शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day: आत्मचिंतन करून स्वप्नपूर्तीचा प्रामाणिक आढावा घेऊ या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 05:27 IST

केंद्र सरकारने कोणतीही राष्ट्रीय आपत्ती निवारण योजना तयार केली नाही किंवा ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याआधी राज्यांना साधे विचारलेही नाही. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला ‘एन्व्हायर्न्मेंट इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट’चा नवा मसुदा हा राज्यांच्या अधिकारांवर आणखी एक मोठा घाला आहे.

- अधीर रंजन चौधरी, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेतेस्वातंत्र्याचे प्रदीर्घ काळ उराशी बाळगलेले स्वप्न आजच्या दिवशी साकार झाल्याने १५ ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली अशा महान व्यक्तींचे आदराने स्मरण करणे हे आपले पवित्र कर्तव्य ठरते. स्वातंत्र्यासाठी आपण आधी मुघलांविरुद्ध प्रदीर्घ काळ व नंतर ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध निकराने लढा दिला. पण आपली दुर्बलता अशी होती की, आपण संघटित नव्हतो, आपल्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना नव्हती, एक राष्ट्र या संकल्पनेची आपल्याला जाणीव नव्हती, देशपातळीवर त्यासाठी कोणतेही आंदोलन नव्हते किंवा कोणतीही निश्चित दिशा नव्हती. इतिहासाच्या अशा अत्यंत निर्णायक वळणावर देशाच्या राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय झाला. त्यांच्या नेतृत्वाने सर्व वर्गांच्या, धर्मांच्या, वंशांच्या व विचारांच्या नागरिकांमध्ये आत्मविश्वास चेतविला गेला. गांधीजींनी अहिंसेचे तत्त्व स्वीकारून लोकांचे नेतृत्व केले. माणसाचे खरे सामर्थ्य शारीरिक ताकदीत नसते, तर दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे त्यांनी लोकांना स्वत:च्या उदाहरणाने पटवून दिले. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह इतरही अनेक थोर नेते त्या काळात उदयास आले.स्वातंत्र्यानंतर देशाचे जे संविधान तयार झाले त्याचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याची जोड दिल्याखेरीज देशातील कोट्यवधी लोकांचा खरा उत्कर्ष साधता येणार नाही यावर जवाहरलाल नेहरू यांचा भर होता. डॉ. आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीसोबतच सामाजिक लोकशाहीचाही आग्रह धरला. समानतेशिवाय स्वातंत्र्य व्यर्थ आहे व स्वातंत्र्याशिवाय समानता शक्य नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते. राज्यघटनेत त्यांनी याचाच समावेश केला.

स्वातंत्र्याला आता ७४ वर्षे झाली असल्याने आपण पाहिलेल्या स्वप्नापैकी किती प्रत्यक्षात उतरू शकले यावर आत्मचिंतन करून निष्कर्ष काढण्याची हीच योग्य वेळ आहे. पण एकमात्र नक्की की, भारतात लोकशाही कधीच यशस्वी होणार नाही, असे अपशकुनी भाकीत करणाऱ्यांना आपण सपशेल खोटे ठरविले आहे. भारतीय लोकशाहीच्या सळसळत्या जिवंतपणाने व लवचिक टिकाऊपणाने त्यांची तोंडे कायमची बंद केली आहेत.इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सलग १,७०० वर्षे भारत ही जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होती व त्या काळात जगाच्या ‘जीडीपी’मध्ये भारताचा हिस्सा ३४ ते ४० टक्के होतो. केंब्रिज विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ अ‍ॅग्नस मॅडिसन यांनी असे दाखवून दिले आहे की, सन १७०० मध्ये जागतिक उत्पन्नात भारताचा वाटा जेव्हा २२.६ टक्के होता त्यानंतर मात्र भारताची अधोगती सुरू झाली व सन १९५२ मध्ये भारताचा हिस्सा ३.८ टक्के एवढा घसरला. परंतु, सन २००८ पर्यंत भारताने पुन्हा सर्वांत वेगवान विकास करणारा देश म्हणून पुन्हा स्थान पटकाविले. आता पुन्हा कोरोना साथीमुळे भारताची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. पण, खरे तर अर्थव्यवस्थेची ही घसरण त्याआधीच सुरूझालेली होती. कोणताही लोकशाही देश सातत्याने बळकटपणे उभ्या राहणाºया लोकशाही संस्थांच्या जोरावर टिकून राहात असतो; पण भारतात काय घडले ते पाहू.
भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची एक अत्यंत महत्त्वाची संस्था. पण, आताच्या सरकारने नोटाबंदी जाहीर करण्याआधी या संस्थेला विश्वासात घेतले नाही. सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तेस सारखे कुरतडणे सुरू केले म्हणूनच ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला, असा स्पष्ट आरोपच त्यांच्याच काळातील डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी केला आहे. सळसळत्या लोकशाहीसाठी माहिती हक्क कायदा हे एक महत्त्वाचे वरदान होते; पण तो कायदाही दुबळा केला गेला.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीच पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची वाच्यता करण्याची न भूतो घटनाही याच सरकारच्या काळात घडली. मोठा गाजावाजा करून लागू केलेल्या ‘जीएसटी’ चे पर्यवसान केंद्र व राज्यांमधील आर्थिक युद्धात झाले. कोविड-१९ सारख्या भयंकर महामारीचा प्रभावी मुकाबला करता येईल अशी कोणताही तायर कायदेशीर चौकट उपलब्ध नसल्याने सरकारने सन २००५च्या आपत्ती निवारण कायद्याचा आधार घेत देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. याच कायद्याच्या कलम ११(१) व ११(२) मध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यांच्या सल्ल्याने संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण योजना तयार करण्याचे बंधन केंद्र सरकारवर आहे. यादृष्टीने हा कायदा संघराज्यीय सहकाराचा पुरस्कार करणारा आहे. परंतु, केंद्र सरकारने कोणतीही राष्ट्रीय आपत्ती निवारण योजना तयार केली नाही किंवा ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याआधी राज्यांना साधे विचारलेही नाही. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला ‘एन्व्हायर्न्मेंट इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट’चा नवा मसुदा हा राज्यांच्या अधिकारांवर आणखी एक मोठा घाला आहे. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही केंद्राने असेच बळजबरीने राज्यांच्या माथी मारले आहे. कोरोनाने देशाची आर्थिक घडी पार विस्कटून टाकली आहे. १३ कोटी नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे व आर्थिक विकासाचा दर उणे झाला आहे. महामारीचे हे दुष्परिणाम कमी करणे आपण कोणते पर्याय निवडतो यावर अवलंबून आहे. जगाची या संकटातून लवकरात लवकर मुक्तता होवो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना करूया.आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण खालील प्रतिज्ञा करू या -देशाला गरिबी व आर्थिक विपन्नावस्थेतून मुक्त करू. देशाला अन्यायमुक्त करू. देशात पक्षपाताला थारा देणार नाही. देशात जातीय संघर्षाला थारा देणार नाही. देश सांप्रदायिक हिंसाचारापासून मुक्त करू.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन