शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएलएफएस’चा सरकार पुरस्कृत बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:31 IST

आयएलएफएस या नावाने ओळखली जाणारी कंपनी ही आयुर्विमा महामंडळ, सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि स्टेट बँक आॅफ इंडिया यांच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीने भारतातील जम्मू-काश्मिरातील सर्वात मोठ्या बोगद्यातील रस्त्याला वित्तपुरवठा केलेला आहे.

- डॉ. भारत झुनझुनवाला आयएलएफएस या नावाने ओळखली जाणारी कंपनी ही आयुर्विमा महामंडळ, सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि स्टेट बँक आॅफ इंडिया यांच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीने भारतातील जम्मू-काश्मिरातील सर्वात मोठ्या बोगद्यातील रस्त्याला वित्तपुरवठा केलेला आहे. हा रस्ता जम्मूला काश्मिरी चेनानी-नाशरी या नऊ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातील रस्त्याने जोडतो. आयएलएफएस कंपनीने प्रचंड मोठाली कर्जे दिली, पण नॅशनल हायवेज अथॉरिटी आॅफ इंडिया या संस्थेमार्फत सरकारची देणी या कंपनीला परत मिळाली नाहीत. त्याला अन्य कारणांसोबत प्रकल्पाच्या किमतीतील वाढ, रेटिंग एजन्सीचा वाढता कर्जबोजा दाखविण्यात आलेले अपयश आणि हे अपयश वित्त मंत्रालयाच्या नजरेस आणण्यात संचालकांना आलेले अपयश, हेही कारणीभूत ठरले. पण माझ्या अंदाजाप्रमाणे हेही विषय तसे मामुलीच म्हणावे लागतील. वास्तविक आयएलएफएस (इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस) ही कंपनी चांगले काम करीत होती. पण तिने आत्मप्रौढीने न पेलणारे कर्ज घेतले आणि ती कंपनी कर्जातच अडकली!पण रेटिंग एजन्सी, कर्ज देणाऱ्या बँका आणि स्वतंत्र  संचालक यांना आयएलएफएसचे अपयश सार्वजनिक का करता आले नाही? ती जबाबदारी अखेर वित्तमंत्र्यांवर येऊन पडते. या कंपनीवर सरकारचे एलआयसी, एचडीएफसी, सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि स्टेट बँक आॅफ इंडिया यांच्यामार्फत नियंत्रण होते तेव्हा कंपनीच्या अपयशाबद्दल या संस्थेच्या सरकार नियुक्त प्रमुखांवर जबाबदारी ठेवायला हवी. या कंपनीला अपयश येत असताना कंपनीचे चेअरमन रवी पार्थसारथी यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एलआयसीचे प्रबंध संचालक हेमंत भार्गव यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे भार्गव यांनीही राजीनामा दिल्यावर एलआयसीचे माजी चेअरमन एस.बी. माथुर यांची नेमणूक करण्यात आली. या तºहेने एकामागून एक अविचारी अधिकारी बदलण्याचे काम वित्तमंत्र्यांच्या सहकार्याशिवाय होऊच शकत नाही. आयएलएफसीचे दुखणे काय आहे हे आयुर्विमा महामंडळाला ठाऊक होते आणि त्याच्या माध्यमातून ते वित्तमंत्र्यांना कळले होते. पण ही संस्था सुरू ठेवण्याच्या हव्यासापोटी अर्थमंत्र्यांनी या अधिकाºयांचा आवाज दाबून टाकला. हा वाळूने बांधलेला किल्ला अखेर कोसळलाच!चांगल्या उद्दिष्टांनी सुरू केलेली ही पायाभूत सुविधा देणारी संस्था का कोसळली? सरकारने चांगल्या हेतूने ही संस्था सुरू केली होती. पण सरकारच्या अन्य हेतूंशी संस्थेचा संघर्ष झाला. मोठ्या उद्योगांचा पुरस्कार  करण्याच्या हव्यासापायी या संस्थेने लहान उद्योगांचा गळा घोटला. त्यामुळे तळाचे अर्थकारण कोलमडून पडले. आपला जीडीपीचा विकास दर ६.९ टक्क्यांवर सपाट झाला तरीही सेन्सेक्स मात्र उंचावत राहिला. जीडीपीचा विकास दर कायम असणे याचा अर्थ आपले अर्थकारण साधारण दराने विकास पावत आहे असा होतो. सेन्सेक्सची उसळी हे दर्शविते की बडे उद्योजक हे कमालीचे कृतिशील आहेत. त्याचा दुसरा अर्थ लघू आणि मध्यम उद्योग हे आकुंचन पावत आहेत!तात्पर्य हे आहे की आयएलएफएसचा बोजवारा आंतरविरोधी धोरणामुळे उडाला आहे. चुकीच्या पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या कंपनीत आयुर्विमा आणि  म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केली असली तरी तो पैसा  सामान्य गुंतवणूकदारांचा होता. आपल्या अर्थमंत्र्यांनी बड्या उद्योगांना पायाभूत सोयी पुरविण्याच्या नावाखाली आपली तळागाळाची अर्थव्यवस्था मात्र उद्ध्वस्त केली. आयुर्विम्यात तसेच म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीला याचा मोठा फटका बसणार आहे. 

टॅग्स :Indiaभारत