शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार?

By यदू जोशी | Updated: December 27, 2024 07:59 IST

पक्षांतर्गत मांड पक्की झालेले आणि प्रशासनावर अधिक दरारा असलेले देवेंद्र फडणवीस यावेळी पहायला मिळतील. त्याचे संकेत त्यांनी दिलेच आहेत!

यदु जोशी

सहयोगी संपादक, लोकमत

देवेंद्र फडणवीस आपल्याला पूर्ण कळले असा दावा काही लोक करतात; पण पूर्ण फडणवीस कळणे हा पीएच.डीचा विषय आहे. फडणवीस पूर्ण कळल्याचा दावा कोणीही करू नये, पण इतकी वर्षे त्यांचा राजकीय प्रवास जवळून पाहत असल्याने त्यांची मुख्यमंत्रिपदाची वाटचाल कशी असेल याबाबत काही ठोकताळे जरूर मांडता येऊ शकतात. पहिल्या टर्मपेक्षा आता ते अगदीच वेगळे असतील आणि त्यांचे मुख्यमंत्री कार्यालयदेखील तसेच वेगळे असेल. आधी या कार्यालयाला आपल्या अधिकारांचे पूर्ण भान नव्हते. तेथून  विनंतीवजा फोन अधिकाऱ्यांना केले जात असत, पण विनंतीवजा नाही तर आदेशवजा फोन करायचे असतात याचे भान आता आलेले आहे. हा मोठा फरक. 

गेल्या पाच वर्षांतील चढउताराने त्यांच्या अवतीभवतीच्या विश्वासू सहकाऱ्यांनाही बरेच काही शिकवले आहे. काम घेऊन आलेल्या व्यक्तीला आपल्या कामासाठी सीएम ऑफिसमधून ‘विनंती’ केली जाते यापेक्षा ‘आदेश’ दिला जातो हे जास्त सुखावणारे असते, त्यामुळे  आता कार्यकर्ते सुखावतील; पण हेही तितकेच खरे की मुख्यमंत्री कार्यालयातील दिलीप राजूरकर, केतन पाठक, देवराम पळसकर, प्रिया खान, शशांक दाभोळकर हे साहेबांचा आदेश अधिकाऱ्यांपर्यंत पोचवताना संकेत सांभाळतील, कारण आपल्या बॉसला कशा प्रकारचे सौजन्य आणि प्रामाणिकपणा अपेक्षित आहे हे त्यांना चांगले कळते. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी यांच्यासारखे आयएएस अधिकारी ‘टीम फडणवीस’मध्ये आहेत. त्यातून पारदर्शी कारभाराची एकप्रकारे हमीच फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, प्रामाणिकपणाचे दोन धोके असतात : एकतर प्रत्येक गोष्ट नियमाच्या कसोटीवर खूपच घासून पाहिली जाते, त्यात कालापव्यय होतो. तसेच प्रामाणिकपणाचा म्हणून एक गर्व चांगले तेही होऊ देत नाही. असे काही घडू नये याची काळजी घेणे हे तिघेही उत्तम जाणतात.

फडणवीस एका मर्यादेपर्यंत ऐकतात, सहनशीलता तर त्यांच्याकडे प्रचंड आहे, पण आपल्यामार्फत कोणी चुकीचा अजेंडा राबवून घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले तर मग ते कोणी कितीही जवळचे असले तरी व्हेटो वापरतात. त्यांच्या या स्वभावात काही बदल होईल असे वाटत नाही. त्यामुळे ‘आता फडणवीस आले आहेत, अब कोई चिंता नही, कुछ भी कर लेंगे’अशा मस्तीत असलेल्यांचा अविर्भाव लवकरच गळून पडेल. त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालय आणि भाजप यांना जोडणारा दुवा म्हणून श्रीकांत भारतीय यांची नेमणूक केलेली होती. त्यावेळी फारशा अपेक्षा नव्हत्या. ७० टक्के लोक फडणवीस यांच्याबरोबर फोटो काढून घेण्यातच भरून पावत होते. आता तसे नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्वी फारच भाबड्या होत्या, आता तेही प्रॅक्टिकल झाले आहेत, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे. २०२४ मध्ये मिळालेल्या झळझळीत यशात पक्ष संघटनेचा मोठा वाटा आहे. २०१४ मध्ये भाजपची सत्ता होती, पण ती खालपर्यंत म्हणजे कार्यकर्त्यांपर्यंत झिरपू शकली नव्हती. तसे होण्यामागे अनेक कारणे दिली गेली, आता ती देता येणार नाहीत. त्यावेळी फडणवीस यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले आणि प्रसंगी, ‘त्यांना काय समजते’ असे अधिकाऱ्यांना सुनावणारे काही मंत्री होते, त्यामुळे एकप्रकारचा दबाव होता, आता तोदेखील नाही. यावेळी काही ज्येष्ठ आहेत, पण ते तसे बोलणारे नाहीत. पक्षांतर्गत मांड अधिक पक्की झालेले आणि अधिक दरारा असलेले फडणवीस यावेळी पहायला मिळतील. मंत्रालयातील सचिवांची पहिली बैठक फडणवीस यांनी घेतली, त्याची बातमी मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिली. त्या बातमीत जे नव्हते ते मुद्दाम येथे नमूद करावेसे वाटते. फडणवीस त्या बैठकीत असे म्हणाले की, ‘मंत्रालयात कोणत्या विभागात काय काय चालते ते सगळे मला माहिती आहे, असले प्रकार थांबवा नाही तर....’ पुढे ते असेही म्हणाले की, ‘कुठे कसे गैरव्यवहार चालतात याच्या काही क्लिपही माझ्याकडे आहेत..’ - याचा अर्थच हा की, फडणवीसांना सगळे माहिती आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून बदलांचे संकेत त्यांनी दिले आहेत आणि बरेच बदल होतील. पहिल्या कार्यकाळात त्यांना शिवसेनेचा बराच त्रास होता; यावेळी तो अजिबात नसेल असे नाही, पण तो पूर्वीसारखा नसेल. शिंदेसेनेच्या मंत्री, आमदारांची कामे होण्यापुरता त्रास असेल. उद्धव ठाकरे हे युतीमध्ये होते पण रोज मोदी-शाह-फडणवीसांवर त्यांच्या मुखपत्रातून सडकून टीका केली जायची. एकनाथ शिंदे तसे नाहीत, ते मोदी-शाह यांची प्रशंसा करतात आणि आजतरी फडणवीस यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. अजित पवारांशी त्यांची मैत्री जगजाहीर आहेच, त्यामुळे ‘आपल्यां’पासून यावेळी फडणवीसांना फारसा त्रास नसेल. 

...पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होता होता फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेले असतील. अशावेळी आगामी पाच वर्षांत देशात चर्चा होईल आणि त्या चर्चेतून एक राष्ट्रीय प्रतिमा तयार होईल, असे काही वेगळे निर्णय, उपक्रम वा योजना ते राबवतील असाही एक अंदाज आहे.     yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र