शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

फटाक्यांना ‘नाही’ म्हणत ‘फटाका’सुराचा वध केलाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 07:38 IST

आपण जेव्हा फटाके फोडतो तेव्हा मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा जाळत असतो. त्याचवेळी आपले आरोग्य, पर्यावरणाचेही आपण तीन तेरा वाजवत असतो!

डॉ. रवींद्र भुसारी, सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते

फटाके कारखान्यास आग.. बारा मृत्युमुखी.. फटाक्यांच्या दुकानाला आग.. पाच जखमी.. फटाक्यांमुळे भाजून जखमी.. फटाक्यांमुळे आग लागून लाखोंचे नुकसान.. अशा बातम्या दिवाळीच्या काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात वाचायला आणि ऐकायला मिळतात. तरीसुद्धा फटाके फोडून आम्ही विकृत आनंद व्यक्त करीत राहतो. पैसा जाळून आपण कसा आनंद व्यक्त करू शकतो? आनंद व्यक्त करण्याची ही कसली घातक आणि प्रदूषक रीत आपण शोधली आहे? 

आपण जेव्हा फटाके जाळतो तेव्हा कठोर कष्टाने कमावलेला पैसा जाळीत असतो. आजही आपल्या देशातील अनेक जण बेघर आहेत. अशी बेघर शहरे आणि गरिबांची लोकसंख्या सतत वाढते आहे. बेरोजगारीचा प्रश्न बिकट बनला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, आपल्याला माहीत असलेला सर्वात गरीब आठवा आणि त्याचा चेहरा नजरेसमोर आणा. नंतर आपण जी कृती करणार त्याने त्या गरीब माणसाला काय फायदा होणार आहे, याचा विचार करा. मग नक्कीच आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

फटाक्यांच्या ज्वलनामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दमा, डोळे चुरचुरणे, आग होणे, श्वसन मार्गाचा दाह, घसा खाजणे, असे प्रदूषित वायूमुळे अनेक दुष्परिणाम होतात. प्रचंड आवाजामुळे अकाली बहिरेपणाकडे होणारी वाटचाल ठरू शकते. निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, सततची सर्दी, खोकला यामुळे आम्ही आमचे आयुष्य कमी करतो. फटाक्यांच्या स्फोटांमुळे होणारी आवाजाची तीव्रता ११५ ते १२० डेसिबल्सपेक्षाही अधिक असते. साधारणतः ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ एवढा मोठा आवाज कानावर पडल्यास कानांना तात्पुरती किंवा कायमची इजा होऊ शकते. अचानक मोठा फटाका खूप जवळ फुटल्यास कानांचे पडदे फाटण्याचीही शक्यता असते.

ध्वनिप्रदूषण नियमानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल्स तर रात्री ४५ डेसिबल्सपर्यंत आवाज मर्यादा आहे. त्यापेक्षा दहा डेसिबल्स  इतका आवाज जास्त झाला तरी पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. फटाके उडविणे किंवा फोडणे त्यामुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण दोन्ही होत असल्याने हा आरोग्यासाठी अधिक धोकादायक प्रकार आहे. दिवाळी या प्रकाशाच्या सणाला आम्ही आवाजाच्या गोंगाटाचे स्वरूप दिले, ते बदलायला हवे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषण पातळीचा अहवाल तयार करीत असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषण पातळी दुपटीने वाढते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारी लहान मुले, बालमजूर..यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आणले तर, फटाके उडवून आम्ही विकृत आनंद घेतो, हे सहज लक्षात येईल. आपण जेव्हा दिवाळीत फटाके उडवीत असतो तेव्हा फटाक्यांमध्ये बारुद भरणारे हात कुठेतरी मृत्यूशी झगडत असतात. दवाखान्यांमध्ये मरणासन्न अवस्थेत झुंजत असतात. 

दिवाळीच्या वेळी सर्वांना सुटी असते. परगावी शिकायला आणि नोकरी निमित्ताने बाहेर असणारे कुटुंबातील सदस्य घरी येतात; पण नेमके अशाच वेळी आम्ही फटाक्यांचे कर्णकर्कश दणादण आवाज आणि हवेचे प्रदूषण करतो. मुलांना फटाके फोडण्यात आनंद मिळतो, असं कारण अनेक जण सांगतात. परंतु त्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल आम्ही एकदा तरी समजावून सांगतो का? मंगलतेबरोबर दंगल आणि गोंगाट चुकीचा आहे. माणुसकीशी आणि निसर्गाशी नाते जोडायचे असेल तर, फटाक्यांना ‘नाही’ म्हणावेच लागेल. आता फटाकासुराचा वध झालाच पाहिजे. तेव्हाच आम्ही सात्विक आनंदाचे जीवन जगू शकतो.

 

टॅग्स :environmentपर्यावरणHealthआरोग्य