शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

माणुसकीचे दर्शन

By admin | Updated: January 25, 2016 02:16 IST

समाजात जसा वाईटपणा आहे, तसा चांगुलपणाही आहे. असत्याचे पावलोपावली दर्शन घडत असले, तरी कोठे ना कोठे सत्याची कास धरून चालणारेही आढळतात.

समाजात जसा वाईटपणा आहे, तसा चांगुलपणाही आहे. असत्याचे पावलोपावली दर्शन घडत असले, तरी कोठे ना कोठे सत्याची कास धरून चालणारेही आढळतात. अशुभ घटनांचा सुकाळ दिसत असला, तरी शुभाचा दुष्काळ आहे असेही म्हणता येणार नाही. परजिवाविषयीची आस्था, आपुलकी पूर्णत: लयास गेली असे म्हणूनही चालणार नाही. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर अस्मानी, सुलतानी संकट ओढवले त्या त्या वेळी संवेदना शाबूत असलेले माणुसकीचे पुजारी मदतीसाठी धावून आलेले आहेत. मग ते संकट भूकंपाचे असो, त्सुनामीचे असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे असो वा एखाद्या दुर्घटनेचे असो. यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असताना जगाचा अन्नदाता असलेला बळीराजा हवालदिल झाला आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. अशा बिकट परिस्थितीत राज्य आणि केंद्र आपापल्या पातळीवर उपाययोजना करीत असताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाची सुमारे सहा कोटी २६ लाख ३१ हजार ४८९ रुपयांची रक्कम दुष्काळनिधी म्हणून दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून उभी झालेली एवढी मोठी रक्कम दुष्काळनिधीसाठी निश्चितच हातभार लावणारी आहे. सव्वासहा कोटींचा मदतनिधी दुष्काळासाठी उभा करून एसटी कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आतापर्यंत एसटी हीच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक होते; परंतु आपल्या वेतनातून मदतनिधी उभारून एसटी कर्मचारीसुद्धा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. या निधीचा कसा विनियोग करावा ही आता राज्य सरकारची जबाबदारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुंबई सेंट्रल आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आठ योजनांच्या शुभारंभाचा कार्यक्रम घेतला होता. त्याठिकाणी सदर मदतनिधी जाहीर करण्यात आला. वास्तविक एसटीचे चालक-वाहक रात्रंदिवस जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असतात; परंतु त्यांना इतर महामंडळांच्या तुलनेने वेतन अल्प असून, सेवानिवृत्तीनंतर पाचशे रुपयात पती-पत्नीसाठी सवलतीचा पास देण्याची मागणीही दहा वर्षांपासून प्रलंबितच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून, सर्व कर्मचारी हासुद्धा आपला परिवार आहे. आजपर्यंत त्यांच्याकडे परिवार म्हणून कोणी पाहिले नव्हते असे नमूद केल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केव्हा होते, ते बघणे महत्त्वाचे ठरेल.