शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

'एनटीए'ने एवढ्या मोठ्या घोडचुका कशा केल्या? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 05:49 IST

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अनेक चुका केल्या. त्याची उत्तरे त्यांच्याकडे आहेत का? त्यामुळे 'एनटीए'ची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

हरीश बुटले, संस्थापक, 'डिपर' आणि संपादक, 'तुम्ही आम्ही पालक'

पेपरफुटीचे प्रकरण किंवा सॉल्व्हर गँगचे कृत्य हे समाजकंटक आणि नतद्रष्ट वृत्तीच्या लोकांचे काम आहे आणि तो प्रश्न नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अखत्यारीबाहेरचा आहे असे जरी गृहीत धरले तरी ज्या बाबतीत 'एनटीए'ची स्वतःची जबाबदारी होती त्या ठिकाणी त्यांनी एवढ्या घोडचुका कशा केल्या? ही चुकांची मालिका न संपणारी असल्याने एनटीएची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. NEET UG बाबतचा संपूर्ण घटनाक्रम बघता पुढील प्रश्नांची कोणती उत्तरे एनटीए देऊ शकेल याबाबत शंकाच आहे.

१. ऑक्टोबर महिन्यामध्ये अचानकपणे २२ ते २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला. अभ्यासक्रम कमी झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर सोपे जातील आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर गुण मिळतील याची जाणीव असतानादेखील अंतिम पेपर साधारण का काढला? हे नेमकं का आणि कशासाठी केलेलं होतं याचं कोणतंही कारण दिलेलं नाही.२. एनटीएने फॉर्म भरून घेताना एक महिन्याची मुदत संपून गेल्यानंतरही दोन दिवसासाठी (एप्रिल ९ व १०) पोर्टल पुन्हा सुरू करण्यामागे काय उद्देश होता? ते कोणाच्या परवानगीने आणि कशासाठी सुरू करण्यात आले? दुसऱ्या टप्प्यात नेमक्या किती विद्याथ्यर्थ्यांची नोंदणी झाली आणि या वाढलेल्या गुणांमध्ये यापैकी किती विद्यार्थी समाविष्ट आहेत याची कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही.३. परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करताना केवळ विद्यार्थ्यांचे नाव, ज्यामध्ये त्याच्या आई-वडिलांचा कोणताही उल्लेख नसलेले फॉर्म्स एनटीएने स्वीकारले तरी कसे ? त्या दोन दिवसांत भरलेल्या फॉर्म्समधील काही विद्यार्थ्यांना एकच केंद्र कसे व का देण्यात आले? त्या त्या राज्यात केंद्र असताना विद्यार्थ्यांना इतर राज्यातून परीक्षा देण्याची मुभा का देण्यात आली? असे नियम ठेवण्यामागे नेमका उद्देश काय होता?४. एनटीएने कोणतीही पूर्व सूचना न देता १४ जूनला लागणारा निकाल ४ जूनला सायंकाळी जाहीर केला. दहा दिवस शिल्लक असताना एवढी घाई करण्याचे कारण काय? त्याच दिवशी लोकसभेचे निकाल जाहीर होत होते. एकाच केंद्रावरील आठ विद्यार्थी, ज्यापैकी सहा विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आणि त्यामुळेच शंका निर्माण झाली, त्या शंकेचं निरसन त्यांनी सुरुवातीलाच का केलं नाही? दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७१८ आणि ७१९ गुण मिळाले. NEET च्या प्रक्रियेत असे गुण मिळूच शकत नाहीत हे माहीत असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून निकाल का जाहीर केला?

५. निकाल जाहीर करताना असे गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत ते 'ग्रेस' गुण दिल्यामुळे मिळालेले आहेत, ते निकाल जाहीर करताना का सांगितले नाही? ग्रेस मार्क्स देण्यासाठी जे सूत्र वापरले, ते सूत्र CLAT परीक्षेच्या वेळी २०१८ सालचे होते. मात्र ती परीक्षा ऑनलाइन होती आणि NEET परीक्षा ऑफलाइन ! त्याचप्रमाणे ते सूत्र मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी वापरायचे नाही असे निर्देश असताना ते वापरले ही सर्वांत मोठी घोडचूक होती. ती का करण्यात आली?६. ग्रेस मार्क्स केवळ १५६३ विद्यार्थ्यांनाच दिले आहेत, हे कोणत्या आधारावर सूचित केले? ७२० ते ६२० या गुणांच्या दरम्यानचा फुगवटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसा निर्माण झाला आणि तोच ६२० ते ५२० या १०० माकांच्या दरम्यान त्या प्रमाणात का नाही या विषयी कोणतेही समाधानकारक विश्लेषण का दिले नाही?

या आणि अशा अनेक प्रश्नांची एनटीएकडे समाधानकारक उत्तरेच नाही. याशिवाय पेपर फुटी आणि केंद्र पातळीवर विद्यार्थ्यांना पेपर सोडवून देणाऱ्यांच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्यावर वचक निर्माण करणे हादेखील एक महत्त्वाचा विषय आहे. त्यातच भरीस भर म्हणजे थेट डार्क वेबवर पेपर उपलब्ध झाल्याने UGC-NET आणि त्यापुढील दोनच दिवसांत NEET-PG देखील कॅन्सल करावी लागल्याने एनटीएची पुरती नामुष्की झाली आहे. एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार यांची तडकाफडकी उचलबांगडी करून नवीन कमान कर्नाटक कॅडरचे प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे सोपवली आहे. मात्र NEET-UG चा आक्रोश बघता RE-NEET घेण्यावाचून कोणताही पर्याय दिसत नाही.            

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र