शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

इथे यंत्राहून स्वस्त आहेत माणसांचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:13 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मैला वाहणे किंवा वाहायला लावणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र प्रशासनाकडून सर्रासपणे त्याचे उल्लंघन होताना दिसते.

- विजय दळवीडोंबिवलीतील मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचे हकनाक बळी गेल्याची घटना नुकतीच घडली. प्रशासन स्तरावर या घटनेची अपघात म्हणून नोंद झाली. मात्र राज्यातील विविध शहरांत सातत्याने घडणाऱ्या या घटना म्हणजे अपघात नसून त्या-त्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही कामगाराने मलनिस्सारण किंवा जलनिस्सारण वाहिन्यांमध्ये सफाईसाठी उतरता कामा नये. मात्र गरिबी आणि बेकारीमुळे येथे यंत्रांहून स्वस्त माणसांचा जीव असल्यानेच कंत्राटदार आणि मनपा अधिकारी आजही सर्रासपणे सफाई कामगारांना मॅनहोलमध्ये सफाईसाठी उतरवतात आणि प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे कामगारांचा जीव जातोच आहे.नेहमीच उपेक्षित राहिलेल्या सफाई कामगारांच्या मागण्या व कायद्याबाबत शासनाने उदासीनतेची भूमिका घेतली आहे. डोंबिवलीत मरण पावलेले कामगार हे कंत्राटी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळणार नाही. मुळात न्यायालयाच्या निकालानुसार यांना किमान वेतन मिळणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी अंधेरी येथेही अशाच प्रकारे दोन कामगारांचे मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाले होते. अर्थात प्रशासनाने फक्त चौकशीचा फार्स केला.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मैला वाहणे किंवा वाहायला लावणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र प्रशासनाकडून सर्रासपणे त्याचे उल्लंघन होताना दिसते. पुण्यातील कंपनीकडे मुंबई, ठाण्यातील कंत्राटे दिली जातात. विदेशात याच कामासाठी यंत्रे वापरली जातात. मात्र या खर्चाऐवजी मनपा प्रशासन कंत्राटांवरच अधिक खर्च करते. म्हणूनच आशियातील सर्वात मोठ्या महानगरपालिका असलेल्या मुंबई मनपात मलनिस्सारण व जलनिस्सारण वाहिन्यांच्या सफाईसाठी केवळ १७ कामगार कायम सेवेत आहेत. याउलट ८०हून अधिक कामगार हे कंत्राटी पद्धतीने काम करतात. या कामगारांना आजही मनपा अधिकारी मॅनहोलमध्ये उतरण्यास भाग पाडतात. माध्यमांमध्ये या बाबी उघडकीस आल्यावर संबंधित कामगाराला कामावरून कमी केले जाते. मात्र याच कामगारांचा जीव गेल्यावर त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. हे कामगार मुंबई, ठाण्यात आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासन त्यांची दखल घेण्यास तयार नाही. ज्या अर्थी त्यांची दखल घेतली जात नाही, त्या अर्थी त्यांच्या मृत्यूची तरी प्रशासन काय दखल घेणार, हा प्रश्नच आहे.या कामगारांनी पाच दिवस काम करायचे असते आणि दोन दिवस त्यांना सुट्टी मिळणे गरजेचे असते. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे ते आठवडाभर दोन ते तीन पाळ्यांमध्ये कामगार काम करतात. सुट्ट्या तर दूर, साधा वाढीव कामाचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. दुर्गंधी सहन करण्यासाठी बहुतेक कामगार व्यसनात बुडालेले आहेत. आजही कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत कपात होते. मात्र ही रक्कम प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याने त्याचे कोणतेही फायदे कामगारांना मिळत नाहीत.गेल्या पाच वर्षांत तब्बल १३ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. कचरा वाहतूक कामगारांच्या मृत्यूचा आकडा २१२ इतका आहे. भविष्यात प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर हा आकडा वाढेल यात शंका नाही. कारण विकसनशील देशात नेहमीच यंत्रांहून कामगारांचे जीव हे स्वस्त मानले जातात.(लेखक सफाई कामगार नेते आहेत)

टॅग्स :Deathमृत्यूMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका