शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हुक्क्याची काजळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:39 IST

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे स्वत:मधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणज स्वत:मधील दोष कमी करायचे. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संस्कारांची पायाभरणी पूर्ण क्षमतेनी झालेली असेल. त्यात जर आधुनिकतेच्या नावाखाली कुचराई केली गेली तर विध्वंस थांबविणे कठीण आहे.

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे स्वत:मधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणज स्वत:मधील दोष कमी करायचे. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संस्कारांची पायाभरणी पूर्ण क्षमतेनी झालेली असेल. त्यात जर आधुनिकतेच्या नावाखाली कुचराई केली गेली तर विध्वंस थांबविणे कठीण आहे. संस्कारावरची ही चर्चा पुन्हा नव्याने करण्याचे कारण याच आधुनिकतेच्या नादात तरुणाईने स्वीकारलेली आंधळी व्यसनाधीनता आहे. ही व्यसनाधीनता या तरुणाईला कशी विध्वंसाच्या दिशेने घेऊन चालली आहे, याची दाहक प्रचिती सोमवारी नागपूरकर पालकांना आली. गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच हुक्का पार्लरवर छापे घातले. यातल्या एका ठिकाणचे चित्र पाहून तर पोलिसांची डोकीही गरगरायला लागली. हे ठिकाण होते भारतनगर चौक. या चौकातल्या एका अर्पाटमेंटमध्ये पोलिसांचा ताफा शिरला तेव्हा नऊ अल्पवयीन मुले चक्क हुक्क्याचा धूर हवेत उडवत होते. ही तीच मुले होती जी शाळेच्या नावावर घरून निघाली होती आणि त्यांच्या पालकांच्या लेखी ती शाळेत विद्यार्जन करीत होती. पॉकेटमनीच्या नावावर मिळणारा बक्कळ पैसा, या पैशांचे ही मुले करतात काय हे बघायलाही वेळ नसलेले व्यस्त पालक, सोशल मीडियावरून सातत्याने शेअर होणारा व्यसनांचा थरार आणि हा थरार आपल्याला अंधकाराकडे घेऊन जातोय हे अजिबातच कळू नये इतके कोवळे वय, अशा अनेक कारणांमुळे हुक्क्याची ही काजळी अनेकांचे बालपण काळवंडून टाकत आहे. नागपुरात अनेक हुक्का पार्लर बिनबोभाट सुरू आहेत आणि तेथे अल्पवयीन मुलामुलींच्या उड्या पडत आहेत. पण, हा समाज दूषित करणारा व्यवसाय थांबविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते पोलीस आणि या पोलिसांना पगार देणारे सरकार दोघेही डोळयावर पट्टी बांधून बसले आहेत. मुंबईच्या कमला मिल आगीच्या घटनेनंतर ही पट्टी काही अंशी सैल झाली असेल आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हुक्का पार्लरवर संपूर्ण बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. या हुक्क्यामुळे भारताच्या भावी नागरिकांचे आयुष्य असे काळवंडत असताना तिकडे पर्यावरणही धोक्यात आले आहे. हुक्क्यामुळे तयार होणारे रासायनिक द्रव्य फेकून दिल्याने नदी व नाल्यांमध्ये प्रदूषणाची मात्रा वाढत आहे. हे वास्तव समोर असतानाही सरकार मात्र महसुलाच्या आकड्यांची जोडतोड करण्यातच व्यस्त आहे. ही सरकारी मानसिकता एका रात्रीत बदलणार नाही. पालकांनीही ती बदलण्याची वाट पाहू नये. त्यांनी उभी केलेली संस्कारांची भिंत सक्षम असेल तर हुक्क्याचा धूर त्यांच्या मुलांपर्यंत पोहचूच शकणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र