शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मराठी टिकवायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:12 IST

मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेषत: उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा मराठी संस्कृतीचा मिलाप हा सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने तमाम परप्रांतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेषत: उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा मराठी संस्कृतीचा मिलाप हा सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने तमाम परप्रांतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. गेल्या काही दिवसांत फेरीवाले आणि मनसे यांच्यात झटापट पाहायला मिळाली. काँग्रेसने उघडउघड फेरीवाल्यांची बाजू घेतली अधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने आपणही असल्याचा देखावा शिवसेनेला निर्माण करावा लागला. या सगळ्या घडामोडींचे मूळ अर्थातच मराठी विरुद्ध परप्रांतीय असे असल्याने मराठी भाषकांच्या अस्मितेचा वादही पेटला. मुंबई परिसरात मराठी भाषकांचे प्रमाण कमी होताना दिसते. त्यावर फार कोणी विचार करताना दिसत नाही. केवळ मुंबई महाराष्टÑाची म्हणून मराठी असल्याचे जे बनावट चित्र निर्माण केले जाते, त्यावर चर्चा होण्याची गरज आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवरच मराठीप्रेमी पालकांचे महासंमेलनही मुंबईत भरणार आहे. यात प्रामुख्याने बंद पडणाºया मराठी शाळांचा विचार होणार आहे. तसेच त्यात सरकारी धोरणातील धरसोड वृत्ती आणि मातृभाषेतून शिक्षणाबाबतचा पालकांच्या दृष्टीकोनावरही चर्चा अपेक्षित आहे. राजभाषा असलेली मराठी ज्ञानभाषा म्हणून पुरेशी नसल्याचा ग्रह बदलत नाही आणि मराठीतून शिक्षणाबद्दल पालकांना विश्वास वाटत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. मराठीचा विचार हा फक्त शालेय शिक्षणापुरता मर्यादित नाही; तर मातृभाषेतून होणारे व्यवहार; बोलणे, वाचणे, लिखाण करणे, त्या भाषेतून तयार होणारे साहित्य, त्याचा दर्जा, पारिभाषिक शब्द, नव्या शब्दांची निर्मिती, तिचा वापर, अन्य भाषक शब्द स्वीकारण्याबाबतची मानसिकता या साºयाचा ऊहापोह होण्याची गरज आहे. मराठीतून शिक्षणातच पुढचा मराठी वाचक, लेखक दडलेला आहे; ती केवळ संवादभाषा नाही, याचे भान आल्याखेरीज या प्रश्नांची चर्चा सफळ संपूर्ण होणारी नाही. केवळ सरकारी धोरणांना दोष देण्याचा उपचार पार पाडून हा प्रश्न सुटणारा नाही. मातृभाषा म्हणून आपल्याला मराठीबद्दल आत्मीयता वाटते का? नसेल, तर त्याची कारणे काय? याचेही आत्मपरीक्षण एकदा करायला हवे. त्यातच भाषाव्यवहाराच्या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. मराठी साहित्य व्यवहारासाठी सरकार देत असलेल्या रकमेची कानडीशी तुलना केल्यावर ती तुटपुंजी आहे हे जसे समोर आले; तसेच मिळालेल्या रकमेचा वापर करून जे संमेलन पार पडते त्यातील खुजेपणाचे आत्मपरीक्षण करण्याचे धारिष्ट्य आपण दाखवत नाही. आपल्या या परस्परविरोधी भूमिका हेही मराठीचे दुखणे आहे. त्यामुळेच त्यावरील इलाज कठीण आहे.

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस