शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

देशात स्फोटके सहजपणे कशी उपलब्ध होऊ शकतात?

By विजय दर्डा | Updated: August 17, 2020 16:01 IST

बैरुतमधील स्फोटाने फार मोठ्या धोक्याची प्रकर्षाने झाली जाणीव

ठळक मुद्देबैरुत बंदरात गेली सहा वर्षे अयोग्य पद्धतीने साठवणूक केलेल्या २,७०० टन अमोनियम नायट्रेटच्या साठ्यामध्ये काही कारणाने ठिणगी पडून हा महाभयंकर विनाश झाला.

- विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)दोन आठवड्यांपूर्वी लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटांची बातमी आली तेव्हा हा दहशतवाद्यांनी केलेला घातपात असावा, असेच सर्वांना सुरुवातीस वाटले; परंतु नंतर असे स्पष्ट झाले की, बैरुत बंदरात गेली सहा वर्षे अयोग्य पद्धतीने साठवणूक केलेल्या २,७०० टन अमोनियम नायट्रेटच्या साठ्यामध्ये काही कारणाने ठिणगी पडून हा महाभयंकर विनाश झाला. त्या स्फोटाने संपूर्ण जग हादरून गेले. त्यात दीडशेहून अधिक लोक ठार झाले व चार हजारांहून अधिक गंभीर जखमी झाले. हजारो इमारती पूर्णपणे उद््ध्वस्त झाल्याने किंवा राहण्यायोग्य न राहिल्याने सुमारे दोन लाख लोक बेघर झाले. प्राणहानीखेरीज इतर नुकसान सुमारे १५ अब्ज डॉलरचे झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. बंदरामध्ये हे अमोनियम नायट्रेट अयोग्य पद्धतीने साठविले गेल्याने हा विनाश सोसावा लागला हे जेव्हा स्पष्ट झाले, तेव्हा लेबेनॉनचे नागरिक स्वाभाविकपणे संतापले. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून लोकांनी हा संताप व्यक्त केला.या दबावाने लेबेनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागला. जेथे अशाच प्रकारे अमोनियम नायट्रेटचे साठे कित्येक वर्षे पडून आहेत, अशा इतरही अनेक देशांची झोप बैरुतमधील या घटनेने उडाली. यात भारताचाही समावेश आहे. एका कंपनीने अयोग्य पद्धतीने आयात केलेले ७४० टन अमोनियम नायट्रेट कस्टम्स विभागाने सन २०१५ मध्ये जप्त केले व ते चेन्नई बंदरात तेव्हापासून पडून आहे. सरकारला जणू त्याचा विसर पडला. बंदरात ज्या ठिकाणी ते ठेवले आहे, तेथून ७०० मीटर अंतरावर सात हजार लोक राहत असलेली एक वस्ती आहे. बैरुतमध्ये स्फोट होताच व त्याचे कारण स्पष्ट होताच भारतात अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली व त्यांनी चेन्नईतील २०० टन अमोनियम नायट्रेट तातडीने हैदराबादला हलविले. तेथे दुसºया एका कंपनीने ते खरेदी केले. खरा प्रश्न असा आहे की, जप्त केलेला हा एवढा घातक माल गेली पाच वर्षे कंटेनरमध्ये असुरक्षितपणे भरलेल्या अवस्थेत बंदरात का व कसा ठेवला गेला? बहुधा हा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो याची अधिकाऱ्यांना कल्पना नसणे हेच याचे कारण असावे.

खरे तर अमोनियम नायट्रेट ही वस्तू स्फोटक नाही; पण त्यात आॅक्सिजनचे प्रमाण खूप असल्याने जेव्हा उघड्या आगीशी त्याचा संपर्क येतो, तेव्हा त्यातील आॅक्सिजन मुक्त होऊन आग आणखी भडकविण्यास ते मदत करते. या रासायनिक प्रक्रियेने प्रचंड स्फोट होतो. याची भीषणता किती असू शकतो हे बैरुतमध्ये दिसलेच आहे. अमोनियम नायट्रेट हे एक औद्योगिक वापराचे रसायन आहे. त्याच्यापासून रासायनिक खताचेही उत्पादन केले जाते. या दोन्ही वापरांसाठीच्या अमोनियम नायट्र्ेटची श्रेणी निरनिराळी असते. या वस्तूच्या साठवणुकीसाठी विस्फोटक नियमावलीनुसार अनेक कडक नियम केलेले आहेत. त्याची साठवणूक मोकळ्या आणि हवेशीर जागेत करण्याचे बंधन आहे. तसेच थेट सूर्यप्रकाश व पाण्याच्या संपर्कात ते येता कामा नये, अशी काळजीही घ्यावी लागते. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघानेही याचा समावेश धोकादायक वस्तूंमध्ये केला आहे. सरकारने नंतर जी धावपळ केली, त्यावरून चेन्नईत ते सुरक्षित ठेवलेले नव्हते, हेच स्पष्ट होते. आता त्याच्या सुरक्षेची व्यवस्था केली गेली व दरम्यानच्या काळात काही विपरीत घडले नाही, हे सुदैव म्हणायचे.हा विषय फक्त चेन्नई बंदरातील अमोनियम नायट्र्ेटपुरता मर्यादित नाही. आपल्याकडे एकूणच असे विस्फोटक पदार्थ अत्यंत निष्काळजीपणाने का हाताळले जातात व ते बाजारात सहजपणे कसे उपलब्ध होऊ शकतात, हा खरा कळीचा मुद्दा आहे. सरकारने या दोन्ही बाबतीत गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. यातील निष्काळजीपणा एवढा सर्रास आहे की, फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून लोकांचे मृत्यू झाले नाहीत, असे एकही वर्ष जात नाही. चेन्नईपासून जवळच शिवकाशी हे फटाका उद्योगाचे मुख्य केंद्र आहे. देशातील ९० टक्के फटाके तेथे तयार होतात. तेथील फटाके कारखान्यांमध्ये सात लाख लोक काम करतात. फटाक्यांमध्येही अन्य रसायनांसोबत अमोनियम नायट्रेट वापरले जाते. ही रसायने परवान्याशिवाय मिळत नाहीत; पण दुर्घटना घडली की असे समोर येते की, त्या कारखान्यात परवान्याशिवाय ही स्फोटके आणली, साठवली व वापरली जात होती. पंजाबमध्ये गुरदासपूर शहरात भर वस्तीत असलेल्या अशाच एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन व आग लागून २५ लोकांचा हकनाक बळी गेला होता. उत्तर प्रदेश, ओडिशा व खुद्द राजधानी दिल्लीतही अशा दुर्घटना घडल्या आहेत. हे सर्व विस्फोटकांच्या बाबतीत बेफिकिरपणा केल्यामुळेच घडू शकते.

या घातक वस्तू बाजारात सहजपणे उपलब्ध होण्याच्या बाबतीतही हेच दिसते. सुरुंग लावून दगड फोडण्यासाठी, जमिनीत मोठा खड्डा करण्यासाठी किंवा शहरांमध्ये बांधलेल्या बहुमजली बेकायदा इमारती सुरक्षितपणे पाडण्यासाठी जिलेटिन कांड्यांचा सर्रास वापर केला जातो. तुम्ही या जिलेटिनच्या कांड्या बाजारातून उघडपणे विकत घेऊ शकता. याच सहजपणे मिळणाºया जिलेटिनचा वापर दहशतवादी व नक्षलवादीही करतात. सन २०१७ मध्ये मध्य प्रदेशमधील पेटलावद येथे घडलेली घटना या संदर्भात नमूद करावी लागेल. तेथे वाळूच्या गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट हाऊन १०० हून अधिक व्यक्तींना प्राण गमवावे लागले होते. जिलेटिनचा वापर करून बॉम्ब अगदी सहजपणे बनविता येतो. केरळमध्ये शेतमळ्याचे नुकसान करणाºया हत्तींचा बंदोबस्त करण्याच्या नादात काही महिन्यांपूर्वी एका हत्तीणीला अननसातून विस्फोटक खायला घातले गेले व त्याने तिचा मृत्यू झाला होता. यावरून देशात ही विस्फोटके किती सहजपणे कोणालाही कशी उपलब्ध होऊ शकतात, हेच विदारक वास्तव स्पष्ट होते.याच सहजपणे उपलब्ध होणाºया स्फोटकांचा वापर करून दहशतवादी व नक्षलवादी ‘इप्रोवाईज्ड एक्स्प्लोजिव डिवाइस’ (आयईडी) तयार करतात. अशा ‘आयर्ईडीं’च्या स्फोटांनी सशस्त्र सैन्यदले व पोलिसांचे शेकडो जवान आतापर्यंत मारले गेले आहेत. तरीही सरकार स्फोटकांची सहज उपलब्धता व त्यांचा अवैध वापर बंद करण्यासाठी काहीही खंबीर उपाय योजत नाही, हे पाहून आश्चर्य वाटते. स्फोटकांचा व्यापार कठोरपणे नियंत्रित केल्याशिवाय व त्याच्या वाहतूक , साठवणुकीची सुरक्षित व्यवस्था केल्याखेरीज आपण सुरक्षितपणे राहू शकणार नाही. म्हणूनच खूप सावधपणे वागणे गरजेचे आहे.

(vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :Beirut Blastबेरुतमध्ये स्फोट