डॉ. मधुप मोहतानिवृत्त अधिकारी,भारतीय परराष्ट्र सेवाभारतीय माध्यमे आणि नेपाळ यांच्यामध्ये सध्या ‘कालापानी’वरून बरीच चर्चा सुरू आहे; पण चर्चा करणाऱ्यांना याची कल्पना नाही की, भारत-नेपाळ सीमा अन्य सीमांसारखी नाही. ती एक सचित्र व सतत बदलणारी सीमा आहे. एखादी नदी हिवाळ्यात गोठली व उन्हाळ्यात पुन्हा वाहू लागली की, ही सीमा त्यानुसार बदलते. पावसाळ्यात पूर आला की सीमा अनिश्चित असते. पूर ओसरल्यावर या १,८०० कि.मी. लांबीच्या सीमेवर जमिनींचे पट्टे अनेकांकडून बेकायदा बळकावले जातात. प्रत्येक पावसाळ्यानंतर जमीन बळकावण्याचे स्वरूप व व्याप्ती बदलत असते. सुमारे ६,००० नद्या, नाले व ओढे नेपाळमधून भारतात वाहत येतात व त्यांना दरवर्षी येणाºया पुरांनी सीमेचे गणित बदलत असते. सीमेवर उभे केलेले खुणेचे खांब बदलत्या हवामानात टिकत नाहीत व सीमाभागांमध्ये राहणाऱ्यांनाही त्यांची फिकीर नसते. नेपाळ-भारतदरम्यानची सीमा दिल्ली व काठमांडूमधील सरकार नव्हेत, तर नद्या व सीमाप्रदेशात राहणारे लोक ठरवतात. सीमावाद व त्यावरील तोडग्याचे खरे मूळ यातच आहे.
नेपाळच्या डोंगराळ भागात राहणारे नागरिक हिवाळ्याच्या दिवसांत नदीपात्राच्या खालच्या पट्ट्यात स्थलांतर करतात. ते सीमेला लागून असलेल्या भारतातील पठारी प्रदेशामध्ये कामधंदा करतात. त्यांची कागदोपत्री कुठे नोंद नसते. नेपाळी लोकांना भारतात येऊन काम करण्याची आणि मालमत्ता करण्याची मुभा आहे.प्रथेने तसा जणू कायदाच आहे. म्हणून तर प्रत्येक भारतीय शहरात नेपाळी लोक मालमत्तांचे मालक असल्याचे दिसतात. येथे येऊन कुठेही स्वैर संचार करता येत असल्याने त्यांच्यादृष्टीने सीमा निरर्थक आहे; पण हे फक्त नेपाळींसाठी एकतर्फी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे कालापानी भागात राहणाºयांना तेथे सीमा नेमकी कुठे आहे, याचे फारसे महत्त्व नाही. बुधी आणि गुंजी येथील वस्त्यांमध्ये वर्षाच्या बहुतांश दिवसांत कोणीच नसते. पूर्वी सुमारे ५० वर्षे मानसरोवर यात्रेमुळे तेथे वस्ती असायची; पण आता यात्रेची व्यवस्था कैलास मानसरोवर पर्यटन विकास निगमकडूनच केली जात असल्याने स्थानिकांना कामच उरलेले नाही.
‘हिमालयीन गॅझेटियर्स’मध्ये ज्यांचा आधार घेतला, अशा स्कंदपुराणासह प्रत्येक पौराणिक ग्रंथांमध्ये ओम पर्वत व आदी कैलास ही भारतीय संस्कृतीची मुख्य केंद्रे मानली आहेत. मानसरोवर ‘नो मॅन्स लँड’ राहिलेले नाही, ही बाब समकालीन तिबेटमध्ये आर्थिक व सामाजिक कलहाचे कारण ठरले आहे. हिंदू, जैन व शिख यात्रेकरूंना ओम पर्वतापासून दूर ठेवण्याचा विचार प्रश्न सोडविण्याऐवजी अधिक समस्या निर्माण करेल, हे या भागात शासन केलेल्या ब्रिटिश, तिबेटी व चिनी सरकारसह प्रत्येक सरकारने पक्के ओळखले आहे. नेपाळातील सध्याच्या सत्ताधाºयांनीही याची जाणीव ठेवायला हवी. १८४१ मधील झोरावर सिंग कहलुरिया यांच्या स्वाºयांनी हीच गोष्ट अधोरेखित होते.
एडविन टी. अटकिन्सन यांनी संपादित केलेल्या ‘हिमालयीन गॅझेटियर्सच्या पाचव्या प्रकरणात कुमाऊं टेकड्यांच्या परिसराचा इतिहास, भूगोल आणि वंशशास्त्रीय संबंध नोंदविलेला आहे. त्यावरून असे स्पष्ट होते की, १८१७ मध्ये ब्यान्सचे विभाजन करून हद्द ठरविताना सुगौली करारातील कलमांचा अर्थ लावण्यावरून वाद झाला होता. कालापानी येथून उगम पावणाºया छोट्या झºयालाच लोक काली नदीचे उगमस्थान मानतात, हे दोतीचे त्यावेळचे गव्हर्नर बाम साह यांना कॅप्टन वेब यांनी पटवून दिले होते. ४ फेब्रुवारी १८१७ ते १० आॅक्टोबर १८१७ या काळात नेपाळमधील पहिले ब्रिटिश रेसिडेंट गार्डिनर आणि नेपाळचा राजदरबार यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारांतही या नोंदी आढळतात.