शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 08:54 IST

Celebrating Happy Independence Day 2021: सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले.

- विनायक पात्रुडकर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण काय काय केले; तर सगळ्यात पहिल्यांदा १९४९ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले. १९५० साली योजना आयोग, १९५१ साली आयआयटी खरगपुर आणि पहिली पंचवार्षिक योजना, १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण, १९५६ साली एलआयसी आणि १९६५ साली हरितक्रांती; आणि या सगळ्या नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९६९ साली झालेले १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण. सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले. यानंतर देशाने सर्वात मोठे पाऊल टाकले ते म्हणजे १९९१ साली; या काळात आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारले. ही घटना आपल्यासाठी मैलाचा दगड ठरली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उचललेल्या या पावलामुळे आपण दूरदर्शी ठरलो. आर्थिक उदारीकरणाने देशाची कवाडं खुली झाली आणि अनेक पातळीवर देशाने आणि सोबतच देशवासीयांनी मोठी झेप घेतली आहे. 

टेलिकॉम रिव्होल्यूशनमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणलेल्या टेलिकॉम रिव्होल्यूशनमुळे डिजिटलायजेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. सुरुवातीच्या काळात आपली प्रगती धीमी होती, असे म्हणणे योग्य नाही. कारण माहिती तंत्रज्ञानाचे युग १९९४ नंतर सुरू झाले. तेथूनच आपल्या खऱ्या प्रगतीची सुरुवात झाली. 

डिजिटल इंडियापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा घेतलेला आधार महत्त्वाचा ठरत आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रम देशाच्या प्रगतीला पूरक ठरला. 

स्टार्टअप इंडियागेल्या २० वर्षात आणखी एक महत्त्वाचे काम झाले ते म्हणजे स्टार्टअप. याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. त्यामुळे तरुणांकडून स्वयंरोजगार निर्माण झाला. आता सरकार या तरुणांना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे.     (संदर्भ सहकार्य : नितीन पाेतदार, काॅर्पाेरेट लाॅयर) 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन