शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या क्रिकेटमधून भारत-पाकमधले पुरुषी शत्रुत्व हद्दपार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 11:49 IST

महिला क्रिकेट विश्वचषकातल्या भारत-पाक सामन्यात ना पारंपरिक शत्रुत्व दिसले, ना युध्दभूमी असावी तसे चित्कार! - हे वातावरण फार सुखद म्हणावे असे आहे!

संजीव साबडे

भारत व पाकिस्तान क्रिकेट सामने आता या दोन देशांमध्ये नव्हे, तर बाहेरच खेळले जातात. दोन देशांतले कमालीचे कटुत्व हे अर्थातच त्याचे कारण. सामन्याच्या वेळी दोन्ही संघांतील खेळाडू, सामना स्टेडियममध्ये व टीव्हीवर पाहणारे चाहते आणि समालोचक युद्धभूमीवर असल्यासारखे वागतात आणि बोलतात. जे म्हटले जाते, ते दोन देशांतील सामन्याच्या वेळी खरे वाटत नाही.

क्रिकेट हा सज्जन लोकांचा खेळ आहे, असे संजीव साबडे व शेफाली या दोघींनीच केल्या. पण रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउनमध्ये महिला क्रिकेट विश्वचषकासाठी भारत व पाकिस्तान या दोन संघांत झालेल्या पहिल्या सामन्यात कुठेही तणाव दिसला नाही. दोन्ही देशांच्या महिला संघांत जिंकण्याची प्रचंड जिद्द दिसत होती, पण कटुता अजिबात दिसली नाही. भारताची आघाडीची खेळाडू स्मृती मानधना बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मैदानात उतरू शकली नाही. पण, तिची अनुपस्थिती जेमिमा रॉड्रिग्ज आणि शेफाली वर्मा यांनी अजिबात जाणवू दिली नाही. त्या दोघींची फलंदाजी अप्रतिम होती. पण, आपल्या जेमतेम एक वर्षाच्या आणि अंगावर पिणाऱ्या मुलीला घेऊन आलेली पाकिस्तानची कप्तान बिस्माह मारूफ हिचेही कौतुक करायला हवे. तिच्या नाबाद ६८ धावाही वाखाणण्याजोग्या होत्या. तिच्यामुळेच पाकिस्तानचा संघ भारतीय महिलांना १५० धावांचे आव्हान देऊ शकल्या.  त्यापैकी ८६ धावा तर  जेमिमा व शेफाली या दोघींनी केल्या.

अंतिम फेरीपर्यंत भारताचा महिला संघ बऱ्याचदा गेला. पण, एकदाही विश्वचषक जिंकू शकला नाही, तर पाकिस्तानी संघ एकदाही अंतिम फेरीपर्यंत गेलेला नाही. दोन्ही देशांत त्याची सल नक्की आहे. त्यामुळे तो चषक एकदा तरी जिंकण्याची इच्छा दोन्ही संघांत असणे स्वाभाविक आहे. रविवारी खेळाडूंच्या देहबोलीतून ते जाणवत होते.. पण, प्रतिस्पर्धी संघांच्या सर्वच खेळाडूंचे आपापसातील वागणे अत्यंत प्रेमाचे व जिव्हाळ्याचे होते. स्लेजिंग म्हणजे अपशब्द वापरण्याची प्रवृत्ती पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्रास दिसते. तसे रविवारी अजिबात दिसले नाही. समालोचकांची भाषा नेहमीप्रमाणे आक्रस्ताळी नव्हे, तर अतिशय संयमी होती. जेमिमा रॉड्रीग्जइतकेच बिस्माह मारूफच्या फलंदाजीचे कौतुक समालोचक करीत होते आणि तिच्या खेळाला भारतीय प्रेक्षक, तर जेमिमाच्या चौकारांना पाकिस्तानी प्रेक्षक जोरदार दाद देत होते. कर्णधार म्हणून मारूफच्या कामगिरीची वाहवा झाली आणि कप्तान हरमनप्रीत कौरने स्मृती मानधनाच्या गैरहजेरीत आपल्या सहकाऱ्यांच्या आधारे स्पर्धेतील पहिल्याच सामन्यावर भारताचा ठसा उमटवला.

तिसऱ्या देशात, दक्षिण आफ्रिकेत हा सामना झाल्याने दोन्ही देशांतील प्रेक्षक आपापसातील दुश्मनी विसरून विनोद करीत होते, हसत होते. घरी टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांसाठीही सुटीच्या दिवशी ही आनंदाची पर्वणी होती. सामना संपल्यानंतर मुलाखतीत भारतीय कप्तानाने पाकिस्तानी खेळाडूंचे कर्णधार मारूफचे कौतुक केले. त्यानंतर मारूफने पाकिस्तानी महिला संघाची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यातील चुका मोकळेपणाने व्यक्त केल्या आणि भारतीय फलंदाजीला तोंड भरून दाद दिली.

गेल्या वर्षभरात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चमकलेली मिताली राज हिच्यासह झुलन गोस्वामी, रुमेली धर करुणा जैन आणि वनिता व्हीआर अशा पाच भारतीय खेळाडूंनी निवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतरही संघातील इतर मुलींनी भारतीय आव्हान कायम ठेवले आहे. रिचा घोष या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीने शेवटी जे तडाखेबंद चौकार लावून भारताला विजयाकडे नेले, त्यावरून हे सिद्धच झाले. तिच्याच वयाच्या शेफाली वर्माच्या रविवारच्या खेळाचे वर्णन समालोचकांनी स्फोटक असे केले आहे. हरमनप्रीत कौरने काहीसे निराश केले. मात्र, त्याचा सामना जिंकण्यावर परिणाम झाला नाही. सर्वच खेळांमध्ये एखादा संघ जिंकतो, एखादा हरतो. त्याला कधीच देशाचा पराभव मानता कामा नये. आयपीएलमुळे तर टीमच्या विजयापेक्षा टीम स्पिरिट महत्त्वाचे दिसू लागले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात ते दिसले. त्यामुळे खेळ अधिक रंगतदार ठरला. अगदी ना. धों. महानोर यांच्या कवितेच्या ओळीत या खेळाने लळा लाविला असा असा की...' असा बदल करण्यासारखा!

sanjeevsabade1@gmail.com

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTeam Indiaभारतीय क्रिकेट संघWomenमहिला