेंटिना यांच्यातील पात्रता सामन्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात जवळपास ३२० जण मारले गेले. काही हजार जखमी झाले होते. इंडोनेशियात अशा घटना का घडतात? त्यामागे अनेक कारणे देता येतील. भारतात क्रिकेट जितके लोकप्रिय, तितकीच इंडोनेशियात फुटबॉलची लोकप्रियता. या खेळावर जीव ओवाळून टाकणारे सर्व वयोगटातील लोक सामन्याला हजेरी लावण्यासाठी अक्षरश: वेडे असतात. चाहते आपापल्या क्लबवर जीव ओवाळतात. स्थानिक लीगची मोठी क्रेझ आहे. कडवेपणा हिंसेचे रूप धारण करतो. चाहत्यांमधील ही झडप स्टेडियमच्या बाहेर अनेक दिवस पाहायला मिळते. बदल्याच्या भावनेतून भोसकाभोसकीचे प्रकार घडतात. खेळाच्या माध्यमातून टोळीयुद्ध घडत असते. खेळातील जय- पराजयावर पैशाचा खेळ रंगत असतो. त्यातून हिंसेचा उद्रेक होतो. 

क्लब फुटबॉलवर होणारी आर्थिक उलाढाल हे हिंसेमागील मोठे कारण. आपला संघ हरण्याचा अर्थ मोठे आर्थिक नुकसान. या नुकसानीचा वचपा प्रतिस्पर्धी खेळाडूवर हल्ला चढवून काढला जातो. या देशात पर्सिजा जकार्ता आणि परसिब बांदुंग या दोन्ही क्लबचे पाठीराखे तर कधीही एकमेकांसोबत पंगा घेतात. २०१८ ला तर परसिब बांदुंगच्या एका चाहत्याने पर्सिजा जकार्ताच्या चाहत्याला जीव जाईपर्यंत चिरडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडोनेशियाच्या फुटबॉल चाहत्यांची प्रतिमा खराब आहे. जगात कुठेही सामना असेल तेव्हा त्यांच्या कृतीवर विशेष नजर ठेवली जाते. कडवे प्रतिस्पर्धी असलेले मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यात २०१९ च्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान राडा झाला होता. जकार्ता येथे  मलेशियाच्या चाहत्यांवर दगडफेक झाली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

२०१९ ला दक्षिणपूर्व आशियाई २२ वर्षांखालील आशियाई फुटबॉल सामन्यात व्हिएतनामकडून झालेला पराभव पचनी न पडल्याने इंडोनेशियाच्या चाहत्यांनी  विजयी संघातील खेळाडूंना शिवीगाळ केली होती. पराभूत संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांना देखील संपवून टाकण्याचा इशारा दिला होता. यंदा जूनमध्ये प्रेसिडेंट चषक सामन्याच्यावेळी परसिंग बांदुंगचे दोन चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करू इच्छित होते. अधिकाऱ्यांनी त्यांना रोखताच हिंसाचाराला तोंड फुटले होते. खेळ आणि खिलाडूवृत्ती, जय-पराजयाचा स्वीकार या गोष्टींचा विसर पडल्याने हिंसक चाहते कुठल्याही स्तराला जातात. इंडोनेशियाच्या चाहत्यांची ही एकांगीवृत्ती क्रीडाविश्वाला मारक अशीच आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :FootballफुटबॉलIndonesiaइंडोनेशिया