शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कसा वाढेल संशोधनाचा दर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:33 IST

ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्या वक्तव्यावर खरोखरच मंथन करण्याची आवश्यकता आहे.

ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्या वक्तव्यावर खरोखरच मंथन करण्याची आवश्यकता आहे. जर भारताचा विचार केला तर संशोधनाच्या क्षेत्रात देश अद्यापही मागे आहे. विशेषत: विदर्भातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये अद्यापही दर्जेदार संशोधनाची टक्केवारी फारच कमी आहे. आजच्या ई-तंत्रज्ञानाच्या युगात संशोधनासाठी आवश्यक असलेले वाङ्मयीन साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय ‘ग्लोबल व्हिलेज’मुळे आपल्याकडे संशोधनासाठी पोषक वातावरण नाही, अशी स्थितीदेखील राहिलेली नाही. मात्र तरीदेखील नवीन काहीतरी शोधण्यापेक्षा अगोदरच्या संशोधकांची ‘री’ ओढणे किंवा त्यात काहीतरी छोटा बदल करून आपणदेखील संशोधक आहोत, असे मिरविण्यातच बहुतांश जण धन्यता मानतात. विशेषत: विद्यापीठांमध्ये होणाºया ‘पीएचडी’ संशोधनामध्ये तर असे चित्र प्रकर्षाने दिसून येते. दुर्दैवाची बाब म्हणजे इंटरनेटच्या महाजाळात वाङ्मयीन साहित्याचे भांडार असूनदेखील त्यासंदर्भातदेखील मेहनत करण्याची अनेकांची तयारी नसते. संशोधनपत्रिका किंवा प्रबंध लिहिताना सर्रासपणे वाङ्मयीन चौर्यकर्म करण्यात येते. साधी शब्दरचना बदलण्याची तसदीदेखील हे तथाकथित संशोधक घेत नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या ‘जर्नल्स’मध्ये भारतीय संशोधकांची संख्या ही अद्यापदेखील फारच कमी आहे. संशोधन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो संयम. संशोधन म्हटले की त्यात अनेक चुका होणार हे अपेक्षितच असते. प्रयोगांमधील चुकांमधून पुढील दिशा मिळते. पाश्चिमात्य देशांमध्ये एकच प्रयोग वर्षानुवर्षे चालतो व त्यातून नवनिर्मिती होते. मनातील शंका ते निर्भिडपणे तज्ज्ञांना, सहकाºयांना विचारतात. आपल्याकडे मात्र ‘तो काय म्हणेल’ या विचारातूनच मौन साधणेच पसंत केले जाते. भारतातील संशोधकांमध्ये प्रचंड बुुद्धिमत्ता असूनदेखील केवळ मानसिकतेचा अभाव असल्यामुळे नवनिर्मिती ही एका चौकटीत मर्यादित राहते. त्यामुळेच तर ‘आयआयटी’, ‘नीरी’ यासारख्या काही संस्था सोडल्या तर इतर ठिकाणी नवीन काहीतरी शोधून काढण्यासाठीची जिद्द संशोधकांमध्ये फारशी दिसून येत नाही. आजच्या युगात दर्जेदार शोधासाठी आंतरशास्त्रीय विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र संबंधित विषय माझा नाही, तर मी का विचार करू ही मानसिकता येथील संशोधकांसाठी घातक ठरते आहे. या मानसिकतेत बदल झाला तरच संशोधनाचा दर्जा वाढेल.