शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

फटाक्यांना ‘नाही’ म्हणत ‘फटाका’सुराचा वध केलाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 07:38 IST

आपण जेव्हा फटाके फोडतो तेव्हा मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा जाळत असतो. त्याचवेळी आपले आरोग्य, पर्यावरणाचेही आपण तीन तेरा वाजवत असतो!

डॉ. रवींद्र भुसारी, सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते

फटाके कारखान्यास आग.. बारा मृत्युमुखी.. फटाक्यांच्या दुकानाला आग.. पाच जखमी.. फटाक्यांमुळे भाजून जखमी.. फटाक्यांमुळे आग लागून लाखोंचे नुकसान.. अशा बातम्या दिवाळीच्या काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात वाचायला आणि ऐकायला मिळतात. तरीसुद्धा फटाके फोडून आम्ही विकृत आनंद व्यक्त करीत राहतो. पैसा जाळून आपण कसा आनंद व्यक्त करू शकतो? आनंद व्यक्त करण्याची ही कसली घातक आणि प्रदूषक रीत आपण शोधली आहे? 

आपण जेव्हा फटाके जाळतो तेव्हा कठोर कष्टाने कमावलेला पैसा जाळीत असतो. आजही आपल्या देशातील अनेक जण बेघर आहेत. अशी बेघर शहरे आणि गरिबांची लोकसंख्या सतत वाढते आहे. बेरोजगारीचा प्रश्न बिकट बनला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, आपल्याला माहीत असलेला सर्वात गरीब आठवा आणि त्याचा चेहरा नजरेसमोर आणा. नंतर आपण जी कृती करणार त्याने त्या गरीब माणसाला काय फायदा होणार आहे, याचा विचार करा. मग नक्कीच आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

फटाक्यांच्या ज्वलनामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दमा, डोळे चुरचुरणे, आग होणे, श्वसन मार्गाचा दाह, घसा खाजणे, असे प्रदूषित वायूमुळे अनेक दुष्परिणाम होतात. प्रचंड आवाजामुळे अकाली बहिरेपणाकडे होणारी वाटचाल ठरू शकते. निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, सततची सर्दी, खोकला यामुळे आम्ही आमचे आयुष्य कमी करतो. फटाक्यांच्या स्फोटांमुळे होणारी आवाजाची तीव्रता ११५ ते १२० डेसिबल्सपेक्षाही अधिक असते. साधारणतः ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ एवढा मोठा आवाज कानावर पडल्यास कानांना तात्पुरती किंवा कायमची इजा होऊ शकते. अचानक मोठा फटाका खूप जवळ फुटल्यास कानांचे पडदे फाटण्याचीही शक्यता असते.

ध्वनिप्रदूषण नियमानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल्स तर रात्री ४५ डेसिबल्सपर्यंत आवाज मर्यादा आहे. त्यापेक्षा दहा डेसिबल्स  इतका आवाज जास्त झाला तरी पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. फटाके उडविणे किंवा फोडणे त्यामुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण दोन्ही होत असल्याने हा आरोग्यासाठी अधिक धोकादायक प्रकार आहे. दिवाळी या प्रकाशाच्या सणाला आम्ही आवाजाच्या गोंगाटाचे स्वरूप दिले, ते बदलायला हवे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषण पातळीचा अहवाल तयार करीत असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषण पातळी दुपटीने वाढते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारी लहान मुले, बालमजूर..यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आणले तर, फटाके उडवून आम्ही विकृत आनंद घेतो, हे सहज लक्षात येईल. आपण जेव्हा दिवाळीत फटाके उडवीत असतो तेव्हा फटाक्यांमध्ये बारुद भरणारे हात कुठेतरी मृत्यूशी झगडत असतात. दवाखान्यांमध्ये मरणासन्न अवस्थेत झुंजत असतात. 

दिवाळीच्या वेळी सर्वांना सुटी असते. परगावी शिकायला आणि नोकरी निमित्ताने बाहेर असणारे कुटुंबातील सदस्य घरी येतात; पण नेमके अशाच वेळी आम्ही फटाक्यांचे कर्णकर्कश दणादण आवाज आणि हवेचे प्रदूषण करतो. मुलांना फटाके फोडण्यात आनंद मिळतो, असं कारण अनेक जण सांगतात. परंतु त्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल आम्ही एकदा तरी समजावून सांगतो का? मंगलतेबरोबर दंगल आणि गोंगाट चुकीचा आहे. माणुसकीशी आणि निसर्गाशी नाते जोडायचे असेल तर, फटाक्यांना ‘नाही’ म्हणावेच लागेल. आता फटाकासुराचा वध झालाच पाहिजे. तेव्हाच आम्ही सात्विक आनंदाचे जीवन जगू शकतो.

 

टॅग्स :environmentपर्यावरणHealthआरोग्य