शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

रस्त्यांवर खर्च किती, टोलवसुली किती? हिशेब कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 10:27 IST

टोलचा पैसा खासगी कंत्राटदारांकडे न जाता सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे संपूर्ण देशात टोल वसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी!

सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, नवी मुंबई  -टोलनाके आणि टोलवसुली हा आपल्या देशात अखंड चर्चेचा विषय आहे.   त्यात काही तातडीच्या घटना घडल्या की हा विषय लगेच पेटतो. एका तरुण राजकीय नेत्याला टोलनाक्यावर ताटकळत राहावे लागल्याने त्याच्या तरुण, उत्साही कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची नासधूस केली, हे अलीकडेच घडले. आणि आता अख्खा महामार्गच खड्ड्यात गेल्यावर सरकार आणि कंत्राटदार कंपन्या कोणत्या अधिकाराने टोलवसुली करतात, असा पावसाळी प्रश्न पुन्हा तोंड वासून उभा आहे.भारतात समस्येच्या निराकरणाचे दोन मार्ग आहेत : पहिला प्रकार म्हणजे समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर सुयोग्य उपाय करत त्या समस्येचे निराकरण करणे. दुसरा प्रकार म्हणजे कारण माहीत असूनदेखील राजकीय- प्रशासकीय स्वार्थासाठी सदरील समस्या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे. टोलवसुली ही दुसऱ्या प्रकारात मोडणारी समस्या आहे.टोलवसुली पद्धत सुरू झाल्यापासून तिच्याविरुद्ध अनेक आंदोलने झाली. टोलनाका तोडफोडीचे प्रकार झाले. टोलनाक्यावर बाउन्सरच्या माध्यमातून दादागिरीचे अनेक प्रकार समोर आले. तरीदेखील टोलवसुली जोमाने सुरू आहे. भविष्यातदेखील टोलमुक्ती असंभव आहे,  याची नागरिकांना खात्री आहे. भ्रष्टाचार निपटण्याची  भीष्मप्रतिज्ञा करणारे सरकार येऊनदेखील टोलवसुलीला कुठलाही धक्का पोहाेचलेला नाही यावरूनच  ही समस्या सर्वच राजकीय पक्षांना कशी प्राणप्रिय आहे हे ध्यानात येऊ शकते.देशात ज्या ज्या ठिकाणी टोलवसुली सुरू आहे त्या त्या ठिकाणच्या रस्त्यांवर किती खर्च झाला आणि आजवर त्या त्या ठिकाणी किती टोलवसुली झाली यावर  श्वेतपत्रिका काढावी, अशी ‘जनमन की बात’ आहे. टोलवसुलीत पारदर्शकता का नाही हा संशोधनाचा विषय आहे. टोलवसुलीतील गुंतागुंतीमुळे सर्वांच्याच प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहताना दिसते आहे.नागरिकांची केवळ एकच अपेक्षा आहे की  टोलवसुली ही रस्ते निर्मितीसाठी  केल्या जाणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात केली जावी. टोलवसुलीत पारदर्शकता हवी आणि टोलमधून वसूल केली जाणारी रक्कम ही शासनाच्या तिजोरीत जमा व्हायला हवी. जमा झालेल्या याच रकमेमधून अन्य ठिकाणी रस्त्यांची निर्मिती केली जायला हवी.येणारा खर्च व केली जाणारी टोलवसुली याचा दूरान्वये संबंध दिसत नाही याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सायन-पनवेल मार्गावरील खाडीपुलाचे देता येईल. या टोलनाक्यावर टोलच्या रूपाने प्राप्त नोटा खाडीत दोन्ही बाजूला पत्रे ठोकून त्यात फेकल्या असत्या तरी अजून एक पूल तयार होऊ शकला असता आणि पुलावर नोटांचा डोंगर तयार  झाला असता!   टोलचा पैसा खासगी कंत्राटदाराच्या घशात न जाता तो पैसा सरकारच्या तिजोरीत जमा व्हायला हवा आणि त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे सरकारने टोलवसुलीचे कंत्राट न देता संपूर्ण देशात टोलवसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी, जेणेकरून त्यात भ्रष्टाचार, गैरकारभार होणार नाही. फास्टटॅगसारख्या तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य आहे. सरकारची प्रामाणिक इच्छा असल्यास टोलवसुलीची पद्धत अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही आणि अद्ययावत केली जाऊ शकते.  त्याद्वारे   ऑटोमॅटिक पद्धतीने टोलवसुली सुरू केल्यास  टोलवसुलीत पूर्ण पारदर्शकता येऊन याला सूट, त्याला सूट या प्रकारांनादेखील आळा बसेल.संपूर्ण देशात संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने टोलवसुली चांद्रयान मोहीम राबवणाऱ्या देशाला अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी गरज आहे ती जनरेट्याची आणि  राजकीय प्रशासकीय रेट्याची.

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाGovernmentसरकार