शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

Independence Day: गांधीजींच्या विचारांना तिलांजलीने अस्थिरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 05:15 IST

आपण राष्ट्र म्हणून आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा साऱ्या क्षेत्रांत महात्मा गांधींनी सांगितलेल्या मूल्यांना गेल्या ७३ वर्षांत तिलांजली दिल्यामुळे देशात अस्थिरता वाढली आहे. आपल्याला परत राष्ट्रपित्याकडे जावेच लागेल.

- डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ गांधीवादी नेतेमहात्मा गांधींना आज जगभर सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. हजारो विचारवंत आपापल्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून सूक्ष्म परीक्षण करीत आहेत. त्यांच्या विचारांचा आजच्या संदर्भात पुनश्च विचार करून रोज नवे ग्रंथ प्रकाशित होत आहेत.लोकशाहीप्रणाली, पर्यावरण, सामाजिक ऐक्य, महायुद्ध, नरसंहार, रोगराई यांचे धोके अखिल मानवतेला चिंताग्रस्त करीत असताना सर्वजण गांधींच्या विचारांचा आश्रय घेत आहेत. त्यांचा जन्मदिन २ आॅक्टोबर. तो ‘अहिंसा दिन’ म्हणून सर्व राष्ट्रांमध्ये पाळला जातो.पर्यावरण, अहिंसा, शांततापूर्ण अन्यायाचा प्रतिकार, जगातील सर्वांच्या किमान गरजा मूठभरांच्या हावरटपणाला लगाम घातला तर सहज भागातील हे विचार त्यांनी विश्वाला दिले. मानवाने युद्ध टाळले तर गरिबांचे निर्मूलन करणे शक्य आहे, हे त्यांनी सांगितले. ते सत्ताधीशांनी मनापासून मान्य केले नसले तरी सिव्हिल सोसायटीला ते मान्य झाले आहे. गांधींना त्यांच्या निधनानंतर विश्वात अधिक लोकांना जवळचे वाटू लागले आहेत.याच्या उलट परिस्थिती भारतात आहे. त्यांनी ज्या पक्षातर्फे स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व केले, ज्या कॉँग्रेस पक्षाचे ते पिता आहेत त्यालाच त्यांचे विस्मरण झाले. अजून सामान्य भारतीय जनता त्यांना राष्ट्रपिता मानते, हे नशीब म्हणायचे. हिंदुत्ववाद्यांनी ७२ वर्षांपूर्वी त्या वृद्धावस्थेत शारीरिक हत्या केली; पण अजूनही त्यांना गांधीला संपविता आलेली नाही. ते गांधींच्या चित्रावर पिस्तुलाने गोळ्या झाडतात. नथूराम गोडसे या खुनी माणसाच्या शौर्याचे गौरवीकरण करतात. नितीन सोनवणे नावाचा एक तरुण गेली चार वर्षे जगभर सायकलवरून फिरतो आहे. त्याने गांधींचा फोटो सायकलीवर लावलाय. सर्व खंडांतून त्याच्या शांतीयात्रेला भिन्न जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. गांधींच्या देशातून आलेला माणूस त्याचे स्वागत होते. भोजन, निवास याची सोय होते.भारत एक देश म्हणून राष्ट्रपित्याला विसरला नाही; पण त्यांच्या विचारांपासून आपण नक्की फार दूर गेलो आहोत. कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करताना आपली एवढी तारांबळ का व्हावी? कारण आपण त्यांच्या स्वच्छता व आरोग्य या विषयांना दूर सारले.स्वातंत्र्याचा विचार करतानाच त्यांनी नव्या राष्ट्राच्या बांधणीचा विचार सुरू केला होता. स्वराज्यात राष्ट्र उभारायचे कसे, हे त्यांनी पंधरा कार्यक्रमांद्वारे सांगून ठेवले आहे. आपण राष्ट्र म्हणून आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा साऱ्या क्षेत्रांत महात्मा गांधींनी सांगितलेल्या मूल्यांना गेल्या ७३ वर्षांत तिलांजली दिल्यामुळे देशात अस्थिरता वाढली आहे. आपल्याला परत राष्ट्रपित्याकडे जावेच लागेल.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनMahatma Gandhiमहात्मा गांधी