शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
3
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
4
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
5
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
6
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
7
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
8
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
9
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
10
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
12
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
13
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
14
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
15
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
16
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
17
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
18
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
19
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
20
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

ऊस उत्पादकांचा हेका

By admin | Updated: May 7, 2016 02:35 IST

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे.

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. अलीकडेच राजस्थानमधील जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाला उसाच्या वारेमाप लागवडीची जोड दिली आहे. उसाला पाणी जास्त लागते हे जरी खरे असले तरी, उसामुळे दुष्काळ पडला हे म्हणणे माजी कृषिमंत्री शरद पवारांना खटकलेले दिसते. काही असले तरी उसामुळे महाराष्ट्रात शेतकरी पोटभरून खातोय हे कुणालाही मान्य करावे लागेल. ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली असे चित्र नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची मुबलकता आहे. म्हणून शेतकरी ऊस लावतात. विदर्भ मराठवाड्याची भिस्त कापूस, सोयाबीन आणि तुरीवर आहे. तर खानदेशाची भिस्त कांदा, द्राक्षे आणि केळीवर आहे. या सर्व पिकांपैकी भरवशाचे आणि हमीभाव देणारे ऊस हे एकमेव पीक असल्याने शेतकरी त्याकडे वळला असून, याच पिकाने शेतकऱ्यांच्या घरात सुबत्ता आणली आहे. देशाच्या महसुली उत्पन्नात मोठी भर घातली आहे. आता इथेनॉलच्या माध्यमातून इंधनाची बचत होणार आहे. देशभरातील साडेचार कोटी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे हक्काचे साधन आणि ४० लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देणारे हे पीक आहे. शिवाय पूरक व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या पिकाशी निगडित आहे. याकडे कोणीच पाहिले नाही. केवळ उसामुळे पाणी जास्त वापरले जाते या एकाच गोष्टीकडे लक्ष दिले आहे. कमी पाणी लागणारी इतर पिके शेतकऱ्यांनी घेऊन पाहिली पण अशा पिकांच्या काढणीसाठी मजूर जास्त लागतात आणि ते मिळतही नाहीत. शिवाय भावाची हमी नाही. उसाशिवाय शेतकऱ्यांनी कांदा, केळी, द्राक्षे अशी इतरही पिके लावून पाहिली. पण या पिकांचे बाजारभाव पाहिले तर मनाने कठोर असलेलाच शेतकरी जिवंत राहू शकतो इतकी भयाण अवस्था आहे. दोनच दिवसांपूर्वी जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली. पाणी असूनही पिकाला भाव नाही म्हणून आत्महत्त्या करायची वेळ येत असेल तर मग हमीभाव देणारे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे आणि लाखोंना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उसाच्या पिकाकडे वक्रदृष्टी टाकण्याला काय अर्थ आहे.