शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिस्वातंत्र्य, सद्सद‌्विवेक... आणि न्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 06:39 IST

व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत आपण स्वत:हून हस्तक्षेप करू, असे न्यायालय म्हणते, तेव्हा हे स्वातंत्र्य नाकारलेल्या हजारो कैद्यांच्या आशांना पालवी फुटेल !

- पवन वर्मा , राजकीय विषयांचे विश्लेषक

अर्णब गोस्वामी यांना २०१८च्या प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्व उचलून धरले. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप गोस्वामी यांच्यावर आहे. न्यायालयाने ही अशी भूमिका घेतली हे चांगले झाले. ते अशा अर्थाने की गोस्वामी यांची मते काहीना पटत नसतील, ते नामोच्चार एकेरी करतात, समोरच्याला अवमानित करतात, विरोधकाना तुच्छ लेखतात हे आवडत नसेल; पण कोणाला काय आवडते, काय नाही यामुळे नागरिकांना घटनेने दिलेले अधिकार बाधित होत नाहीत. ते सुरक्षितच राहतात. जर एखाद्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आली असेल तर त्याला जामीन मिळाला पाहिजे. ज्या राज्य सरकारशी संबंधित व्यक्तीचा संघर्ष चालू आहे ते राज्य आपल्या कायदा सुव्यवस्था यंत्रणेकडून संबंधिताला एकतर्फी तुरुंगात डांबू शकणार नाही.

“ घटनेने स्थापित न्यायालय म्हणून आम्ही कायद्याने स्वातंत्र्याचे रक्षण करायचे नाही तर कोणी?” -  असे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले हे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय व्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी काहीही झाले तरी हस्तक्षेप करील, अशी प्रकरणे जलद चालवली जातील. ‘जामीन अर्ज सुनावणी आधी खालच्या न्यायालयात झाली पाहिजे यासारखी न्यायालयीन प्रक्रिया वेळप्रसंगी बाजूला ठेवून सप्ताहाअखेरही  कोर्ट भरवून त्याची सुनावणी करून घ्या’, असे न्यायालयाने ऐकवले हेही चांगले झाले. मात्र या दिलासादायक बातमीमुळे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात खितपत पडलेल्या फादर स्टॅन स्वामी यांच्या स्थितीत काही फरक पडणार नाही. एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ८३ वर्षांचे स्वामी २०१८पासून त्या तुरुंगात आहेत. ‘‘आपल्याला कंपवाताचा त्रास असल्याने पेला हातात धरता येत नाही म्हणून ज्यातून घोट घेणे सोपे जाईल असा कप किंवा स्ट्रॉ मिळावा’’, असा अर्ज स्वामी यांनी विशेष एनआयएकडे केला. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे मोठे काही मागितले नव्हते. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या काकुळतीने केलेल्या अर्जावर सुनावणी घेतली आणि एनआयएकडून २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागितले. कागदी स्ट्रॉ किंवा कप मिळण्यासाठी आता स्वामींना थरथरत्या हातानी २० दिवस वाट पहावी लागणार.

कदाचित माननीय सर्वोच्च न्यायालय अशा प्रकरणांची स्वत:हून दखल घेऊ शकेल. न्यायाची चेष्टा अनेक प्रकारे होऊ शकते. काही वेळा ज्यांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क हिरावला गेला, जे महिनोन्महिने जामिनाशिवाय तुरुंगात खितपत पडले आहेत त्यांच्या तोंडावर नियम पुस्तिका फेकली जाऊ शकते. दुसरीकडे प्रकरण जलदरीत्या चालवून न्यायालय व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत किती सतर्क आहे हे दाखवता येऊ शकते. कदाचित ऐशी वर्षे पार केलेल्या वरवरा राव यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची हमी देशाचे सर्वोच्च न्यायायालय देऊ शकते. एल्गार परिषद प्रकरणात २०१८ सालापासून ते तुरुंगात आहेत. त्यांना वारंवार जामीन नाकारला गेला. राव यांची प्रकृती गंभीर आहे. वरवरा राव यांना रुग्णालयात दखल करता यावे, यासाठी त्यांच्या पत्नीने खूप प्रयत्न केले. त्यानंतरच राव यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दखल करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

न्याय मिळण्याची शेवटची आशा म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पहिले जाते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत आपण स्वत:हून हस्तक्षेप करू असे न्यायालय म्हणते तेव्हा हे स्वातंत्र्य ज्याना नाकारले गेले अशा हजारो कैद्यांच्या आशाना पालवी फुटेल. आपल्या सद्सद‌्विवेकाला धक्का पोहोचावा इतका न्याय  अमानवी नसतो.  फादर स्वामींना  सोसेल, जमेल  अशा  रीतीने पाणी पिण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल तेव्हाच अर्णब गोस्वामीबाबत न्यायालयाने दाखवलेल्या  काळजीला  व्यापक अर्थ आहे असा  संदेश त्यातून जाईल.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामी