शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

न्यायाधीशांच्या बदल्यांचे अगम्य कोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:49 IST

कर्नाटक उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जयंत पटेल यांच्या राजीनाम्याने न्यायाधीशांच्या बदल्या आणि त्यासाठी पडद्यामागे हलविली जाणारी मोहरी यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जयंत पटेल यांच्या राजीनाम्याने न्यायाधीशांच्या बदल्या आणि त्यासाठी पडद्यामागे हलविली जाणारी मोहरी यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आज सोमवारी निवृत्त झाले की न्या. पटेल कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होणार हे स्पष्ट होते. परंतु असे होण्याआधीच सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयावर बदली करण्याचे ठरविले. प्रत्यक्ष बदली आदेश निघण्यापूर्वीच न्या. पटेल यांनी राजीनामा दिला. अलाहाबादला गेले असते तर न्या. पटेल यांचा तेथे सेवाज्येष्ठतेत तिसरा क्रमांक लागला असता. परिणामी १० महिन्यांनी निवृत्त होण्याआधी कुठेही मुख्य न्यायाधीश होण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नसती. एखाद्या न्यायाधीशास त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काही महिन्यांसाठी दुसºया एखाद्या न्यायालयात पाठवून काय साध्य होते, हेही अगम्यच आहे. असा नाराज झालेला न्यायाधीश राहिलेली रजा टाकतो व रजेवर असतानाच निवृत्त होतो. म्हणजे त्याला जेथे पाठविले तेथे त्याचा कामासाठी काहीच उपयोग होत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ठिपसे यांनीही हा कटु अनुभव घेतला. फक्त त्यांनी राजीनामा दिला नाही. फार वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्या. हेमंत गोखले, न्या. व्ही. जी. पळशीकर व न्या. चित्रे या न्यायाधीशांच्या रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश उच्च न्यायालयात बदल्या केल्या गेल्या होत्या. सुमारे सात वर्षांनी त्यांना पुन्हा मुंबईत आणले गेले. यापैकी न्या. गोखले नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले व न्या. पणशीकर व न्या. चित्रे मुंबईत निवृत्त झाले. न्या. राजू मोहिते, न्या. अनिल साखरे व न्या. आर.एस. जहागिरदार या न्यायाधीशांनीही बदली स्वीकारण्याऐवजी राजीनामे दिले होते. कोणत्या तरी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले की सर्वोच्च न्यायालयावर जाण्याचा मार्ग सुकर होतो. या सर्व बदली प्रकरणात देशातील सर्व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची मिळून एकच सेवाज्येष्ठता यादी असणे हे मुख्य कारण आहे. खरे तर अशी सामायिक सेवाज्येष्ठता तद्दन बेकायदा आहे. तिला कोणत्याही कायद्याचा किंवा राज्यघटनेचा आधार नाही. देशभरासाठी एक उच्च न्यायालय व प्रत्येक राज्यात त्याची एक शाखा अशी व्यवस्था नाही. त्यामुळे प्रत्येक उच्च न्यायालयावरील न्यायाधीश हे स्वतंत्र पद आहे. राज्यघटनेत न्यायाधीशांच्या बदल्या करण्याची तरतूद जरूर आहे. पण एखाद्या न्यायाधीशाची एकाहून अधिक उच्च न्यायालयांमधील सेवा एकत्रितपणे विचारात घेऊन त्याची सेवाज्येष्ठता ठरविणे यात नक्कीच अभिप्रेत नाही. बदली होऊन गेलेला न्यायाधीश नव्या ठिकाणी पुन्हा नव्याने पदाची शपथ घेतो, यावरून हेच स्पष्ट होते. परंतु हेकेखोर सर्वोच्च न्यायालयाने ही बेकायदा सेवाज्येष्ठतेची पद्धत रुढ केली. खरे तर सर्वोच्च न्यायालय हे उच्च न्यायालयांचे ‘बॉस’ नाही. परंतु नेमणुका आणि बदल्यांचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आपल्याकडे ओरबाडून घेतल्याने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अवस्था मिंधे आणि बटिकासारखी झाली आहे. पाण्यात राहून माशाशी वैर करण्याचे धार्ष्ट्य ते करू शकत नाहीत. त्यामुळे न्यायसंस्थेचे खच्चीकरण इतर कोणी करण्याची गरज नाही. कर्करोगग्रस्त पेशींप्रमाणे स्वत: न्यायसंस्था आपल्यालाच पोखरण्याचे काम चोख करीत आहे!- अजित गोगटें्न्र३.ॅङ्मँ३ी@’ङ्म‘ें३.ूङ्मे

टॅग्स :Courtन्यायालय