शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

हरिसाल खरंच किती डिजिटल झाले, सरकारचे खरे लाभार्थी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:16 AM

मेळघाटातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

मेळघाटातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. या गावाची डिजिटल जाहिरात देशभरात गाजली. मात्र काँग्रेसने आॅन दी स्पॉट रिपोर्ट करीत हरिसाल खरंच किती डिजिटल झाले, याचे वास्तव जनतेसमोर मांडले. त्यामुळे सरकारचे खरे लाभार्थी कोण, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा असलेल्या नागपुरातील ग्रामपंचायतीकडे पैसे नसल्याने ग्रामपंचायतींचे वायफाय ‘आॅफ’ झाले आहेत. डिजिटल इंडियाअंतर्गत जिल्ह्यातील ७७० ग्रामपंचायतींमध्ये वायफाय कनेक्शन देण्यात आले. बीएसएनएल आणि एका खासगी कंपनीच्या माध्यमातून या सेवा पुरविण्यात आल्या. ग्रामपंचायतीकडे असलेले उत्पन्नाचे स्रोत आणि वायफायचे बिल याचा ताळमेळ बसत नसल्याने आज ९० टक्के ग्रामपंचायतीत वायफाय सुविधा बंद झाल्या आहेत. सरकारचा डिजिटल व्हिलेज आणि डिजिटल जिल्ह्यामागचा उद्देश प्रामाणिक असला तरी त्याचे नेमके लाभार्थी कोण? ज्यांच्या हितासाठी ही संकल्पना तयार करण्यात आली त्यांना या योजनांचा लाभ मिळतोय का? याचे आॅडिट सरकारी यंत्रणांनी करणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडियावर ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार...’ या जाहिरातींना उत्तर देण्यासाठी विरोधकांनी सरकारचे खरे लाभार्थी कोण ? कुणाला कुठे कसा फायदा झाला ? हे पटवून देणारे डिजिलट बॉम्ब व्हायरल केले आहेत. त्यामुळे भक्त अस्वस्थ आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या लाभार्थ्यांची पोलखोल करण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. नागपुरात कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या घरापर्यंत आमदार निधीतून रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याच्या बांधकामाची माहिती देणाºया फलकावर आंबेकरचे नाव झळकले. सोशल मीडियावर संतोष आंबेकरच्या फोटोसह ‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे भाजप नेते अस्वस्थ झाले. एरवी देशात कुठेही काही झाले तरी प्रतिक्रिया देण्यास तत्पर असलेले भाजपचे नागपुरातील प्रवक्ते या मुद्यावर आऊट आॅफ कव्हरेज राहिले. परवा महापालिकेच्या स्थायी समितीने नागपुरातील कचरा संकलन करणाºया कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडला मंजूर खर्चापेक्षा ७.३३ कोटी रुपयांचा अधिकचा निधी वाढवून दिला. कनकने प्रामाणिकपणे कचरा उचलला असता तर नागपूरचा नंबर देशातील स्वच्छ शहराच्या यादीत अग्रकमावर असता. मात्र कनकच्या वाढीव बिलात ‘लाभार्थी’ अनेक असल्याने मनपात नेमके सरकार कुणाचे ? हा प्रश्न चर्चिला जात आहे.

टॅग्स :digitalडिजिटल