शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

परोपकार कसा घडावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 20:57 IST

‘अच्छे दिन’साठी आता थोडा त्रास जळगावकर सहन करतायत, हे खरे आहे. परंतु, काही महाभाग मात्र छिद्रान्वेषी कसे असतात ते पाहून हसावे की रडावे, अशी स्थिती होते.

मिलिंद कुलकर्णीमराठी माणूस तसा अध्यात्माची गोडी असणारा म्हणून ओळखला जातो. विठ्ठल, संत हे त्याचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. कीर्तन, प्रवचन, अभंगांमध्ये तो रमतो. पापभिरु, परोपकारी अशी स्वभाववृत्ती आहे. रांगडेपण जसे भूषणावह असते, तशीच ही परोपकारी वृत्ती अभिमानास्पद आहेच.ही स्वभाववृत्ती, मराठी बाणा मात्र काही वेळेस कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रसंग साधे असतात पण आम्ही एवढा प्रतिष्ठेचा विषय करतो की कळायला मार्ग नाही.आता जळगाव शहरातील उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. सध्या महापालिकेकडून अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. नवीन पाईप लाईन टाकणे आणि त्यावरुन प्रत्येक घराला नळसंयोजन देण्याचे कार्य वेगात सुरु आहे. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी पूर्वी ज्या दिशेला पाईप लाईन होती, त्याच्या जवळपास खड्डे केले जात आहे. म्हणजे डांबरी रस्ता सरळ रेषेत खोदला जात आहे. नळसंयोजनासाठी आडवे खोदले जात आहे. गल्ली बोळातील रस्त्याची अशी उभी-आडवी चाळण झाली आहे. भविष्यातील ‘अच्छे दिन’साठी आता थोडा त्रास जळगावकर सहन करतायत, हे खरे आहे. परंतु, काही महाभाग मात्र छिद्रान्वेषी कसे असतात ते पाहून हसावे की रडावे, अशी स्थिती होते. रस्ता हा रहदारीसाठी आहे. पण आपल्या घरासमोरील रस्ता हा आपला खाजगी मालकीचा आहे, असा बहुसंख्याकाचा समज असतो. चाळण झालेल्या रस्त्यामुळे अवघ्या १२ फुटी रुंदीच्या रस्त्यांवर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच चारचाकी वाहन नागरिक घरासमोरच लावतात. खड्डे चुकविण्याच्या नादात कुणाचा कारला धक्का लागला तर समरप्रसंग ओढवलाच म्हणून समजा. गंमत म्हणजे, सार्वजनिक रस्ता खाजगी समजणारी ही मंडळी अंगणातील रस्त्यावरील खड्डा आजूबाजूची माती टाकून बुजविण्याचे सौजन्य मात्र दाखवत नाही. हे माझे काम नाही, महापालिका आणि कंत्राटदाराने ते केले पाहिजे. आमच्या करातून ही कामे होत असताना त्यांनी ती व्यवस्थित केली पाहिजे. पण अशी हक्काची भाषा बोलत असताना संघर्षाचा पवित्रा घ्यायची वेळ आली तर आम्ही मागे सरतो. पण परोपकार करुन आपल्या अंगणातील खड्डा बुजविला तर स्वत: ची आणि इतरांची अडचण दूर होईल. वाहनांचे नुकसान टळेल. धक्का बसणार नाही. हे मात्र समजून घेतले जात नाही.अशीच स्थिती अंगणातील स्वच्छता अभियानाची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न साकारताना आम्ही घरातील कचरा शेजारच्या अंगणात ढकलण्याचे काम मात्र इमाने इतबारे करीत असतो. माझे अंगण स्वच्छ दिसले पाहिजे. शेजाऱ्याचे घाण दिसले तर तो त्याचा प्रश्न. अगदी भारत-पाकिस्तान सीमारेषेसारखा हा संवेदनशील मुद्दा बनतो. जेव्हा शेजारी भडकतो, तेव्हा मात्र रस्ता हा सार्वजनिक आहे. तुमच्या मालकीचा नाही, असे दरडवायला कमी करीत नाही.परोपकाराची भावना कुठे जाते, हे कोडे पडल्याशिवाय राहत नाही. 

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव