शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जी-20 : अध्यक्षपद प्रत्येक भारतीयाचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 07:23 IST

देशातील ६० शहरांमध्ये झालेल्या जी-20 परिषदेच्या अंदाजे २२० बैठकांमध्ये जवळपास २३.३ कोटींहून अधिक भारतीय सहभागी झाले होते.

- एस. जयशंकर

भारताचे  जी-20 परिषदेचे अध्यक्षस्थान कसे आणि का  वेगळे आहे, हे भारताने सिद्ध करून दाखवले आहे. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, ग्लोबल साउथचा आवाज अधिक मजबूत केलाच, शिवाय हवामान बदल आणि वित्तपुरवठा, ऊर्जा संक्रमण, शाश्वत विकास उद्दिष्टांची  अंमलबजावणी आणि तांत्रिक परिवर्तन या क्षेत्रांमध्ये महत्त्वाकांक्षा जागृत केली.  संपूर्ण देशभरात जी 20 संदर्भात झालेल्या बैठका, कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये लोकांनी घेतलेला सक्रिय सहभाग हे आणखी एक वैशिष्ट्य होय! त्यामुळे भारताचे अध्यक्षस्थान केवळ सरकारपुरते मर्यादित राहिले नाही.  विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांच्या सक्रिय सहभागामुळे, भारताचे जी 20 अध्यक्षपद हे खरोखरच लोकांचे झाले आहे.

देशातील ६० शहरांमध्ये झालेल्या जी 20 परिषदेच्या अंदाजे २२० बैठकांमध्ये जवळपास ३०,००० प्रतिनिधी, आणि त्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमांमध्ये १००,०००हून अधिक जण सहभागी झाले होते. विविध मंत्रालयांनीदेखील नागरिकांना त्यांच्या सक्रिय सहभागासाठी परिश्रमपूर्वक प्रोत्साहन दिले. या अंतर्गत शिक्षण मंत्रालयाने जन भागीदारी कार्यक्रमांचे आयोजन केले. राज्यस्तरापासून जिल्हे, ग्रामपंचायती  आणि शाळांपर्यंत विविध पातळ्यांवर आयोजित केलेल्या उपक्रमांमुळे लोकांच्या मनात भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या केंद्रस्थानी असलेल्या  प्राधान्यक्रमांविषयी जागरूकता निर्माण झाली. या सर्व उपक्रमांमध्ये  एकत्रितपणे २३.३ कोटींहून अधिक जण सहभागी झाले, ज्यात १५.७ कोटी विद्यार्थी, २५.५ लाख शिक्षक आणि ५१.१ लाख समुदाय सदस्यांचा समावेश आहे.

जन भागीदारीचा महिमा हा या सहभागाविषयीच्या आकडेवारीपेक्षा खूप अधिक आहे. जी 20 विद्यापीठ  व्याख्यान मालिकेपासून ते परस्परसंवादी जी 20 मॉडेल बैठका, शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष जी 20 सत्र, महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये जी 20 दालन, आणि मनमोहक अशा  #G20India च्या कहाण्या या आणि अशा अनेक आकर्षक उपक्रमांच्या श्रेणीने  लोकांचा  व्यापक आणि उत्साहानं परिपूर्ण असा सहभाग मिळवण्यात प्रमुख भूमिका बजावली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी  जी 20 प्रतिनिधींचे स्वागत, स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर उत्साही वातावरणनिर्मिती आणि त्यांच्या यशोगाथा, तसेच परंपरांचे दर्शन घडवण्यात अहमिहिकेने भाग घेतला. यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे प्रगतीला  हातभार लावणारे विकास उपक्रम राबविण्याची संधी मिळाली.  

मणिपूरमधील लोकाटक सरोवराचा जीर्णोद्धार, मुंबईतील शहरी स्वच्छता मोहिमा किंवा लखनौमधील पायाभूत सुविधांची सुधारणा ही याची काही बोलकी उदाहरणे आहेत. विविध देशांच्या जी 20 प्रतिनिधींनी एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाचा अनुभव घेतला आणि कारागिरांच्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. त्याचबरोबर भारताच्या मनमोहक सौंदर्याचा अनुभव  आणि  वास्तुशास्त्रीय वैभवाचा आस्वाद यामुळे कोविडनंतरच्या पर्यटनाला  एक मजबूत पुनरुज्जीवन मिळाले. जागतिक आव्हानाविषयी सामाजिक औत्सुक्य आणि प्रतिबद्धता तयार करण्यासाठी विविध कृती गट आणि प्रतिबद्धता गट यांनी एक सामर्थ्यशाली व्यासपीठ म्हणून कार्य केले.

युवा 20 हा कार्यक्रम विशेष प्रभावी ठरला आणि त्यातून जन भागीदारीचा  दृष्टिकोन अधिक दृढ झाला.  समाज माध्यम मंच हे जी 20 प्रक्रियेत एक प्रमुख प्रसार प्रचार साधन म्हणून उदयास आले, त्यामुळे उपक्रमांकडे  नागरिकांचे लक्ष वेधले गेले आणि सार्वजनिक सहभाग दिवसेंदिवस वाढत गेला, परिणामी या कार्यक्रमांदरम्यान  १४ ट्रिलियनहून अधिक सोशल मीडिया इंप्रेशन्स निर्माण झाली. जन भागीदारीसंदर्भात दोन जागतिक विक्रम रचले गेले. एक म्हणजे वाराणसीतील जी 20 प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये ८०० शाळांमधील १.२५ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्याच वेळी, ४५० लंबानी कारागिरांनी १,००० अद्वितीय भरतकाम पॅचेसच्या माध्यमातून एक अप्रतिम कलाकृती तयार करून केलेले त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन! 

आपल्या एकत्रित भविष्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर जी 20 च्या निमित्ताने व्यापक वादविवाद आणि चर्चासत्रे झाली. त्यापैकी काही उल्लेखनीय गोष्टी म्हणजे  समाजाने दर्शवलेली सक्रिय समर्थनाची तयारी, हे लक्ष्य पूर्ण होण्याकरिता आवश्यक संदेश वहन जागतिक समुदायातून होणे महत्त्वाचे असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे  पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली ज्यामुळे आपल्या जीवनात पर्यावरण स्नेही सवयींना प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे, डिजिटल डिलिव्हरीचे महत्त्व जे सर्वांना आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये डिजिटल सुविधा विकसित करण्यास प्रोत्साहित करते. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर लक्ष केंद्रित केल्याने महिलांची  सामाजिक प्रगतीमधली महत्त्वाची भूमिका स्पष्टपणे मांडता येते, तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यावर भर दिल्यामुळे जागतिक समृद्धीच्या केंद्रस्थानी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होण्यास गती येते. ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे जी 20 चे अध्यक्षपद हे लोकांचे अध्यक्षपद असल्याचे म्हटले होते. आपल्या देशाने ते प्रत्यक्षात घडवून दाखवलेले आहे!

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारत