शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

Independence Day: ‘वो सुबह कभी तो आएगी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 05:08 IST

फैज अहमद फैज यांची प्रसिद्ध कविता ‘स्वातंत्र्याची पहाट’ ७३ वर्षांनंतरही आपले स्वातंत्र्याचे मूल्य जोखण्याचा संदेश देत असते.

- योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडियाफैज अहमद फैज यांची प्रसिद्ध कविता ‘स्वातंत्र्याची पहाट’ ७३ वर्षांनंतरही आपले स्वातंत्र्याचे मूल्य जोखण्याचा संदेश देत असते. ब्रिटिश राजवट संपल्यानंतर ते म्हणाले होते,‘ये दाग-दाग उजालायह शब गजीदा सहरवो इंतजार था जिसकाये वो सहर तो नहीं’तेव्हा तर नाही पण आज तरी ती पहाट उगवली आहे जिची आम्हाला प्रतीक्षा होती? १५ आॅगस्ट रोजी ब्रिटिश राजवट गेली आणि देश स्वतंत्र झाला. परंतु जे लोक स्वातंत्र्याच्या या औपचारिक आनंदोत्सवात आनंदी होऊ शकणार नाहीत त्यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या ९ प्रश्नांवर विचारमंथन अवश्य करावे.१. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर शेकडो किलोमीटर पायपीट करणाऱ्या कामगारांचे दृश्य भारतातच का बघायला मिळाले? स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिकांचे हे चित्र होते का?२. मोठ्या भटक्या समाजाला असूचित करुन ७० वर्षे झाली तरी आजही हा समाज तिरस्कार, उपेक्षा, हिंसाचार आणि शोषणाच्या दंशातून मुक्त झाला आहे काय?३. ज्या तीन लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्यापैकी कुणाच्या तरी घरी जा, त्यांच्या विधवा किंवा मुलांना विचारा, ‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’ धाडस असेल तर भारत सरकारने कृषीबाबत जे तीन नवे अध्यादेश काढले ते वाचा आणि विचारा, खरेच शेतकरी स्वतंत्र झाला ?४. लैंगिक हिंसाचाराला बळी ठरलेल्या आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याची हिंमत नसलेल्या त्या लाखो महिलांना विचारा स्वातंत्र्याचा अर्थ. महिलाच स्वतंत्र नाही मग देश कसा स्वतंत्र ?५. दलित वस्तीत भेट देवून पहा त्यांचा मानसिक छळ होतोय की नाही? याला स्वातंत्र्य म्हणायचे काय?६. या देशात सर्व धर्माच्या लोकांना समान स्वातंत्र्य आहे का?७. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवनाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची समान संधी उपलब्ध आहे काय? की ज्याच्या खिशात जेवढे जास्त पैसे तो तेवढा स्वतंत्र?८. नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने मातृभाषेवर झालेल्या चर्चेचेच बघा ना! इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी भारतीय भाषांमध्ये शिक्षणाच्या विचाराने पसरलेली दहशत बघा. इंग्रज तर निघून गेले पण इंग्रजीची गुलामीे संपली आहे काय?९. गेल्या काही वर्षात जेवढे मठ आणि बाबा आले ते बघता हे विचारायलाच हवे की आम्ही आपले आराध्य, आपल्या आत्म्याशी समरस होण्यास तरी स्वतंत्र आहोत काय?१५ आॅगस्टचा हा दिवस केवळ भूतकाळातील स्वातंत्र्य संग्रामाच्या धुसर आठवणी ताज्या करण्याचाच दिवस नाही. देशात एका नव्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा हा प्रारंभ असला पाहिजे. तरच आम्ही सर्व मिळून साहिर लुधियानवींचे ते स्वप्न साकार करु शकू, ‘वो सुबह कभी तोे आएगी... ’

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन