शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हुक्क्याची काजळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:39 IST

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे स्वत:मधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणज स्वत:मधील दोष कमी करायचे. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संस्कारांची पायाभरणी पूर्ण क्षमतेनी झालेली असेल. त्यात जर आधुनिकतेच्या नावाखाली कुचराई केली गेली तर विध्वंस थांबविणे कठीण आहे.

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे स्वत:मधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणज स्वत:मधील दोष कमी करायचे. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संस्कारांची पायाभरणी पूर्ण क्षमतेनी झालेली असेल. त्यात जर आधुनिकतेच्या नावाखाली कुचराई केली गेली तर विध्वंस थांबविणे कठीण आहे. संस्कारावरची ही चर्चा पुन्हा नव्याने करण्याचे कारण याच आधुनिकतेच्या नादात तरुणाईने स्वीकारलेली आंधळी व्यसनाधीनता आहे. ही व्यसनाधीनता या तरुणाईला कशी विध्वंसाच्या दिशेने घेऊन चालली आहे, याची दाहक प्रचिती सोमवारी नागपूरकर पालकांना आली. गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच हुक्का पार्लरवर छापे घातले. यातल्या एका ठिकाणचे चित्र पाहून तर पोलिसांची डोकीही गरगरायला लागली. हे ठिकाण होते भारतनगर चौक. या चौकातल्या एका अर्पाटमेंटमध्ये पोलिसांचा ताफा शिरला तेव्हा नऊ अल्पवयीन मुले चक्क हुक्क्याचा धूर हवेत उडवत होते. ही तीच मुले होती जी शाळेच्या नावावर घरून निघाली होती आणि त्यांच्या पालकांच्या लेखी ती शाळेत विद्यार्जन करीत होती. पॉकेटमनीच्या नावावर मिळणारा बक्कळ पैसा, या पैशांचे ही मुले करतात काय हे बघायलाही वेळ नसलेले व्यस्त पालक, सोशल मीडियावरून सातत्याने शेअर होणारा व्यसनांचा थरार आणि हा थरार आपल्याला अंधकाराकडे घेऊन जातोय हे अजिबातच कळू नये इतके कोवळे वय, अशा अनेक कारणांमुळे हुक्क्याची ही काजळी अनेकांचे बालपण काळवंडून टाकत आहे. नागपुरात अनेक हुक्का पार्लर बिनबोभाट सुरू आहेत आणि तेथे अल्पवयीन मुलामुलींच्या उड्या पडत आहेत. पण, हा समाज दूषित करणारा व्यवसाय थांबविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते पोलीस आणि या पोलिसांना पगार देणारे सरकार दोघेही डोळयावर पट्टी बांधून बसले आहेत. मुंबईच्या कमला मिल आगीच्या घटनेनंतर ही पट्टी काही अंशी सैल झाली असेल आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हुक्का पार्लरवर संपूर्ण बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. या हुक्क्यामुळे भारताच्या भावी नागरिकांचे आयुष्य असे काळवंडत असताना तिकडे पर्यावरणही धोक्यात आले आहे. हुक्क्यामुळे तयार होणारे रासायनिक द्रव्य फेकून दिल्याने नदी व नाल्यांमध्ये प्रदूषणाची मात्रा वाढत आहे. हे वास्तव समोर असतानाही सरकार मात्र महसुलाच्या आकड्यांची जोडतोड करण्यातच व्यस्त आहे. ही सरकारी मानसिकता एका रात्रीत बदलणार नाही. पालकांनीही ती बदलण्याची वाट पाहू नये. त्यांनी उभी केलेली संस्कारांची भिंत सक्षम असेल तर हुक्क्याचा धूर त्यांच्या मुलांपर्यंत पोहचूच शकणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र