शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

कसा वाढेल संशोधनाचा दर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:33 IST

ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्या वक्तव्यावर खरोखरच मंथन करण्याची आवश्यकता आहे.

ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्या वक्तव्यावर खरोखरच मंथन करण्याची आवश्यकता आहे. जर भारताचा विचार केला तर संशोधनाच्या क्षेत्रात देश अद्यापही मागे आहे. विशेषत: विदर्भातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये अद्यापही दर्जेदार संशोधनाची टक्केवारी फारच कमी आहे. आजच्या ई-तंत्रज्ञानाच्या युगात संशोधनासाठी आवश्यक असलेले वाङ्मयीन साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय ‘ग्लोबल व्हिलेज’मुळे आपल्याकडे संशोधनासाठी पोषक वातावरण नाही, अशी स्थितीदेखील राहिलेली नाही. मात्र तरीदेखील नवीन काहीतरी शोधण्यापेक्षा अगोदरच्या संशोधकांची ‘री’ ओढणे किंवा त्यात काहीतरी छोटा बदल करून आपणदेखील संशोधक आहोत, असे मिरविण्यातच बहुतांश जण धन्यता मानतात. विशेषत: विद्यापीठांमध्ये होणाºया ‘पीएचडी’ संशोधनामध्ये तर असे चित्र प्रकर्षाने दिसून येते. दुर्दैवाची बाब म्हणजे इंटरनेटच्या महाजाळात वाङ्मयीन साहित्याचे भांडार असूनदेखील त्यासंदर्भातदेखील मेहनत करण्याची अनेकांची तयारी नसते. संशोधनपत्रिका किंवा प्रबंध लिहिताना सर्रासपणे वाङ्मयीन चौर्यकर्म करण्यात येते. साधी शब्दरचना बदलण्याची तसदीदेखील हे तथाकथित संशोधक घेत नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या ‘जर्नल्स’मध्ये भारतीय संशोधकांची संख्या ही अद्यापदेखील फारच कमी आहे. संशोधन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो संयम. संशोधन म्हटले की त्यात अनेक चुका होणार हे अपेक्षितच असते. प्रयोगांमधील चुकांमधून पुढील दिशा मिळते. पाश्चिमात्य देशांमध्ये एकच प्रयोग वर्षानुवर्षे चालतो व त्यातून नवनिर्मिती होते. मनातील शंका ते निर्भिडपणे तज्ज्ञांना, सहकाºयांना विचारतात. आपल्याकडे मात्र ‘तो काय म्हणेल’ या विचारातूनच मौन साधणेच पसंत केले जाते. भारतातील संशोधकांमध्ये प्रचंड बुुद्धिमत्ता असूनदेखील केवळ मानसिकतेचा अभाव असल्यामुळे नवनिर्मिती ही एका चौकटीत मर्यादित राहते. त्यामुळेच तर ‘आयआयटी’, ‘नीरी’ यासारख्या काही संस्था सोडल्या तर इतर ठिकाणी नवीन काहीतरी शोधून काढण्यासाठीची जिद्द संशोधकांमध्ये फारशी दिसून येत नाही. आजच्या युगात दर्जेदार शोधासाठी आंतरशास्त्रीय विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र संबंधित विषय माझा नाही, तर मी का विचार करू ही मानसिकता येथील संशोधकांसाठी घातक ठरते आहे. या मानसिकतेत बदल झाला तरच संशोधनाचा दर्जा वाढेल.