शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

देशातील बहुसंख्य शेतकरी असंतुष्ट राहिले तर मोदी सरकारला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:22 IST

शेतमालाची साठेबाजी, प्रतिकूल हवामान आणि बँकांचा वसुलीचा त्रास यामुळे आत्महत्या थांबलेल्या नाहीत महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे राज्य सरकारने तत्त्वानुसार कर्जमाफी स्वीकारली.

- प्रभाकर कुलकर्णी( लेखक वरिष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत )देशातील शेती क्षेत्रात असंतोष आहे. शेतमालाला हमी भाव नाही व निर्यात धोरण अनुकूल नाही. शेतमालाची साठेबाजी, प्रतिकूल हवामान आणि बँकांचा वसुलीचा त्रास यामुळे आत्महत्या थांबलेल्या नाहीत महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे राज्य सरकारने तत्त्वानुसार कर्जमाफी स्वीकारली. कर्जाची माफी मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली . पण या सुविधा सर्व गावात नाहीत आणि तेवढी तांत्रिक माहिती सर्व शेतकºयांना नसल्यामुळे या सर्व सोपस्काराचा आधार मिळाला नाही. तपशिलातील या गोंधळामुळे भाजपा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेस व विरोधी पक्षांना संधी मिळाली आणि शेतीक्षेत्रात अशांतता निर्माण झाली आहे.निश्चित मर्यादेपर्यंत कर्ज त्वरित माफ करणे व कोणत्याही स्वरूपाचा किंवा तांत्रिक अडथळा न होता त्रस्त शेतकºयांना मदतीचा हात देणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे निराश झालेल्या शेतकºयांना असे आश्वासन देण्यात येते की कर्जाचा विळखा सुटत आहे आणि गंभीर उदासीनतेमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज नाही. याशिवाय राज्य सरकारच्या गॅरंटीनुसार सर्व शेतकºयांना १० हजार रुपयांची त्वरित सवलत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना बँकांनी प्रतिसाद दिला असता तरीही हे शक्य झाले असते. बँकांनी नकार दिला. मग मुख्यमंत्र्यांनी बँकांवर कारवाई करण्याची धमकी दिली. जर संतप्त शेतकरी हिंसक बनतील व बँकांविरोधी आंदोलन करतील तर नकारात्मक भूमिका घेणाºया बँकांना संरक्षण दिले जाणार नाही, असाही दम दिला. मग फडणवीस सरकारने कारवाई का केली नाही ? कारवाई करण्यास सरकार अयशस्वी ठरले.बँका आपल्या नकारात्मक भूमिकेपासून धडा शिकल्या नाहीत . काही बँक व्यवस्थापकांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक किंवा नाबार्डकडून कोणतीही सूचना नसल्यामुळे ते काही करू शकले नाहीत. पण रिझर्व्ह बँक व नाबार्ड हे दोन शेतकरी हितविरोधी म्हणून ओळखले जातात. शेतकºयांचे कर्ज माफ केले तर रिझर्व्ह बँकेने कर्ज शिस्त बिघडली अशी ओरड केली. नाबार्डने सुप्रीम कोर्टात शेतकरी हितविरोधी अपील केले.मुंबई हायकोर्टाने ४४ हजार शेतकºयांना दिलासा दिला होता ज्याना पूर्वीच्या काँग्रेसच्या काळात कर्जमाफी देण्यात आली होती आणि नाबार्डला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असताना रु . ९० कोटी जे आता व्याजासह २५० कोटी परत दिले पाहिजेत. ही रक्कम परत देण्याऐवजी नाबार्डने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. शेतकºयांचे हित जोपासण्यासाठी ज्या बँकेचा जन्म झाला त्याच नाबार्डने शेतकरीविरोधी पवित्रा घेतला हे विशेष .भाजपच्या एका खासदाराने दिल्लीतील एका पत्रकाराला सांगितले की, जर मोदी सरकारला अपयशाच्या संकटाला सामोरे जावे लागले तर ते संकट देशातील बहुतेक मतदारांची संख्या असणारे शेतकरी निर्माण करतील.माध्यमातून प्रकट झालेल्या या संभाषणामध्ये सूचित केलेला संदेश मोदी सरकारला संभाव्य आव्हान म्हणून विचार करायला भाग पाडेल. याचे स्पष्टीकरण असे दिसते की, कॉंग्रेसने रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँका स्थापन केल्या आहेत आणि जर त्यांनी ठरविले की शेतकरी क्षेत्रातील अशांतता इतकी सातत्याने चालू ठेवत राहायचे की ते २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारविरुद्ध बहुसंख्य शेतकरी मते देतील व सरकार पडेल.कारण मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेचे प्रमुख बदलले असले तरी रिझर्व्ह बँकेतील अन्य बोर्ड सदस्य व सर्व राष्ट्रीयीकृत बँकातील संचालक आणि नाबार्ड हे काँग्रेसने नेमलेले आहेत. बँकिंग प्रणालीवर त्यांचे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे शेतकºयांना असंतुष्ट ठेवण्याचे उद्दिष्ट ते कायम ठेवू शकतात. ही रणनीती असेल तर मोदी सरकारला ते आव्हान आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी