शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

भारत-पाक संबंधातील पेच

By admin | Updated: July 13, 2015 00:29 IST

उद्धव ठाकरे जरी भारताचे पंतप्रधान असते, तरीही दहशतवादी हल्ले व सीमेपलीकडून गोळीबार होऊन आपले नागरिक व सैनिक मारले जात असतानाही नरेंद्र मोदी

उद्धव ठाकरे जरी भारताचे पंतप्रधान असते, तरीही दहशतवादी हल्ले व सीमेपलीकडून गोळीबार होऊन आपले नागरिक व सैनिक मारले जात असतानाही नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच त्यांनाही पाकशी चर्चा करणे भागच पडले असते. उद्धव ठाकरे आज पाकशी चर्चा करण्याच्या मुद्यावरून मोदी यांच्यावर नथीतून तीर मारीत आहेत; पण उघडपणे विरोध करण्याचे धैर्य ठाकरे यांच्याकडे नाही; कारण तसे केल्यास मोदी डोळे वटारतील व सत्ता जाईल, ही भीती आहे; पण सत्तेत वाटा मिळूनही भाजप समान दर्जा देत नाही, ही ठाकरे यांची खरी खदखद आहे. ती बोलून दाखवण्याची संधी ठाकरे सतत शोधत असतात. म्हणूनच ‘आम्ही सत्तेपेक्षा तत्त्वाला महत्त्व देतो’, असा आव आणून तसा देखावा आपल्या पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्यापुढे उभा करण्यापलीकडे पाकसंबंधीच्या ठाकरे यांच्या वक्तव्याला काही अर्थ नाही. खुद्द नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच बोलत होते ना? जेव्हा डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान म्हणून पाकशी चर्चा करण्यासाठी काही पावले टाकत, तेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारवर भाजप किती डाफरत असे? ‘देशाच्या हिताचा सौदा केला जात आहे, सत्ता आमच्या हाती आली की, आम्ही पाकला धडा शिकवू’, असे पालूपद भाजप २००४ पासून नंतरच्या १० वर्षांत सतत लावत आला होता. अगदी आधीच्या १९९८ ते २००४ या काळात पंतप्रधान असलेल्या वाजपेयी यांनी जे केले, तेच डॉ. मनमोहनसिंग करीत होते, हे सोयीस्करपणे विसरून आज भाजप तेच करीत आहे. पाकविषयकच नव्हे, तर एकूणच परराष्ट्र धोरणाबाबत आपल्या देशात असा हा पोरखेळ सतत चालू असतो. त्यामुळे देशाच्या विश्वासार्हतेवरच किती घनदाट सावट धरले जाते, याची पर्वा कोणत्याच राजकीय पक्षाला नसते. पाकविषयक धोरणाबाबत असे घडत आले आहे; कारण सत्तेचे एक तर्कशास्त्र असते, हे आपले राजकारणी लक्षात घेत नाहीत आणि अनेक वेळा देशाच्या दूरगामी हिताच्या दृष्टीने कटू निर्णय अपरिहार्यपणे घ्यावे लागतात, हे परखड वास्तव जनतेला पटवून देण्याचे आपले कर्तव्य सत्तेत असलेले व नसलेलेही राजकारणी केवळ नजीकच्या राजकीय फायद्यासाठी टाळत असतात. रशियातील उफा येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटल्यावर दोन्ही देशांत पुन्हा सौहार्दाचे वातावरण तयार व्हावे, यासाठी चर्चेच्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेल्यावर शिवसेना, काँग्रेस आणि इतर संघटना व गट जे काही बोलत आहेत, त्यामागे असा राजकीय फायदा उठविण्याचाच इरादा आहे. आजच्या २१ व्या शतकातील आधुनिकोत्तर जगातील जागतिकीकरणाच्या पर्वात कोणत्याही एका देशाला आपल्याला हवे तसे वागण्याची पूर्ण मुभा उरलेली नाही. देवाणघेवाण करीतच आपले हितसंबंध जपण्यावर भर द्यावा लागणे आता अपरिहार्य झाले आहे. आपण किती सामर्थ्यवान आहोत आणि ही ताकद वापरण्याची धमकी न देताही त्याची जाणीव करून देणं व आपल्या हिताचा परिपोष होईल, अशा गोष्टी प्रतिस्पर्धी देशाला न खिजवता पदरात पाडून घेणे, याला अशा देवाणघेवाणीतल्या प्रक्रि येत महत्त्वाचे स्थान असते. थोडक्यात भाषा संयमाची, पवित्रा कणखर व तयारी वेळ पडल्यास सामर्थ्याची चुणूक दाखवून देण्याची, हा परराष्ट्र धोरणाचा गाभा असायला हवा. त्या दृष्टीनेच मोदी-शरीफ भेटीकडे पाहावे लागेल. धर्माच्या आधारे झालेली अखंड भारताची फाळणी, त्यानंतर गेल्या साडेसहा दशकात पाकला कायम पछाडत राहिलेला अस्तित्वाचा प्रश्नआणि काश्मीरची समस्या या मुद्यांच्या त्रिकोणातच भारत-पाक संबंध अडकलेले आहेत. फाळणी हे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनावर असलेले इतिहासाचे ओझे आहे. खरे तर ते आज झुगारून देण्याची गरज आहे. तसे पाकने केले, तर त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो, अशी भीती त्या देशाला वाटत आहे. एक आधुनिक मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकची नवी ओळख निर्माण करण्याच्या आड ही भीती येत आहे. त्यामुळे अस्तित्वाच्या पेचात पाक अडकलेला आहे. उलट आपल्या देशात आज इतिहासाच्या चौकटीत स्वत:ला अडकवून घेतलेला पक्ष सत्तेत आला आहे. त्यामुळेच काश्मीरची समस्या सोडवण्यात अडथळे उभे राहत आहेत. दोन्ही देशांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागांना स्वायत्तता देणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हटवून दोन्ही भागांतील लोकांना ये-जा करण्याची मुभा देणे आणि या प्रयोगाला सुरुवातीस काही ठराविक कालावधीसाठी दोन्ही देशांनी पाठबळ देणे, हा खरा तोडगा भारत व पाक यांच्यात वाजपेयी व डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असल्यापासून चर्चेत आहे; पण ‘काश्मीर आमचेच’ हा पवित्रा घेतल्यावर असा तोडगा जनतेच्या गळी उतरवणार कोण, हा प्रश्न दोन्ही देशातील नेत्यांना भेडसावत आहे. त्यावर तोडगा लगेच निघणार नाही; पण वातावरण सौहार्दाचे राहिल्यास टप्प्या-टप्प्याने त्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते. म्हणूनच रशियातील उफा येथील चर्चेनंतर झालेला निर्णय हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. ही प्रकिया विनाखंडित राहण्यासाठी पाक वा काश्मीर या मुद्यांवर राजकारण करण्याची उबळ आपल्या देशातील राजकीय पक्षांना थोपवावी लागेल. तसे न झाल्यास या आधीप्रमाणेच अशा चर्चादेखील निष्फळच ठरतील.