शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीचे दर्शन

By admin | Updated: January 25, 2016 02:16 IST

समाजात जसा वाईटपणा आहे, तसा चांगुलपणाही आहे. असत्याचे पावलोपावली दर्शन घडत असले, तरी कोठे ना कोठे सत्याची कास धरून चालणारेही आढळतात.

समाजात जसा वाईटपणा आहे, तसा चांगुलपणाही आहे. असत्याचे पावलोपावली दर्शन घडत असले, तरी कोठे ना कोठे सत्याची कास धरून चालणारेही आढळतात. अशुभ घटनांचा सुकाळ दिसत असला, तरी शुभाचा दुष्काळ आहे असेही म्हणता येणार नाही. परजिवाविषयीची आस्था, आपुलकी पूर्णत: लयास गेली असे म्हणूनही चालणार नाही. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर अस्मानी, सुलतानी संकट ओढवले त्या त्या वेळी संवेदना शाबूत असलेले माणुसकीचे पुजारी मदतीसाठी धावून आलेले आहेत. मग ते संकट भूकंपाचे असो, त्सुनामीचे असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे असो वा एखाद्या दुर्घटनेचे असो. यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असताना जगाचा अन्नदाता असलेला बळीराजा हवालदिल झाला आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. अशा बिकट परिस्थितीत राज्य आणि केंद्र आपापल्या पातळीवर उपाययोजना करीत असताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाची सुमारे सहा कोटी २६ लाख ३१ हजार ४८९ रुपयांची रक्कम दुष्काळनिधी म्हणून दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून उभी झालेली एवढी मोठी रक्कम दुष्काळनिधीसाठी निश्चितच हातभार लावणारी आहे. सव्वासहा कोटींचा मदतनिधी दुष्काळासाठी उभा करून एसटी कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आतापर्यंत एसटी हीच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक होते; परंतु आपल्या वेतनातून मदतनिधी उभारून एसटी कर्मचारीसुद्धा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. या निधीचा कसा विनियोग करावा ही आता राज्य सरकारची जबाबदारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुंबई सेंट्रल आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आठ योजनांच्या शुभारंभाचा कार्यक्रम घेतला होता. त्याठिकाणी सदर मदतनिधी जाहीर करण्यात आला. वास्तविक एसटीचे चालक-वाहक रात्रंदिवस जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असतात; परंतु त्यांना इतर महामंडळांच्या तुलनेने वेतन अल्प असून, सेवानिवृत्तीनंतर पाचशे रुपयात पती-पत्नीसाठी सवलतीचा पास देण्याची मागणीही दहा वर्षांपासून प्रलंबितच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून, सर्व कर्मचारी हासुद्धा आपला परिवार आहे. आजपर्यंत त्यांच्याकडे परिवार म्हणून कोणी पाहिले नव्हते असे नमूद केल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केव्हा होते, ते बघणे महत्त्वाचे ठरेल.