शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

२०१९ ची गाडी सुटली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:27 IST

संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्यासाठी स्पेशल गाडी मुंबईकडे रवाना झाली.

संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्यासाठी स्पेशल गाडी मुंबईकडे रवाना झाली. मात्र पक्षाच्या स्थापना दिनी नागपुरातून केवळ २४ कार्यकर्तेच मुंबईला गेल्याची नोंद झाली तर,पक्षश्रेष्ठींना काय मॅसेज जाईल? अशी चर्चा नागपुरातील रेल्वेस्थानकावर रंगली. याचवेळी रेल्वेस्थानकावर उपस्थित असलेल्या दीड हजारांहून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला सुरुंग लावत गाडी नियोजित वेळेच्या आधी सोडणाºया रेल्वे अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी केली. मुळात मुंबईसाठी नागपुरातून जाणा-या स्पेशल गाडीचे बुकिंग हे मुंबईतूनच करण्यात आले होते. यात नागपूर रेल्वे स्थानकावरून गाडी सुटण्याची वेळ ८.१५ अशी नमूद करण्यात आली होती. मात्र असे असतानाही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना पक्षाने रेल्वे स्थानकावर १० वाजता येण्याची वेळ दिली होती. त्यामुळे ‘टायमिंग’ रेल्वेचे चुकले की भाजपचे यावर सध्या खल सुरू आहे. हा विषय केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प नागपुरातील पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. पहिल्या स्पेशल गाडीचे टायमिंग चुकल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन दुसरी गाडी गुरुवारी दुपारी ३.२४ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे रवाना झाली. मात्र ती गुजरातमार्गे मुंबईला पोहोचल्याने शुक्रवारी नव्या वादाला रेल्वे प्रशासनाला तोंड द्यावे लागले. संघाच्या शिस्तीत वावरणाºया नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांचा स्थापना दिनाचा सोहळा गाठण्याचे टायमिंग चुकविणाºया रेल्वे प्रशासनाला हे निश्चितच महागात पडेल! मात्र रेल्वेने ८.१५ वाजताची वेळ दिली असताना कार्यकर्त्यांना १० वाजता रेल्वे स्थानकावर येण्यास सांगण्याचा स्मार्टपणा कुणी दाखविला? कार्यकर्त्यांचे ‘टायमिंग’ कुणी चुकविले यावर शिस्तप्रिय भाजपात निश्चितच मंथन होईल. मात्र भाजप कार्यकर्त्यांची गाडी चुकल्याने आणि ती गुजरातमार्गे मुंबईला पोहोचल्याने विरोधकांच्या मनात निश्चितच गुदगुल्या झाल्या असाव्या. २०१९ मध्ये भाजपची गाडी अशीच सुटेल, असे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. अ‍ॅट्रॉसिटी, महागाई, बेरोजगारी आणि जातीय दंगलीवर देशभरात वादंग सुरू आहे. मात्र भाजपाचे यावर मौन आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५० जागांचा पल्ला गाठण्यासाठी भाजपाला संघाने सुचविलेल्या ‘सामाजिक समरसता एक्स्प्रेस’मधून प्रवास करणे गरजेचे आहे. अन्यथा नागपुरातील घटनेचा प्रत्यय भाजपाला २०१९ मध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाBJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018Politicsराजकारण