शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 09:35 IST

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंना कोणीही ‘आव्हान’ दिले नाही, कोरोनाने त्यांची ‘परीक्षा’ पाहिली; पण ते पुरून उरले.

रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, मुंबई -

भारतीय युवा क्रिकेटपटूंनी शनिवारी विक्रमी पाचवे विश्वविजेतेपद पटकावले. आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पाचवेळा जेतेपद उंचावणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला. स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताने समोर येणाऱ्या प्रत्येक संघाला सहजपणे लोळवले. वरवर पाहता भारताचा विजय सहजसोपा दिसतो, पण अनेक संकटांना मागे टाकून भारतीय युवांनी आपली जिद्द आणि अखेरपर्यंत हार न मानण्याची वृत्ती दाखवून दिली. जगभरात अजूनही कोरोनाचे संकट आहे. अशा परिस्थितीत जगाच्या दुसऱ्या टोकाकडे असलेल्या वेस्ट इंडिजमध्ये जाऊन क्रिकेट खेळणे प्रत्येकासाठी आव्हानात्मक होते. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. अपवाद केवळ आशिया चषक स्पर्धेचा. यादरम्यान जो काही सराव केला, त्या जोरावर भारतीय युवांनी यूएईमध्ये जानेवारी महिन्यात आशिया चषक उंचावला आणि येथूनच थेट वेस्ट इंडिजकडे कूच केले. विश्वचषक स्पर्धेत सलामीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहज बाजी मारल्यानंतर बलाढ्य भारताला अंतिम फेरीपासून रोखणे कठीण असल्याचे सर्वांना कळून चुकले. मात्र भारतीयांना अडचणीत आणले ते कोरोनाने. एक दोन नव्हे, तर कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार राशीद शेख यांच्यासह तब्बल सहा प्रमुख खेळाडू कोरोनामुळे विलगीकरणात गेल्याने भारतीय संघ प्रचंड दबावात आला. संघ व्यवस्थापनाची मोठी कसोटी लागली. पण, म्हणतात ना, भारतात क्रिकेट खेळ नाही, तर धर्म आहे. हे या स्पर्धेतून पुन्हा दिसून आले. कोरोनाग्रस्त भारतीय संघाच्या जागी दुसरा कोणता संघ असता, तर त्यांनी माघार घेतली असती किंवा धडपडत वाटचाल केली असती. पण, प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत उपलब्ध राखीव खेळाडूंच्या जोरावर भारताने केवळ विजय नव्हे, तर दणदणीत विजय मिळवत दिमाखात बाद फेरी गाठली. यातून भारतातील गुणवत्ता तर दिसलीच, पण भारतीय क्रिकेटची क्षमता आणि त्याचा स्तरही जागतिक क्रिकेटने पाहिला. या युवा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली ती माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकरने. होय, हा तोच कानिटकर, ज्याने इंडिपेंडन्स कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २ चेंडूंत ३ धावांची गरज असताना विजयी चौकार ठोकला होता. या एका चौकाराच्या जोरावर कानिटकर भारत देशाचा हिरो बनला होता. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कशाप्रकारे डोकं शांत ठेवून खेळायचे हे खुद्द कानिटकरकडून युवा क्रिकेटपटूंना शिकता आले. शिवाय विश्वचषक स्पर्धेत संघाचा मार्गदर्शक होता माजी खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण. लक्ष्मणने दडपणाच्या स्थितीत भारतीय संघाला कशा प्रकारे सावरले, हे सांगायला केवळ २००१ सालचा कोलकाता येथील भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पुरेसा आहे. कानिटकर-लक्ष्मण या जोडीचीही या विश्वविजेतेपदामध्ये मोठी भूमिका ठरली. दोघांच्या अनुभवाचे बोल भारताच्या युवा क्रिकेटपटूंसाठी ‘बूस्टर’ ठरले. त्यामुळेच प्रमुख खेळाडू कोरोनामुळे संघाबाहेर गेले असतानाही भारतीय संघाच्या कामगिरीवर जो काही परिणाम झाला, तो केवळ सकारात्मक होता. या विश्वविजयी युवा संघातून भारतीय क्रिकेटला भविष्यात अनेक स्टार मिळणार आहेत. यश धूल, राशीद शेख, अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, राज बावा, रवी कुमार, कौशल तांबे, विकी ओस्तवाल, निशांत सिंधू अशी अनेक नावे आता गाजतील. कोरोनावर मात करुन संघात परतलेल्या धूलने त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक शतक ठोकले. १९ वर्षांखालील विश्वचषकात शतक ठोकणारा तो भारताचा केवळ तिसरा कर्णधार ठरला. तसेच, राज बावा हा भारताला गवसलेला एक हिराच म्हणावा लागेल. भारताला सध्या भक्कम अष्टपैलूची आवश्यकता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत बावाने कामगिरीत सातत्य राखले, तर त्याच्यासाठी भारताचा मुख्य राष्ट्रीय संघ दूर नाही. बावाने स्पर्धेत ६ सामन्यांतून २५२ धावा फटकावताना एक नाबाद दीडशतकी खेळी केली. शिवाय ९ बळीही घेतले. अंतिम सामन्यात तर त्याने इंग्लंडचा अर्धा संघ बाद करत भारताच्या विश्वविजेतेपदाचा पाया रचला होता. या कामगिरीच्या जोरावर हे युवा खेळाडू आगामी आयपीएल लिलावात भाव खाऊन जाणार हे नक्की..

टॅग्स :U19 Cricket World Cup final19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ