शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांचा हेका

By admin | Updated: May 7, 2016 02:35 IST

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे.

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. अलीकडेच राजस्थानमधील जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाला उसाच्या वारेमाप लागवडीची जोड दिली आहे. उसाला पाणी जास्त लागते हे जरी खरे असले तरी, उसामुळे दुष्काळ पडला हे म्हणणे माजी कृषिमंत्री शरद पवारांना खटकलेले दिसते. काही असले तरी उसामुळे महाराष्ट्रात शेतकरी पोटभरून खातोय हे कुणालाही मान्य करावे लागेल. ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली असे चित्र नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची मुबलकता आहे. म्हणून शेतकरी ऊस लावतात. विदर्भ मराठवाड्याची भिस्त कापूस, सोयाबीन आणि तुरीवर आहे. तर खानदेशाची भिस्त कांदा, द्राक्षे आणि केळीवर आहे. या सर्व पिकांपैकी भरवशाचे आणि हमीभाव देणारे ऊस हे एकमेव पीक असल्याने शेतकरी त्याकडे वळला असून, याच पिकाने शेतकऱ्यांच्या घरात सुबत्ता आणली आहे. देशाच्या महसुली उत्पन्नात मोठी भर घातली आहे. आता इथेनॉलच्या माध्यमातून इंधनाची बचत होणार आहे. देशभरातील साडेचार कोटी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे हक्काचे साधन आणि ४० लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देणारे हे पीक आहे. शिवाय पूरक व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या पिकाशी निगडित आहे. याकडे कोणीच पाहिले नाही. केवळ उसामुळे पाणी जास्त वापरले जाते या एकाच गोष्टीकडे लक्ष दिले आहे. कमी पाणी लागणारी इतर पिके शेतकऱ्यांनी घेऊन पाहिली पण अशा पिकांच्या काढणीसाठी मजूर जास्त लागतात आणि ते मिळतही नाहीत. शिवाय भावाची हमी नाही. उसाशिवाय शेतकऱ्यांनी कांदा, केळी, द्राक्षे अशी इतरही पिके लावून पाहिली. पण या पिकांचे बाजारभाव पाहिले तर मनाने कठोर असलेलाच शेतकरी जिवंत राहू शकतो इतकी भयाण अवस्था आहे. दोनच दिवसांपूर्वी जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली. पाणी असूनही पिकाला भाव नाही म्हणून आत्महत्त्या करायची वेळ येत असेल तर मग हमीभाव देणारे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे आणि लाखोंना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उसाच्या पिकाकडे वक्रदृष्टी टाकण्याला काय अर्थ आहे.