शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खुर्ची सोडण्याची हिंमत किती राजकीय नेते करू शकतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 09:35 IST

ब्रिटनच्या मावळत्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांत दिलेला राजीनामा हे लोकशाहीतील प्रामाणिक आचरणाचे आदर्श उदाहरण आहे.

- राही भिडे (ज्येष्ठ पत्रकार)

राजकारणात एकदा खुर्ची मिळाली, की ती सहजासहजी सोडायची नसते, सोडली की गेलीच समजा. ही एकूण जगभरातील नेत्यांची मानसिकता आहे. एकदा खुर्ची मिळाली की तहहयात हवी, असे जणू समीकरणच बनले आहे. कितीही अपराध झाले, वय झाले आणि साधे उभे राहता येत नसले, तरी निवडणूक आली, की खुर्ची टिकविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू होत असते. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांत दिलेला राजीनामा हे प्रामाणिक आचरणाचे आदर्श उदाहरण आहे.

राजकारणात कितीही चुका झाल्या, तरी आपलेच किती बरोबर आहे हे ठासून सांगायचे असते. भारतात पदोपदी हा अनुभव येतो. एखाद्या निर्णयाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे राजकारणी आता विरळाच. खुर्ची मिळाली, की तिला चिकटून बसण्याचा आणि कितीही मानहानी झाली, तरी ती न सोडण्याचा राजकारण्यांचा स्थायीभाव असतो; परंतु ट्रस त्याला अपवाद ठरल्या आहेत. आपण घेतलेल्या आर्थिक निर्णयाला पाठिंबा मिळत नाही आणि आपल्या निर्णयामुळे देशाला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढता येत नाही, हे लक्षात आले, तेव्हा ट्रस यांनी त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगून राजीनामा देणे पसंत केले. ज्या काळात त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली, तो काळ हा आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा काळ होता. त्या म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत, हुजूर पक्षाने मला निवडून दिले; परंतु हा जनादेश मी पूर्ण करू शकणार नाही.

त्यांच्या राजीनाम्याच्या एक दिवस अगोदर ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही राजीनामा दिला होता. त्या भारतीय वंशाच्या आहेत. ट्रस सरकारच्या धोरणांवर त्या नाराज होत्या. गृहमंत्री आपल्या पंतप्रधानांविरुद्ध बोलण्याची हिंमत करतो, हे ब्रिटनमध्येच शक्य आहे. खुर्चीला चिकटून राहणे, पक्षाने दिलेली निवडणूक आश्वासने न पाळणे ही वृत्ती वाढत असताना एखाद्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर घेऊन सत्तेचा मोह सोडण्याचे धाडस फक्त ट्रस यांच्यासारख्या नेत्याच करू शकतात. साहजिकच ब्रिटनमध्ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असून आता तिथला पुढचा पंतप्रधान कोण होणार, हा प्रश्न आहे. मात्र, नवा पंतप्रधान निवडून येईपर्यंत प्रथेप्रमाणे त्या काळजीवाहू पंतप्रधान राहतील. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात पंतप्रधानांची निवड होऊ शकते. 

पंतप्रधान जेव्हा राजीनामा देतात, तेव्हा देशात आपोआप सार्वत्रिक निवडणुका होत नाहीत. २०१६ मध्ये जेव्हा थेरेसा मे यांनी डेव्हिड कॅमेरून यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांनी तत्काळ निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला होता. नव्या पंतप्रधानांनी नियोजित वेळेपूर्वी निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला, तर देशातील पुढील निवडणुका जानेवारी २०१५ पूर्वी होण्याची शक्यता नाही. ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाचे नेते कीर स्टारमर यांनी आता सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ट्रस यांनी राजीनामा देताच हुजूर पक्षाने नवा नेता निवडण्याची तयारी सुरू केली आहे. नवे पंतप्रधान होण्यासाठी दावेदारांनी पक्षाच्या खासदारांना पाठिंबा मिळवण्याची कसरत सुरू केली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

सुनक यांचा पराभव करूनच लिझ ट्रस पंतप्रधान झाल्या होत्या. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शर्यतीतून माघार घेतली आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये सुनक हे आजही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असलेले सुनक त्यामुळे पंतप्रधान झाले आहेत. भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान झाल्यामुळे इतिहास घडला आहे. परंतु लिझ यांचा भारताबरोबर मुक्त व्यापार धोरणाचा करार ते पुढे नेणार का, हा प्रश्न आहे. त्यांच्या देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आश्वासन सुनक यांनी दिले आहे.

टॅग्स :LondonलंडनPoliticsराजकारण