शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

कसा वाढेल संशोधनाचा दर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:33 IST

ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्या वक्तव्यावर खरोखरच मंथन करण्याची आवश्यकता आहे.

ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्या वक्तव्यावर खरोखरच मंथन करण्याची आवश्यकता आहे. जर भारताचा विचार केला तर संशोधनाच्या क्षेत्रात देश अद्यापही मागे आहे. विशेषत: विदर्भातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये अद्यापही दर्जेदार संशोधनाची टक्केवारी फारच कमी आहे. आजच्या ई-तंत्रज्ञानाच्या युगात संशोधनासाठी आवश्यक असलेले वाङ्मयीन साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय ‘ग्लोबल व्हिलेज’मुळे आपल्याकडे संशोधनासाठी पोषक वातावरण नाही, अशी स्थितीदेखील राहिलेली नाही. मात्र तरीदेखील नवीन काहीतरी शोधण्यापेक्षा अगोदरच्या संशोधकांची ‘री’ ओढणे किंवा त्यात काहीतरी छोटा बदल करून आपणदेखील संशोधक आहोत, असे मिरविण्यातच बहुतांश जण धन्यता मानतात. विशेषत: विद्यापीठांमध्ये होणाºया ‘पीएचडी’ संशोधनामध्ये तर असे चित्र प्रकर्षाने दिसून येते. दुर्दैवाची बाब म्हणजे इंटरनेटच्या महाजाळात वाङ्मयीन साहित्याचे भांडार असूनदेखील त्यासंदर्भातदेखील मेहनत करण्याची अनेकांची तयारी नसते. संशोधनपत्रिका किंवा प्रबंध लिहिताना सर्रासपणे वाङ्मयीन चौर्यकर्म करण्यात येते. साधी शब्दरचना बदलण्याची तसदीदेखील हे तथाकथित संशोधक घेत नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या ‘जर्नल्स’मध्ये भारतीय संशोधकांची संख्या ही अद्यापदेखील फारच कमी आहे. संशोधन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो संयम. संशोधन म्हटले की त्यात अनेक चुका होणार हे अपेक्षितच असते. प्रयोगांमधील चुकांमधून पुढील दिशा मिळते. पाश्चिमात्य देशांमध्ये एकच प्रयोग वर्षानुवर्षे चालतो व त्यातून नवनिर्मिती होते. मनातील शंका ते निर्भिडपणे तज्ज्ञांना, सहकाºयांना विचारतात. आपल्याकडे मात्र ‘तो काय म्हणेल’ या विचारातूनच मौन साधणेच पसंत केले जाते. भारतातील संशोधकांमध्ये प्रचंड बुुद्धिमत्ता असूनदेखील केवळ मानसिकतेचा अभाव असल्यामुळे नवनिर्मिती ही एका चौकटीत मर्यादित राहते. त्यामुळेच तर ‘आयआयटी’, ‘नीरी’ यासारख्या काही संस्था सोडल्या तर इतर ठिकाणी नवीन काहीतरी शोधून काढण्यासाठीची जिद्द संशोधकांमध्ये फारशी दिसून येत नाही. आजच्या युगात दर्जेदार शोधासाठी आंतरशास्त्रीय विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र संबंधित विषय माझा नाही, तर मी का विचार करू ही मानसिकता येथील संशोधकांसाठी घातक ठरते आहे. या मानसिकतेत बदल झाला तरच संशोधनाचा दर्जा वाढेल.