शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

किती विश्वासार्ह?

By admin | Updated: February 9, 2016 03:43 IST

भारतात घुसून दहशत माजविणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानात जे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये, शक्य तो प्राणार्पण करा पण ‘शत्रू’च्या हाती जिवंत सापडू नका आणि चुकून सापडलात

भारतात घुसून दहशत माजविणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानात जे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये, शक्य तो प्राणार्पण करा पण ‘शत्रू’च्या हाती जिवंत सापडू नका आणि चुकून सापडलात व चौकशांना सामोरे जावे लागले तर तपासी यंत्रणा गोधळून जाईल अशीच उलटसुलट माहिती द्या, असेही शिकविले जाते असे सांगतात. हे खरे असल्याची प्रचिती केवळ भारतालाच नव्हे तर ज्या ज्या देशाना दहशतवादाचा धोका आहे त्या साऱ्याच देशाना एकदा नव्हे अनेकदा आली आहे. अशा स्थितीत आताचा डेव्हीड कोलमन हेडली आणि पूर्वाश्रमीचा दाऊद गिलानी याचा जबाब कितपत विश्वासार्ह मानायचा हा एक प्रश्नच आहे. आज तो अमेरिकन सरकारच्या ताब्यात असला तरी मुंबई शहरावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी तो एक असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारा सोमवारी न्यायालयाच्या समक्ष त्याचा जबाब नोंदविण्यात आला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे कार्य केले आणि सोमवारच्या त्याच्या जबाबाबाबत आपण समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरीदेखील शंकेला वाव राहतो व त्यामागेही कारण आहे. सामान्यत: गुन्हेगार कोणताही असो, त्याची पहिली प्रतिक्रिया गुन्हा नाकारण्याचीच असते. पण हेडलीबाबत तसे काहीच घडलेले नाही. त्याला विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्याने अगदी पाठ केल्यागत धडाधड उत्तर दिल्याचे याबाबत प्रसृत वार्तांवरुन लक्षात येते. त्याला जे सूचक प्रश्न विचारले त्यांची उत्तरेही त्याने होकारार्थी दिली. झकी ऊर रहमान लख्वी आणि हाफीझ सईद यांना आपण भेटलो, काही प्रशिक्षण शिबिरांना भेटी दिल्या, काश्मीरात जाऊन आपण तेथील भारतीय लष्कराशी थेट लढू इच्छित होतो पण लख्वीने आपल्याला त्यासाठी योग्य मानले नाही वगैरे वगैरे अनेक बाबी हेडलीने सांगितल्या. इतकेच नव्हे तर मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा सहभाग असल्याचेही त्याने जबाबात सांगितले. पण त्यातून काय निष्पन्न निघणार, हा खरा प्रश्न आहे. केवळ मुंबईवरीलच नव्हे तर भारतात आजवर जे जे म्हणून अतिरेकी हल्ले झाले त्यांच्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांचा सहभाग असल्याचे सज्जड पुरावे भारताने गोळा करुन पाकिस्तानला सादर केले पण त्या सरकारने ते चक्क नाकारण्याचीच भूमिका आजवर घेतली आहे. साहजिकच हेडली जे सांगतो आहे आणि यानंतरही सांगणार आहे त्यावर पाकिस्तान विश्वास ठेवील असे मानणे म्हणजे फारच भोळसटपणा झाला. मुंबई हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सापडलेला एकमात्र जिवंत अतिरेकी अजमल आमीर कसाब स्वत: आपण पकिस्तानी असल्याचे सांगत होता, तसे पुरावेही भारतीय यंत्रणांच्या हाती लागले होते पण तरीही पाकिस्तानने अखेरपर्यंत त्याला नाकारण्याचीच भूमिका घेतली होती. अशा स्थितीत हेडलीचे कथन पाक स्वीकारेल आणि लख्वी-हाफीझ यांना जेरबंद करील अशी आशा बाळगणे म्हणजे दुर्दम्य आशावादाचा कटेलोटच म्हणायचा.