शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

इथे यंत्राहून स्वस्त आहेत माणसांचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:13 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मैला वाहणे किंवा वाहायला लावणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र प्रशासनाकडून सर्रासपणे त्याचे उल्लंघन होताना दिसते.

- विजय दळवीडोंबिवलीतील मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचे हकनाक बळी गेल्याची घटना नुकतीच घडली. प्रशासन स्तरावर या घटनेची अपघात म्हणून नोंद झाली. मात्र राज्यातील विविध शहरांत सातत्याने घडणाऱ्या या घटना म्हणजे अपघात नसून त्या-त्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही कामगाराने मलनिस्सारण किंवा जलनिस्सारण वाहिन्यांमध्ये सफाईसाठी उतरता कामा नये. मात्र गरिबी आणि बेकारीमुळे येथे यंत्रांहून स्वस्त माणसांचा जीव असल्यानेच कंत्राटदार आणि मनपा अधिकारी आजही सर्रासपणे सफाई कामगारांना मॅनहोलमध्ये सफाईसाठी उतरवतात आणि प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे कामगारांचा जीव जातोच आहे.नेहमीच उपेक्षित राहिलेल्या सफाई कामगारांच्या मागण्या व कायद्याबाबत शासनाने उदासीनतेची भूमिका घेतली आहे. डोंबिवलीत मरण पावलेले कामगार हे कंत्राटी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळणार नाही. मुळात न्यायालयाच्या निकालानुसार यांना किमान वेतन मिळणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी अंधेरी येथेही अशाच प्रकारे दोन कामगारांचे मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाले होते. अर्थात प्रशासनाने फक्त चौकशीचा फार्स केला.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मैला वाहणे किंवा वाहायला लावणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र प्रशासनाकडून सर्रासपणे त्याचे उल्लंघन होताना दिसते. पुण्यातील कंपनीकडे मुंबई, ठाण्यातील कंत्राटे दिली जातात. विदेशात याच कामासाठी यंत्रे वापरली जातात. मात्र या खर्चाऐवजी मनपा प्रशासन कंत्राटांवरच अधिक खर्च करते. म्हणूनच आशियातील सर्वात मोठ्या महानगरपालिका असलेल्या मुंबई मनपात मलनिस्सारण व जलनिस्सारण वाहिन्यांच्या सफाईसाठी केवळ १७ कामगार कायम सेवेत आहेत. याउलट ८०हून अधिक कामगार हे कंत्राटी पद्धतीने काम करतात. या कामगारांना आजही मनपा अधिकारी मॅनहोलमध्ये उतरण्यास भाग पाडतात. माध्यमांमध्ये या बाबी उघडकीस आल्यावर संबंधित कामगाराला कामावरून कमी केले जाते. मात्र याच कामगारांचा जीव गेल्यावर त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. हे कामगार मुंबई, ठाण्यात आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासन त्यांची दखल घेण्यास तयार नाही. ज्या अर्थी त्यांची दखल घेतली जात नाही, त्या अर्थी त्यांच्या मृत्यूची तरी प्रशासन काय दखल घेणार, हा प्रश्नच आहे.या कामगारांनी पाच दिवस काम करायचे असते आणि दोन दिवस त्यांना सुट्टी मिळणे गरजेचे असते. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे ते आठवडाभर दोन ते तीन पाळ्यांमध्ये कामगार काम करतात. सुट्ट्या तर दूर, साधा वाढीव कामाचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. दुर्गंधी सहन करण्यासाठी बहुतेक कामगार व्यसनात बुडालेले आहेत. आजही कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत कपात होते. मात्र ही रक्कम प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याने त्याचे कोणतेही फायदे कामगारांना मिळत नाहीत.गेल्या पाच वर्षांत तब्बल १३ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. कचरा वाहतूक कामगारांच्या मृत्यूचा आकडा २१२ इतका आहे. भविष्यात प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर हा आकडा वाढेल यात शंका नाही. कारण विकसनशील देशात नेहमीच यंत्रांहून कामगारांचे जीव हे स्वस्त मानले जातात.(लेखक सफाई कामगार नेते आहेत)

टॅग्स :Deathमृत्यूMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका