शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

पर्यावरणाच्या ऱ्हासाला मानवी कृतीच जबाबदार

By admin | Updated: June 5, 2016 02:04 IST

पर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल.

- विजय अवसरे, निसर्गमित्रपर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल. आपण आपला म्हणजे वैयक्तिक आणि देशाचा विकास करताना पर्यावरणाला हानी पोहोचेल, अशा गोष्टी करतो. प्रथमत: त्या विकासाच्या गोष्टी आपणाला लहानसहान वाटतात. मात्र, याच लहानसहान गोष्टी कालांतराने अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करतात. परिणामी, छोट्या-छोट्या मानवी कृतीच पर्यावरणाच्या हानीला जबाबदार ठरतात.जागतिक पर्यावरणाचा दिनाचा विचार केवळ या दिनापुरती जनजागृती झाली, म्हणजे सर्वकाही झाले असे होत नाही. आपण पर्यावरणाच्या हानीला तंत्रज्ञानाला जबाबदार धरतो किंवा तसे ठोकताळे बांधतो. मुळात आपण काहीसा तत्त्वज्ञानाचाही विचार केला पाहिजे. तापमानवाढीच्या समस्येचे उत्तर अंतिमत: तंत्रज्ञानात नसून, ते तत्त्वज्ञानात आहे. खरे तत्त्वज्ञान म्हणते की, इच्छांपासून मुक्त होणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. मात्र, हे अर्थशास्त्र म्हणते की, इच्छा पूर्ण करत राहणे म्हणजे स्वातंत्र्य. या मूलभूत पातळीवर विचार नेल्यास आता मानवजात व सृष्टी वाचेल. कार्बन ऊर्जेला कार्बनरहित ऊर्जेने उत्तर देण्याचा पाश्चात्यांचा विचार घातक ठरेल. कारण आता त्यासाठी वेळ उपलब्ध नाही, शिवाय अशा ऊर्जेने नैसर्गिक संसाधनाचा, जंगलाचा नाश अधिक वेगाने होईल. तापमानवाढीला शहरीकरण कारणीभूत आहे. अनेक शहरे प्रदूषणाने ग्रस्त आहेत.१९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतूचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तापमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साईड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साईड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वात मोठ्या उष्णयुगात म्हणजे, २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या.मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे, उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. म्हणजेच एवढे प्रदूषण करून आपण पर्यावरणाचा गळा घोटतो आहे. त्यामुळे आता केवळ मुंबईकरांनी नाही तर समस्त मानव जातीने पर्यावरणाचा विचार केला पाहिजे आणि सुरुवात स्वत:च्या घरापासून केली पाहिजे. घरातील कचरा कमी केला पाहिजे. सुका आणि ओला कचरा वेगळा केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, कचरा सुका आणि ओला कचरा वेगळे करण्याचे आवाहन यापूर्वीच महापालिकेने केले आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण दिनापुरती पर्यावरणाची जनजागृती केली, म्हणजे पर्यावरणाच्या समस्या मिटतील, असे नाही, तर सर्वच घटकांनी एकत्र येत, यासाठी पुढाकार घेऊन कृती आरंभ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.