शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वाचनीय लेख- रोजगार वाढले, तर कमाई कशी घटली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 05:50 IST

बेरोजगारीमध्ये घट होण्याचे कारण चांगला रोजगार मिळणे नव्हे तर नाइलाजाने मिळणारा रोजगार वाढला, हे कटुसत्य आहे.

योगेंद्र यादव

ज्या देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी आहे आणि काम करणाऱ्यांची कमाई अजिबात वाढत नाही, त्या देशाची अर्थव्यवस्था जगात अग्रणी स्थान प्राप्त करू शकेल, याची आपण कल्पना करू शकतो? भारतीय अर्थव्यवस्थेतले हे एक मोठे व्यंग आहे. एकीकडे भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होत असल्याचे ढोल पिटले जात आहेत, त्याच देशात रोजगारीचे वास्तव या दाव्यांवर पाणी फिरवत आहे. टीव्हीच्या पडद्यावर अर्थव्यवस्थेचे चित्र भले कितीही गुलाबी दाखवले जात असेल, टीव्ही पाहणाऱ्या प्रत्येक घराला हे ठाऊक आहे की शिकले सवरलेले तरुण-तरुणी बेकार बसलेले आहेत. एकतर काम मिळत नाही आणि मिळाले तर शिक्षण आणि योग्यतेनुसार मिळत नाही. अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका राष्ट्रीय अहवालाने आकडेवारीच्या आधाराने हे वास्तव उघडे केले आहे. ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया’ या नावाचा हा वार्षिक अहवाल अजिम प्रेमजी विद्यापीठातील प्राध्यापक अमित बसोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केला आहे. अहवालाच्या चौथ्या आवृत्तीत रोजगाराच्या सामाजिक बाजूवर जास्त भर दिला गेला असून वेगवेगळे समुदाय तसेच स्त्रिया आणि पुरुष यांच्या बाबतीत रोजगाराच्या संदर्भात काय तफावत आहे हे यात मांडले गेले आहे; परंतु, देशातले बेरोजगारीचे संपूर्ण चित्र काय आहे हे सर्वात आधी पाहिले पाहिजे. भारत सरकारच्या पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेने प्रकाशित केलेल्या आकड्यांवर हा अहवाल आधारित आहे हे येथे सांगितले पाहिजे. तात्पर्य सरकार वास्तव नाकारू शकत नाही.     

या अहवालात प्रकाशित झालेले नवीन आकडे २०२१-२२ सालातले असून या काळात देशात एकूण ५२.८ कोटी लोक रोजगाराच्या शोधात होते त्यांच्यापैकी ४९.३ कोटी लोक कुठल्या ना कुठल्या रोजगारावर होते आणि बाकी ३.५ टक्के लोक बेरोजगार होते. याचा अर्थ हा बेरोजगारीचा दर ६.६ टक्के इतका होतो. या आधारे असे म्हणता येईल की देशातला बेरोजगारी दर गेल्या पाच वर्षांत सर्वात कमी झाला होता; परंतु, या अहवालात दाखवण्यात आलेल्या तीन कटू सत्यांकडे लक्ष द्यावे लागेल. भारतात बेरोजगारीचे आकडे जर कमी दिसत असतील तर ते वास्तवात तसे नाही. सर्वांना आपल्या पसंतीचा रोजगार मिळालेला नाही. बहुतांश बेरोजगारांची परिस्थिती इतकी वाईट आहे की ते बेरोजगार राहू शकत नाहीत. जे काम मिळेल ते त्यांना नाईलाजाने करावे लागते. बेरोजगारीचे वास्तव १८ ते २५ वर्षाच्या तरुणांमध्ये नेमके दिसते, जे आपल्या पसंतीचा रोजगार शोधत असतात. जर या वयोगटातील तरुणांचे २०२१-२२ चे आकडे पाहिले तर भयानक परिस्थिती समोर येते. बेरोजगारीचे प्रमाण राष्ट्रीय टक्केवारीच्या तीनपट पेक्षाही जास्त आहे. या वर्गातील अशिक्षित तरुणांत १३ टक्के बेरोजगारी आहे. दहावी पास तरुणांत २१ टक्के आणि पदवीधर तरुणांमध्ये ४२ टक्के बेरोजगारी आहे. शिक्षितांच्या बेरोजगारीचे हे देशपातळीवरचे चित्र लाजिरवाणे आणि चिंतेचा विषय आहे.

बेरोजगारीमध्ये घट होण्याचे कारण चांगला रोजगार मिळणे नव्हे तर नाईलाजाने मिळणारा रोजगार वाढणे हे दुसरे कटू सत्य होय. कोविडनंतर शेती आणि स्वयंरोजगारामध्ये वाढ झाली असे हा अहवाल सांगतो; याचा अर्थ चांगली नोकरी सोडून लोक गावाकडे जाऊन शेती करू लागले किंवा आपले छोटे- मोठे काम करायला त्यांनी सुरुवात केली. याचा खरा परिणाम महिलांवर झाला आहे. कोविडच्या आधी शेतीत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ६० टक्के होते. कोविडनंतर ते वाढून आता ६९ टक्के झाले आहे. याचप्रकारे स्वयंरोजगार सुरू करणाऱ्या महिलांचे प्रमाणही ५१ टक्क्यांवरून ६० टक्के झाले आहे. ही रोजगारातील वाढ नसून उलट गुणवत्तेत घट होण्याची चिन्हे आहेत.

अहवालातील तिसऱ्या चिंताजनक तथ्यामुळे या सगळ्याची पुष्टी होते. सांगण्यासाठी कोविडनंतर रोजगारात वाढ झाली आहे; परंतु, लोकांची कमाई मात्र वाढलेली नाही. जर २०२२ च्या मूल्यांच्या आधारावर पाहिले तर नोकरी करणारे आणि स्वयंरोजगार करणारे यांची कमाई गेल्या पाच वर्षात कोठेही बदललेली नाही. २०१७-१८ मध्ये नियमित नोकरी करणाऱ्याचा मासिक पगार जर १९,४५० रुपये होता तर तो २०२१-२२ मध्ये तो १९,४५६ वर थांबला आहे. स्वत:चा रोजगार करणाऱ्याची कमाई पाच वर्षांपूर्वी १२,३१८ रुपये होती. ती आता १२,०५९ रुपये झालेली आहे. येथेही स्त्रियांना कमाईत घट जास्त सहन करावी लागत आहे. या निवडणुकीच्या वर्षात सरकार बेरोजगारीच्या कडव्या वास्तवाचा सामना जुमलेबाजीतून करणार की त्याऐवजी काही ठोस उपाययोजना करणार हे आता पाहावे लागेल. हेही पाहिले पाहिजे की, विरोधी पक्ष बेरोजगारीचा मुद्दा देशातील सर्वात मोठा राजकीय प्रश्न म्हणून उभा करू शकतात की नाही?

(लेखक अध्यक्ष, स्वराज इंडिया तथा सदस्य, जय किसान आंदोलन)

टॅग्स :Employeeकर्मचारीjobनोकरीInflationमहागाई