शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
4
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
5
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
6
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
7
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
8
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
9
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
10
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
11
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
12
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
13
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
14
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
15
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
16
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
17
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
18
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
19
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
20
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ

पर्यावरणाच्या ऱ्हासाला मानवी कृतीच जबाबदार

By admin | Updated: June 5, 2016 02:04 IST

पर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल.

- विजय अवसरे, निसर्गमित्रपर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल. आपण आपला म्हणजे वैयक्तिक आणि देशाचा विकास करताना पर्यावरणाला हानी पोहोचेल, अशा गोष्टी करतो. प्रथमत: त्या विकासाच्या गोष्टी आपणाला लहानसहान वाटतात. मात्र, याच लहानसहान गोष्टी कालांतराने अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करतात. परिणामी, छोट्या-छोट्या मानवी कृतीच पर्यावरणाच्या हानीला जबाबदार ठरतात.जागतिक पर्यावरणाचा दिनाचा विचार केवळ या दिनापुरती जनजागृती झाली, म्हणजे सर्वकाही झाले असे होत नाही. आपण पर्यावरणाच्या हानीला तंत्रज्ञानाला जबाबदार धरतो किंवा तसे ठोकताळे बांधतो. मुळात आपण काहीसा तत्त्वज्ञानाचाही विचार केला पाहिजे. तापमानवाढीच्या समस्येचे उत्तर अंतिमत: तंत्रज्ञानात नसून, ते तत्त्वज्ञानात आहे. खरे तत्त्वज्ञान म्हणते की, इच्छांपासून मुक्त होणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. मात्र, हे अर्थशास्त्र म्हणते की, इच्छा पूर्ण करत राहणे म्हणजे स्वातंत्र्य. या मूलभूत पातळीवर विचार नेल्यास आता मानवजात व सृष्टी वाचेल. कार्बन ऊर्जेला कार्बनरहित ऊर्जेने उत्तर देण्याचा पाश्चात्यांचा विचार घातक ठरेल. कारण आता त्यासाठी वेळ उपलब्ध नाही, शिवाय अशा ऊर्जेने नैसर्गिक संसाधनाचा, जंगलाचा नाश अधिक वेगाने होईल. तापमानवाढीला शहरीकरण कारणीभूत आहे. अनेक शहरे प्रदूषणाने ग्रस्त आहेत.१९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतूचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तापमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साईड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साईड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वात मोठ्या उष्णयुगात म्हणजे, २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या.मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे, उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. म्हणजेच एवढे प्रदूषण करून आपण पर्यावरणाचा गळा घोटतो आहे. त्यामुळे आता केवळ मुंबईकरांनी नाही तर समस्त मानव जातीने पर्यावरणाचा विचार केला पाहिजे आणि सुरुवात स्वत:च्या घरापासून केली पाहिजे. घरातील कचरा कमी केला पाहिजे. सुका आणि ओला कचरा वेगळा केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, कचरा सुका आणि ओला कचरा वेगळे करण्याचे आवाहन यापूर्वीच महापालिकेने केले आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण दिनापुरती पर्यावरणाची जनजागृती केली, म्हणजे पर्यावरणाच्या समस्या मिटतील, असे नाही, तर सर्वच घटकांनी एकत्र येत, यासाठी पुढाकार घेऊन कृती आरंभ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.