शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गांधी-नेहरूंमुळेच देशाचे दोन तुकडे झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 09:52 IST

Independence Day : खरे स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मात्र रावीकिनारी भलताच झेंडा फडकत होता; कारण फाळणी झाली ती स्वातंत्र्याचीच. भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश त्या दिवशी जन्माला आले.

- संजय आवटे, संपादक, पुणे आवृत्ती 

भारताचा तिरंगा सर्वप्रथम फडकला तो ३१ डिसेंबर १९२९च्या मध्यरात्री. तो कोठे फडकला माहीत आहे? आता पाकिस्तानात असलेल्या लाहोरमध्ये. रावी नदीच्या किनारी. याच लाहोर कॉंग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला आणि मग पहाटे तिरंगा दिमाखात फडकला. 

खरे स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मात्र रावीकिनारी भलताच झेंडा फडकत होता; कारण फाळणी झाली ती स्वातंत्र्याचीच. भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश त्या दिवशी जन्माला आले. ब्रिटिशांचा डाव जुना होता. काही झाले तरी त्यांना फाळणी करूनच हा देश सोडायचा होता. मीर जाफरला लाच देऊन, ‘तुला आम्ही नवाब करू’, अशी लालूच दाखवून, घरात भांडण लावून प्लासीची लढाई जिंकलेले इंग्रज जातानाही असेच घर फोडून जाणार होते.

‘फोडा आणि झोडा’चा अवलंब त्यांनी यापूर्वी अनेकदा केला होता. जिना अथवा इक्बाल यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी करण्यापूर्वीच त्यांनी बंगालच्या फाळणीचा प्रयत्न करून पाहिला होता! १८५७च्या उठावानंतर काही काळ मुस्लीम हे इंग्रजांसाठी खलनायक ठरले. ‘इंडियन नॅशनल कॉंग्रेस’च्या स्थापनेनंतर हिंदू खलनायक झाले. मग या दोघांना वेगळे पाडण्याचे कारस्थान आखले जाऊ लागले. १९०६ मध्ये मुस्लीम लीग स्थापन होणे, हे लॉर्ड मिंटोचेच ‘ब्रेनचाइल्ड’. 

‘आयडिया ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकात स्टिफन कोहेन म्हणतात, ‘पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला मदत केली होती; पण, १९४२मध्ये गांधीजींनी ‘चले जाव’ची घोषणा दिली. दुसऱ्या महायुद्धात मदत हवी असेल तर भारताला स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन द्या, अशी अट गांधींनी ठेवली. मग ब्रिटिशांनी मुस्लीम लीगला सोबत घेतले. लष्करात तेव्हा तसेही पंजाबी मुस्लिमांचे प्रमाण मोठे होते. कॉंग्रेस मदत करत नाही, हे समजल्यानेच ब्रिटिश साशंक झाले. मग मुस्लिम लीगला जवळ केले गेले. 

‘डाव्या’ नेहरूंमुळे स्वातंत्र्यानंतर सोव्हिएत रशियासोबत भारत जाईल अथवा स्वयंप्रज्ञ राहील, अशी अटकळ जगभर बांधली जात होती. अशा वेळी, पाकिस्तान तरी आपल्यासोबत म्हणजे पाश्चात्त्य जगाबरोबर असेल आणि स्ट्रॅटेजिकली असा देश अधिक सोयीचा आहे, असा इंग्लंडचा होरा होता. हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न गांधी-नेहरू यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने केला. पण, त्यात त्यांना यश आले नाही. मुळात, ‘धर्माला राष्ट्रीयत्व मानण्याची चूक जो देश करील, त्याच्यावर आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य गमावण्याची वेळ येईल’, असा इशारा नेहरूंनी तेव्हाच दिला होता; पण, अखेर फाळणी झाली. 

फाळणी झाल्याचे शल्य आजही आहेच; पण, ज्यांचा स्वातंत्र्य आंदोलनाशी अथवा तिरंग्याशी काहीही संबंध नव्हता, अशा संघटना त्याचा शोक करतात, हे हास्यास्पद आहे. काही वेळा तर गांधी-नेहरूंनाच या फाळणीसाठी जबाबदार धरेपर्यंत काहींची मजल जाते. मग त्यांना हे सांगायलाच हवे.

होय ! गांधी-नेहरू आणि पटेलांमुळेच भारताची दोन तुकड्यांत फाळणी झाली. हे तिघे नसते, तर देशाचे शे-पाचशे तुकडे झाले असते. क्रिप्स योजनेच्या निमित्ताने ब्रिटिशांचा हाच तर डाव होता. सुमारे साडेपाचशे संस्थानांमध्ये तेव्हा देश विभागला गेला होता. या सर्व संस्थानांनी स्वातंत्र्याची मागणी केली असती, तर अराजक निर्माण झाले असते. त्यासाठी संस्थानिकांना फोडण्याचा, वातावरण पेटवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी अखेरपर्यंत केला. 

काश्मीर, हैदराबाद, जुनागढ या संस्थानांनी आडमुठेपणाचा कहर केला. मात्र, सरदार वल्लभभाई पटेल हे गांधीजींच्या तालमीत तयार झालेले पोलादी नेते होते. नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोहीम फत्ते केली आणि सगळी संस्थाने भारतात विलीन झाली! धर्माच्या पायावर उभा राहिलेल्या पाकिस्तानची पुढे पुन्हा फाळणी झाली. संविधानिक मूल्यांवर उभा ठाकलेला भारत मात्र दिमाखात झेपावत राहिला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन