शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

तोची साधू ओळखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:40 IST

उत्तर भारतातील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांना लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर देशभर उद्भवलेली परिस्थिती खरोखरच भयानक होती.

उत्तर भारतातील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांना लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर देशभर उद्भवलेली परिस्थिती खरोखरच भयानक होती. राम रहीम या नावात संत कबीर यांच्या कल्पनेतला हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारा संदर्भ असला तरी त्याच्या आचरणातून राम काय अन् रहीम काय, या सगळ्यालाच तिलांजली दिलेली दिसते. या धार्मिक अधिष्ठानाच्या ठिकाणी भेट देणाºया महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावर चीड ही स्वाभाविक असली तरी बाबाच्या पाठीशी असलेला समूह पाहता नैतिक मूल्ये कुठे शोधायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. सोशल मीडियावर तर यापुढे बुवा महाराज म्हणजे नको रे बाबा हेच सूत्र अंगीकारण्याचे संदेश पसरले गेले. ‘बुवा तेथे बाया’ या नाटकामधून आचार्य अत्रे यांनी या अनिष्ट हितसंबंधावर प्रकाश टाकला होता. पण हे संबंध तोडण्याचे गांभीर्य कुणीच मनापासून घेतले नाही. आज देश विदेशात भारतीय साधू-संत, प्रवचनकार, विद्वान सद्विचाराची पेरणी करत आहेत. भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सन्मार्गाला वळवत आहेत. त्यांच्या भाषाप्रभुत्वावर आणि रसाळ वाणीवर फिदा होऊन अनेकजण त्यांचे चाहते व शिष्यगण होऊन जातात. पण या ठिकाणी लैंगिक शोषण झाल्याचे उघड झाल्याने अशा रसाळ वाणीवर आणि ठासून भरलेल्या वक्तृत्वावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न पडला आहे. जगाची वाटचाल ही ताणतणावाकडे चालली आहे. युवा पिढी व्यसनाकडे वळू लागली आहे. वृध्दांची वाटचाल वृध्दाश्रमाकडे सुरू आहे. नीतिमूल्ये घसरली आहेत. अशा वेळी सदविचाराची पेरणी करणारी माणसे आणायची कुठून. जगाचा श्रध्देवरचा विश्वास उडाला तर जग हे नकरात्मक विचार करू लागेल. आजही जगात साधू, संत, महंत, मुल्ला मौलवी, धर्मगुरू यांचे विचारच माणसाला माणसात आणून सोडू शकतात. ही मंडळी म्हणजे भोंदूच आहेत असा एकांगी विचार जनतेत रुजला तर यातून सावरायला पिढ्यान् पिढ्या घालवाव्या लागतात. मात्र भोंदूना रोखण्यासाठी भक्तांनीच डोळसपणे आपल्या श्रध्दास्थानाची निवड करावी. जगात तणावाचा रोग पसरू लागल्याने त्यामध्ये व्यावसायिक संधी शोधणारे अनेकजण आहेत. आचार, विचार, व्यायाम, योगासने, चांगली प्रवचने, व्याख्याने ऐकल्याने अनेकांचे तणाव दूर होतात. त्यामुळे असे लोक त्या त्या प्रवचनकार व धर्मगुरूच्या अधीन जातात. पण तो भोंदू आहे की सज्जन हे कुणीच पाहात नाही. आपला गुरू बोलतो तसा वागतो का? एवढ्या एकाच गोष्टीचा पडताळा केला तरी पुरेसे आहे.

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम