शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांना ‘नाही’ म्हणत ‘फटाका’सुराचा वध केलाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 07:38 IST

आपण जेव्हा फटाके फोडतो तेव्हा मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा जाळत असतो. त्याचवेळी आपले आरोग्य, पर्यावरणाचेही आपण तीन तेरा वाजवत असतो!

डॉ. रवींद्र भुसारी, सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते

फटाके कारखान्यास आग.. बारा मृत्युमुखी.. फटाक्यांच्या दुकानाला आग.. पाच जखमी.. फटाक्यांमुळे भाजून जखमी.. फटाक्यांमुळे आग लागून लाखोंचे नुकसान.. अशा बातम्या दिवाळीच्या काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात वाचायला आणि ऐकायला मिळतात. तरीसुद्धा फटाके फोडून आम्ही विकृत आनंद व्यक्त करीत राहतो. पैसा जाळून आपण कसा आनंद व्यक्त करू शकतो? आनंद व्यक्त करण्याची ही कसली घातक आणि प्रदूषक रीत आपण शोधली आहे? 

आपण जेव्हा फटाके जाळतो तेव्हा कठोर कष्टाने कमावलेला पैसा जाळीत असतो. आजही आपल्या देशातील अनेक जण बेघर आहेत. अशी बेघर शहरे आणि गरिबांची लोकसंख्या सतत वाढते आहे. बेरोजगारीचा प्रश्न बिकट बनला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, आपल्याला माहीत असलेला सर्वात गरीब आठवा आणि त्याचा चेहरा नजरेसमोर आणा. नंतर आपण जी कृती करणार त्याने त्या गरीब माणसाला काय फायदा होणार आहे, याचा विचार करा. मग नक्कीच आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

फटाक्यांच्या ज्वलनामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दमा, डोळे चुरचुरणे, आग होणे, श्वसन मार्गाचा दाह, घसा खाजणे, असे प्रदूषित वायूमुळे अनेक दुष्परिणाम होतात. प्रचंड आवाजामुळे अकाली बहिरेपणाकडे होणारी वाटचाल ठरू शकते. निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, सततची सर्दी, खोकला यामुळे आम्ही आमचे आयुष्य कमी करतो. फटाक्यांच्या स्फोटांमुळे होणारी आवाजाची तीव्रता ११५ ते १२० डेसिबल्सपेक्षाही अधिक असते. साधारणतः ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ एवढा मोठा आवाज कानावर पडल्यास कानांना तात्पुरती किंवा कायमची इजा होऊ शकते. अचानक मोठा फटाका खूप जवळ फुटल्यास कानांचे पडदे फाटण्याचीही शक्यता असते.

ध्वनिप्रदूषण नियमानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल्स तर रात्री ४५ डेसिबल्सपर्यंत आवाज मर्यादा आहे. त्यापेक्षा दहा डेसिबल्स  इतका आवाज जास्त झाला तरी पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. फटाके उडविणे किंवा फोडणे त्यामुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण दोन्ही होत असल्याने हा आरोग्यासाठी अधिक धोकादायक प्रकार आहे. दिवाळी या प्रकाशाच्या सणाला आम्ही आवाजाच्या गोंगाटाचे स्वरूप दिले, ते बदलायला हवे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषण पातळीचा अहवाल तयार करीत असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषण पातळी दुपटीने वाढते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारी लहान मुले, बालमजूर..यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आणले तर, फटाके उडवून आम्ही विकृत आनंद घेतो, हे सहज लक्षात येईल. आपण जेव्हा दिवाळीत फटाके उडवीत असतो तेव्हा फटाक्यांमध्ये बारुद भरणारे हात कुठेतरी मृत्यूशी झगडत असतात. दवाखान्यांमध्ये मरणासन्न अवस्थेत झुंजत असतात. 

दिवाळीच्या वेळी सर्वांना सुटी असते. परगावी शिकायला आणि नोकरी निमित्ताने बाहेर असणारे कुटुंबातील सदस्य घरी येतात; पण नेमके अशाच वेळी आम्ही फटाक्यांचे कर्णकर्कश दणादण आवाज आणि हवेचे प्रदूषण करतो. मुलांना फटाके फोडण्यात आनंद मिळतो, असं कारण अनेक जण सांगतात. परंतु त्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल आम्ही एकदा तरी समजावून सांगतो का? मंगलतेबरोबर दंगल आणि गोंगाट चुकीचा आहे. माणुसकीशी आणि निसर्गाशी नाते जोडायचे असेल तर, फटाक्यांना ‘नाही’ म्हणावेच लागेल. आता फटाकासुराचा वध झालाच पाहिजे. तेव्हाच आम्ही सात्विक आनंदाचे जीवन जगू शकतो.

 

टॅग्स :environmentपर्यावरणHealthआरोग्य