शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 08:54 IST

Celebrating Happy Independence Day 2021: सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले.

- विनायक पात्रुडकर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण काय काय केले; तर सगळ्यात पहिल्यांदा १९४९ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले. १९५० साली योजना आयोग, १९५१ साली आयआयटी खरगपुर आणि पहिली पंचवार्षिक योजना, १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण, १९५६ साली एलआयसी आणि १९६५ साली हरितक्रांती; आणि या सगळ्या नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९६९ साली झालेले १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण. सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले. यानंतर देशाने सर्वात मोठे पाऊल टाकले ते म्हणजे १९९१ साली; या काळात आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारले. ही घटना आपल्यासाठी मैलाचा दगड ठरली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उचललेल्या या पावलामुळे आपण दूरदर्शी ठरलो. आर्थिक उदारीकरणाने देशाची कवाडं खुली झाली आणि अनेक पातळीवर देशाने आणि सोबतच देशवासीयांनी मोठी झेप घेतली आहे. 

टेलिकॉम रिव्होल्यूशनमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणलेल्या टेलिकॉम रिव्होल्यूशनमुळे डिजिटलायजेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. सुरुवातीच्या काळात आपली प्रगती धीमी होती, असे म्हणणे योग्य नाही. कारण माहिती तंत्रज्ञानाचे युग १९९४ नंतर सुरू झाले. तेथूनच आपल्या खऱ्या प्रगतीची सुरुवात झाली. 

डिजिटल इंडियापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा घेतलेला आधार महत्त्वाचा ठरत आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रम देशाच्या प्रगतीला पूरक ठरला. 

स्टार्टअप इंडियागेल्या २० वर्षात आणखी एक महत्त्वाचे काम झाले ते म्हणजे स्टार्टअप. याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. त्यामुळे तरुणांकडून स्वयंरोजगार निर्माण झाला. आता सरकार या तरुणांना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे.     (संदर्भ सहकार्य : नितीन पाेतदार, काॅर्पाेरेट लाॅयर) 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन