शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रस्त्यांवर खर्च किती, टोलवसुली किती? हिशेब कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 10:27 IST

टोलचा पैसा खासगी कंत्राटदारांकडे न जाता सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे संपूर्ण देशात टोल वसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी!

सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, नवी मुंबई  -टोलनाके आणि टोलवसुली हा आपल्या देशात अखंड चर्चेचा विषय आहे.   त्यात काही तातडीच्या घटना घडल्या की हा विषय लगेच पेटतो. एका तरुण राजकीय नेत्याला टोलनाक्यावर ताटकळत राहावे लागल्याने त्याच्या तरुण, उत्साही कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची नासधूस केली, हे अलीकडेच घडले. आणि आता अख्खा महामार्गच खड्ड्यात गेल्यावर सरकार आणि कंत्राटदार कंपन्या कोणत्या अधिकाराने टोलवसुली करतात, असा पावसाळी प्रश्न पुन्हा तोंड वासून उभा आहे.भारतात समस्येच्या निराकरणाचे दोन मार्ग आहेत : पहिला प्रकार म्हणजे समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर सुयोग्य उपाय करत त्या समस्येचे निराकरण करणे. दुसरा प्रकार म्हणजे कारण माहीत असूनदेखील राजकीय- प्रशासकीय स्वार्थासाठी सदरील समस्या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे. टोलवसुली ही दुसऱ्या प्रकारात मोडणारी समस्या आहे.टोलवसुली पद्धत सुरू झाल्यापासून तिच्याविरुद्ध अनेक आंदोलने झाली. टोलनाका तोडफोडीचे प्रकार झाले. टोलनाक्यावर बाउन्सरच्या माध्यमातून दादागिरीचे अनेक प्रकार समोर आले. तरीदेखील टोलवसुली जोमाने सुरू आहे. भविष्यातदेखील टोलमुक्ती असंभव आहे,  याची नागरिकांना खात्री आहे. भ्रष्टाचार निपटण्याची  भीष्मप्रतिज्ञा करणारे सरकार येऊनदेखील टोलवसुलीला कुठलाही धक्का पोहाेचलेला नाही यावरूनच  ही समस्या सर्वच राजकीय पक्षांना कशी प्राणप्रिय आहे हे ध्यानात येऊ शकते.देशात ज्या ज्या ठिकाणी टोलवसुली सुरू आहे त्या त्या ठिकाणच्या रस्त्यांवर किती खर्च झाला आणि आजवर त्या त्या ठिकाणी किती टोलवसुली झाली यावर  श्वेतपत्रिका काढावी, अशी ‘जनमन की बात’ आहे. टोलवसुलीत पारदर्शकता का नाही हा संशोधनाचा विषय आहे. टोलवसुलीतील गुंतागुंतीमुळे सर्वांच्याच प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहताना दिसते आहे.नागरिकांची केवळ एकच अपेक्षा आहे की  टोलवसुली ही रस्ते निर्मितीसाठी  केल्या जाणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात केली जावी. टोलवसुलीत पारदर्शकता हवी आणि टोलमधून वसूल केली जाणारी रक्कम ही शासनाच्या तिजोरीत जमा व्हायला हवी. जमा झालेल्या याच रकमेमधून अन्य ठिकाणी रस्त्यांची निर्मिती केली जायला हवी.येणारा खर्च व केली जाणारी टोलवसुली याचा दूरान्वये संबंध दिसत नाही याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सायन-पनवेल मार्गावरील खाडीपुलाचे देता येईल. या टोलनाक्यावर टोलच्या रूपाने प्राप्त नोटा खाडीत दोन्ही बाजूला पत्रे ठोकून त्यात फेकल्या असत्या तरी अजून एक पूल तयार होऊ शकला असता आणि पुलावर नोटांचा डोंगर तयार  झाला असता!   टोलचा पैसा खासगी कंत्राटदाराच्या घशात न जाता तो पैसा सरकारच्या तिजोरीत जमा व्हायला हवा आणि त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे सरकारने टोलवसुलीचे कंत्राट न देता संपूर्ण देशात टोलवसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी, जेणेकरून त्यात भ्रष्टाचार, गैरकारभार होणार नाही. फास्टटॅगसारख्या तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य आहे. सरकारची प्रामाणिक इच्छा असल्यास टोलवसुलीची पद्धत अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही आणि अद्ययावत केली जाऊ शकते.  त्याद्वारे   ऑटोमॅटिक पद्धतीने टोलवसुली सुरू केल्यास  टोलवसुलीत पूर्ण पारदर्शकता येऊन याला सूट, त्याला सूट या प्रकारांनादेखील आळा बसेल.संपूर्ण देशात संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने टोलवसुली चांद्रयान मोहीम राबवणाऱ्या देशाला अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी गरज आहे ती जनरेट्याची आणि  राजकीय प्रशासकीय रेट्याची.

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाGovernmentसरकार