शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

प्रतिमा भंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:31 IST

काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे.

मिलींद कुलकर्णीखान्देशातील धुळे हे शहर सांस्कृतिक, साहित्यिक, पुरोगामी, औद्योगिक विकासाकडे वाटचाल करणारे शहर म्हणून लौकिकप्राप्त आहे. मु.ब.शहा, मुकुंद धाराशिवकर, पुरुषोत्तम पाटील, अनिल सोनार, कॉ.शरद पाटील, झेड.बी.पाटील, पी.डी.दलाल, डॉ.एन.के.ठाकरे यांच्यासारख्या विविध क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्ती, श्री समर्थ वाग्देवता मंदीर, राजवाडे संशोधन मंडळ, गरुड वाचनालय, जयहिंद शिक्षण संस्था, कमलाबाई विद्यालय यासारख्या अनेक संस्था, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती या पुरोगामी चळवळींना मिळालेले जनसमर्थन हे सगळे धुळ्याचे वैभव आहे. काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला मिळालेली चालना उत्साहवर्धक आहे. या आशादायी वातावरणात भूतकाळात घडलेले भास्कर वाघ प्रकरण, तेलगी प्रकरण विस्मृतीत जात असताना पुन्हा धुळ्याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे. ११ महिन्यांमध्ये खुनाच्या तब्बल ६ घटना घडल्या. पारोळा रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सकाळी हॉटेलमध्ये १५-२० लोक येऊन शस्त्रांचा बेछूट वापर करीत खून करुन पळून जातात. देवपूरसारख्या भागात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ७-८ लोक शस्त्र घेऊन बाप-बेट्याचा निर्दयी खून करतात. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणा-या या घटना आहेत. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या विनयकुमार चौबे यांनी गेल्या महिन्यात अवैध शस्त्र आणि गुंडांविरुध्द मोहीम राबविण्याचे आदेश दिल्याने खान्देशात सर्वत्र मोठा शस्त्रसाठा जप्त झाला. तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. याचा अर्थ बिनबोभाटपणे अवैध व्यवसाय सुरु होते. चौबे यांनी लक्ष दिले नसते, तर ते सुरुच राहिले असते. ही मोहीम राबविल्यानंतरही खून होतो, या गुन्हयात तलवारी, कुकरी, चाकू अशा शस्त्रांचा वापर होतो. त्यातून या मोहिमेच्या यशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणा-या ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला घरात घुसून मारहाण या घटना पोलीस दलाच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करणाºया आहेत. वर्षाखेर होणाºया जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून तर वातावरण दूषित केले जात नाही ना, अशी शंका घेण्याला वाव आहे. सत्ताधारी आमदार मुख्यमंत्र्यांकडील गृहखात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कृती, महिलांना स्वसंरक्षणार्थ काठ्या वाटप करतात, त्यात सारे आले असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा