शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांना ‘नाही’ म्हणत ‘फटाका’सुराचा वध केलाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 07:38 IST

आपण जेव्हा फटाके फोडतो तेव्हा मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा जाळत असतो. त्याचवेळी आपले आरोग्य, पर्यावरणाचेही आपण तीन तेरा वाजवत असतो!

डॉ. रवींद्र भुसारी, सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते

फटाके कारखान्यास आग.. बारा मृत्युमुखी.. फटाक्यांच्या दुकानाला आग.. पाच जखमी.. फटाक्यांमुळे भाजून जखमी.. फटाक्यांमुळे आग लागून लाखोंचे नुकसान.. अशा बातम्या दिवाळीच्या काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात वाचायला आणि ऐकायला मिळतात. तरीसुद्धा फटाके फोडून आम्ही विकृत आनंद व्यक्त करीत राहतो. पैसा जाळून आपण कसा आनंद व्यक्त करू शकतो? आनंद व्यक्त करण्याची ही कसली घातक आणि प्रदूषक रीत आपण शोधली आहे? 

आपण जेव्हा फटाके जाळतो तेव्हा कठोर कष्टाने कमावलेला पैसा जाळीत असतो. आजही आपल्या देशातील अनेक जण बेघर आहेत. अशी बेघर शहरे आणि गरिबांची लोकसंख्या सतत वाढते आहे. बेरोजगारीचा प्रश्न बिकट बनला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, आपल्याला माहीत असलेला सर्वात गरीब आठवा आणि त्याचा चेहरा नजरेसमोर आणा. नंतर आपण जी कृती करणार त्याने त्या गरीब माणसाला काय फायदा होणार आहे, याचा विचार करा. मग नक्कीच आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

फटाक्यांच्या ज्वलनामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दमा, डोळे चुरचुरणे, आग होणे, श्वसन मार्गाचा दाह, घसा खाजणे, असे प्रदूषित वायूमुळे अनेक दुष्परिणाम होतात. प्रचंड आवाजामुळे अकाली बहिरेपणाकडे होणारी वाटचाल ठरू शकते. निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, सततची सर्दी, खोकला यामुळे आम्ही आमचे आयुष्य कमी करतो. फटाक्यांच्या स्फोटांमुळे होणारी आवाजाची तीव्रता ११५ ते १२० डेसिबल्सपेक्षाही अधिक असते. साधारणतः ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ एवढा मोठा आवाज कानावर पडल्यास कानांना तात्पुरती किंवा कायमची इजा होऊ शकते. अचानक मोठा फटाका खूप जवळ फुटल्यास कानांचे पडदे फाटण्याचीही शक्यता असते.

ध्वनिप्रदूषण नियमानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल्स तर रात्री ४५ डेसिबल्सपर्यंत आवाज मर्यादा आहे. त्यापेक्षा दहा डेसिबल्स  इतका आवाज जास्त झाला तरी पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. फटाके उडविणे किंवा फोडणे त्यामुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण दोन्ही होत असल्याने हा आरोग्यासाठी अधिक धोकादायक प्रकार आहे. दिवाळी या प्रकाशाच्या सणाला आम्ही आवाजाच्या गोंगाटाचे स्वरूप दिले, ते बदलायला हवे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषण पातळीचा अहवाल तयार करीत असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषण पातळी दुपटीने वाढते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारी लहान मुले, बालमजूर..यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आणले तर, फटाके उडवून आम्ही विकृत आनंद घेतो, हे सहज लक्षात येईल. आपण जेव्हा दिवाळीत फटाके उडवीत असतो तेव्हा फटाक्यांमध्ये बारुद भरणारे हात कुठेतरी मृत्यूशी झगडत असतात. दवाखान्यांमध्ये मरणासन्न अवस्थेत झुंजत असतात. 

दिवाळीच्या वेळी सर्वांना सुटी असते. परगावी शिकायला आणि नोकरी निमित्ताने बाहेर असणारे कुटुंबातील सदस्य घरी येतात; पण नेमके अशाच वेळी आम्ही फटाक्यांचे कर्णकर्कश दणादण आवाज आणि हवेचे प्रदूषण करतो. मुलांना फटाके फोडण्यात आनंद मिळतो, असं कारण अनेक जण सांगतात. परंतु त्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल आम्ही एकदा तरी समजावून सांगतो का? मंगलतेबरोबर दंगल आणि गोंगाट चुकीचा आहे. माणुसकीशी आणि निसर्गाशी नाते जोडायचे असेल तर, फटाक्यांना ‘नाही’ म्हणावेच लागेल. आता फटाकासुराचा वध झालाच पाहिजे. तेव्हाच आम्ही सात्विक आनंदाचे जीवन जगू शकतो.

 

टॅग्स :environmentपर्यावरणHealthआरोग्य