शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भुकेली तरुण पोरं रस्त्यावर उतरतात, तेव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 09:20 IST

लहान-मोठ्या शहरांच्या आधाराने आपले भविष्य घडेल, या आशेने ग्रामीण तरुणांचे घोळके शिकायला आले आहेत. यांची जबाबदारी कोण घेणार?

धर्मराज हल्लाळेवृत्तसंपादक, लोकमत, लातूर

लहान-मोठ्या शहरांच्या आधाराने आपले भविष्य घडेल, या आशेने ग्रामीण तरुणांचे घोळके शिकायला आले आहेत. यांची जबाबदारी कोण घेणार?

कोरोना ओसरला अन् लातूर, नांदेड असो की, पुणे-मुंबई विद्यार्थ्यांची गर्दी ओसंडून वाहू लागली. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस इथपासून ते अधिकारी होण्याची मनीषा बाळगणारे लाखो तरुण विद्यार्थी गाव सोडून सध्या शहरांकडे आले आहेत. ज्यांची परिस्थिती जेमतेम ते तालुक्याला अन् जिल्ह्याला थांबले आहेत. ज्यांच्या घरात आहेत. कोरोना ओसरताच महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, खासगी शिकवण्यांचा परिसर गजबजला आहे. या विद्यार्थ्यांच्या अडचणी अनंत आहेत. त्यात भुकेचाही प्रश्न निर्माण व्हावा, ही मोठी शोकांतिका आहे.

लातूरमध्ये काही खाणावळ चालकांनी महागाईचे कारण पुढे करून अलीकडेच एका दिवसासाठी विद्यार्थ्यांना उपवास घडवला. त्यामुळे कोणत्याही संघटनेच्या पाठबळाशिवाय शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. कोणतेही आवाहन नव्हते. संघटनेचा फलक नव्हता. नेता नव्हता. बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, सेट- नेट तयारी करणारे, ग्रामीण भागातील होते. लातूर हे नीट वेळच्या जेवणाची अडचण आहे.... आणि जेईईच्या तयारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यासाठी येणारा विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने मध्यम वर्गातील आहे. तुलनेने नीट, जेईई तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना सुविधा पुरवितात. मात्र, आर्थिक पाठबळ, ते महानगरांकडे वळले धर्मराज हल्लाळे वर्षानुवर्षे भरती न झालेला, पोलीस शिपाईपदासाठी रस्त्यावर भल्या पहाटे धावणारा मोठा वर्ग आहे.

केंद्रीय अथवा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होणे दूर, तलाठी, ग्रामसेवक जी मिळेल  परीक्षा आणि मिळेल ती नोकरी करण्यासाठीच्या परीक्षेसाठी धडपडणारा विद्यार्थी वर्ग प्रत्येक लहान-मोठ्या शहरात आहे. जणू त्यांचेच प्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनाची सवय नसल्याने अवघ्या काही मिनिटांत पोलिसांच्या आवाहनाला दाद देत विद्यार्थी आपापल्या खोल्याकडे निघूनही गेले. त्यांतील काही तरुण सांगत होते, आमचा कोणताही राजकीय हेतू नाही, पाठीशी कोणती संघटना नाही, आम्ही भुकेने व्याकुळ होऊन एकत्र जमलो आहोत. दरवाढ गगनाला भिडली आहे. खोल्यांचे भाडे वाढले. दोन वेळच्या जेवणाची अडचण आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत भरतीसाठी आलेले तरुणही रस्त्याच्या कडेला झोपले होते. यावर सत्ताधारी, विरोधकांचे राजकारण होत राहील. समाज म्हणून प्रत्येकजण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेणार आहे की नाही? पोलीस भरतीसाठी धावणारा तरुण सहा महिन्यांपूर्वी कोविड उपचार केंद्रात सेवा देत होता. पदवीधर असल्याने त्याला कंत्राटी नोकरी मिळाली होती. कोरोना ओसरला आणि नोकरीही संपली. आता जिथे-तिथे कंत्राटी नोकरी आहे, तिथेसुद्धा चिकटण्यासाठी रस्सीखेच आहे. वेतन कितीही मिळो, मात्र टिकून राहण्याची धडपड सुरू आहे, ती भविष्यात हीच नोकरी कायम होईल, या आशेवर. त्यात काहीजणांचे कंत्राट संपले आणि सेवाही थांबली आहे.

परवा जे लातुरात घडले आहे. त्यामागची अस्वस्थता प्रत्येक शहरातील तरुण विद्यार्थ्यांची आहे. खाणावळ, खोलीभाडे, अभ्यासिका, खासगी शिकवणी वर्गाचे शुल्क देताना गणित कोलमडत आहे. अर्धावेळ काम करुन काहींची शिकवणीची धडपड सुरू आहे. 

निर्व्यसनी, प्रामाणिक, कमवा शिका धर्तीवर पुढे जाणारे तरुण सभोवताली दिसले तर त्यांना समाज म्हणून आपण काही आधार देणार की नाही? प्रत्येक प्रश्न सरकार सोडवील, ही एक अंधश्रद्धाच आहे.

म्हणूनच गुणवान विद्यार्थ्यांची समाजाने दखल घ्यायला हवी. मी, माझे कुटुंब आणि माझी मुले याच्या पलीकडे जाण्याची वृत्ती किमान ऐपतदारांनी जमेल तितकी दाखवावी, अन्यथा सरकारलाच नव्हे, तुम्हा-आम्हालाहीपळता भुई थोडी होईल..।

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षण