शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोरोनामुळे वाजायला लागली घराघरातली भांडी; जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 06:29 IST

महिला आणि मुलांना होतोय त्रास

ब्राझील/जर्मनी/चीन/पाकिस्तान

पूर्वी घरं कशी शांत होती.. घराघरात मुलाबाळांचा गोंगाट असला, नवरा-बायकोची भांडणं तेव्हाही होत असली, घराघरांतली भांडी एकमेकांवर वाजत असली तरी त्यांचा आवाज कर्णकर्कश नव्हता. थोड्या वेळानं ही भांडणं, हे मतभेद मिटून किंवा ते टाळून पुन्हा प्रत्येक जण आपापल्या मार्गाला लागत होता. संसाराची गोडी त्यात दिसून येत होती. पण कोरोनानं आता घराघरातलं हे चित्रही बदललं आहे. घराघरातली भांडणं आणि वाद आता हमरीतुमरीवर येऊ लागले आहेत. आणि अगदी पोलीस स्टेशनपर्यंतही ते जाऊन पोहोचताहेत. बरं, एखाद्याच ठिकाणची ही परिस्थिती नाही, अगदी जगभरात घराघरांतल्या भांडणांची संख्या वाढते आहे. जगभरातल्या तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बरं या भांडणांचं कारण तरी काय? भांडणांची कारणंही तशी नवीन नाहीत. बऱ्याचदा अगदी किरकोळच, पण घरातली सगळीच माणसं आता चोवीस तास एकमेकांच्या संपर्कात असल्यानं, एकमेकांच्या जवळ असल्यानं त्यांच्यातल्या उणिवा जोडीदारांना आता प्रकर्षानं जाणवायला लागल्या. भांडणांचं मूळ कारण हेच.पण यातली चिंतेची प्रमुख गोष्ट म्हणजे ही भांडणं आता हिंसाचारावर गेलीत आणि या घरगुती हिंसाचाराला जगभर सर्वाधिक बळी पडताहेत त्या स्त्रिया आणि मुलंच. ब्राझीलपासून ते जर्मनीपर्यंत, इटलीपासून ते चायनापर्यंत आणि अगदी भारतापासून ते पाकिस्तानपर्यंत. जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे.

चीनमध्ये ज्या ठिकाणी सर्वप्रथम कोरोनाचा उद्रेक झाला, त्या वुहानच्या हुबेई प्रांतातही घरगुती हिंसाचाराचा आकडा सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तिथल्या पोलिसांच्या माहितीनुसार, या हुबेई प्रांतातील घरगुती हिंसाचारात पूर्वीच्या तुलनेत अल्पावधीतच तब्बल तीन पटींनी वाढ झाली आहे.

हाच ‘पॅटर्न’ जगभरात सगळीकडे वाढतो आहे. ब्राझीलमध्येही घरगुती हिंसाचारात वाढ झाली असून महिला आणि लहान मुलं त्याचा बळी ठरताहेत. तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, सध्याचा लॉकडाऊनचा काळ आणि लोकांना सक्तीनं स्वत:ला होम क्वारंटाइन करावं लागत असल्यामुळे सक्तीनं एकत्र राहावं लागतंय, पण हा लॉकडाऊनचा काळ नसता तर दाम्पत्यांमधलं घटस्फोटांचं प्रमाण निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं असतं.

जर्मनीचा रिपोर्ट सांगतो, तिथेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. कुटुंबांना सक्तीनं एकत्र राहावं लागतंय, नाहीतर ते कधीच विभक्त झाले असते. लॉकडाऊनचा काळ संपल्यावर कदाचित दाम्पत्य एकमेकांना कायमचा बायबाय करतील. जगातल्या या सगळ्याच ठिकाणी एक महत्त्वाचं साम्य आहे आणि ते म्हणजे केवळ कोरोनामुळे या घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे आणि त्याचं प्रमाण तब्बल ९० टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक आहे.

घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत अनेक देशांत लोकल हेल्पलाईन्सही चालवल्या जातात. त्या सगळ्याच हेल्पलाईन्सही सध्या तक्रारींनी भरभरून वाहताहेत. या हेल्पलाईन कर्मचाºयांचं तर म्हणणं आहे, यापूर्वी इतके बिझी आम्ही कधीच नव्हतो. नवरा-बायकोतली भांडणं सोडवताना आणि त्यांना शांत करताना आमच्या नाकी नऊ येतंय. ‘शांत बसा, समजून घ्या, चिडचीड करू नका, हीच वेळ आहे एकमेकांना साथ देण्याची’ असं सांगण्याशिवाय आम्हालाही दुसरा पर्याय कुठे आहे?..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत