शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

परोपकार कसा घडावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 20:57 IST

‘अच्छे दिन’साठी आता थोडा त्रास जळगावकर सहन करतायत, हे खरे आहे. परंतु, काही महाभाग मात्र छिद्रान्वेषी कसे असतात ते पाहून हसावे की रडावे, अशी स्थिती होते.

मिलिंद कुलकर्णीमराठी माणूस तसा अध्यात्माची गोडी असणारा म्हणून ओळखला जातो. विठ्ठल, संत हे त्याचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. कीर्तन, प्रवचन, अभंगांमध्ये तो रमतो. पापभिरु, परोपकारी अशी स्वभाववृत्ती आहे. रांगडेपण जसे भूषणावह असते, तशीच ही परोपकारी वृत्ती अभिमानास्पद आहेच.ही स्वभाववृत्ती, मराठी बाणा मात्र काही वेळेस कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रसंग साधे असतात पण आम्ही एवढा प्रतिष्ठेचा विषय करतो की कळायला मार्ग नाही.आता जळगाव शहरातील उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. सध्या महापालिकेकडून अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. नवीन पाईप लाईन टाकणे आणि त्यावरुन प्रत्येक घराला नळसंयोजन देण्याचे कार्य वेगात सुरु आहे. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी पूर्वी ज्या दिशेला पाईप लाईन होती, त्याच्या जवळपास खड्डे केले जात आहे. म्हणजे डांबरी रस्ता सरळ रेषेत खोदला जात आहे. नळसंयोजनासाठी आडवे खोदले जात आहे. गल्ली बोळातील रस्त्याची अशी उभी-आडवी चाळण झाली आहे. भविष्यातील ‘अच्छे दिन’साठी आता थोडा त्रास जळगावकर सहन करतायत, हे खरे आहे. परंतु, काही महाभाग मात्र छिद्रान्वेषी कसे असतात ते पाहून हसावे की रडावे, अशी स्थिती होते. रस्ता हा रहदारीसाठी आहे. पण आपल्या घरासमोरील रस्ता हा आपला खाजगी मालकीचा आहे, असा बहुसंख्याकाचा समज असतो. चाळण झालेल्या रस्त्यामुळे अवघ्या १२ फुटी रुंदीच्या रस्त्यांवर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच चारचाकी वाहन नागरिक घरासमोरच लावतात. खड्डे चुकविण्याच्या नादात कुणाचा कारला धक्का लागला तर समरप्रसंग ओढवलाच म्हणून समजा. गंमत म्हणजे, सार्वजनिक रस्ता खाजगी समजणारी ही मंडळी अंगणातील रस्त्यावरील खड्डा आजूबाजूची माती टाकून बुजविण्याचे सौजन्य मात्र दाखवत नाही. हे माझे काम नाही, महापालिका आणि कंत्राटदाराने ते केले पाहिजे. आमच्या करातून ही कामे होत असताना त्यांनी ती व्यवस्थित केली पाहिजे. पण अशी हक्काची भाषा बोलत असताना संघर्षाचा पवित्रा घ्यायची वेळ आली तर आम्ही मागे सरतो. पण परोपकार करुन आपल्या अंगणातील खड्डा बुजविला तर स्वत: ची आणि इतरांची अडचण दूर होईल. वाहनांचे नुकसान टळेल. धक्का बसणार नाही. हे मात्र समजून घेतले जात नाही.अशीच स्थिती अंगणातील स्वच्छता अभियानाची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न साकारताना आम्ही घरातील कचरा शेजारच्या अंगणात ढकलण्याचे काम मात्र इमाने इतबारे करीत असतो. माझे अंगण स्वच्छ दिसले पाहिजे. शेजाऱ्याचे घाण दिसले तर तो त्याचा प्रश्न. अगदी भारत-पाकिस्तान सीमारेषेसारखा हा संवेदनशील मुद्दा बनतो. जेव्हा शेजारी भडकतो, तेव्हा मात्र रस्ता हा सार्वजनिक आहे. तुमच्या मालकीचा नाही, असे दरडवायला कमी करीत नाही.परोपकाराची भावना कुठे जाते, हे कोडे पडल्याशिवाय राहत नाही. 

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव