शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

ऊस उत्पादकांचा हेका

By admin | Updated: May 7, 2016 02:35 IST

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे.

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. अलीकडेच राजस्थानमधील जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाला उसाच्या वारेमाप लागवडीची जोड दिली आहे. उसाला पाणी जास्त लागते हे जरी खरे असले तरी, उसामुळे दुष्काळ पडला हे म्हणणे माजी कृषिमंत्री शरद पवारांना खटकलेले दिसते. काही असले तरी उसामुळे महाराष्ट्रात शेतकरी पोटभरून खातोय हे कुणालाही मान्य करावे लागेल. ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली असे चित्र नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची मुबलकता आहे. म्हणून शेतकरी ऊस लावतात. विदर्भ मराठवाड्याची भिस्त कापूस, सोयाबीन आणि तुरीवर आहे. तर खानदेशाची भिस्त कांदा, द्राक्षे आणि केळीवर आहे. या सर्व पिकांपैकी भरवशाचे आणि हमीभाव देणारे ऊस हे एकमेव पीक असल्याने शेतकरी त्याकडे वळला असून, याच पिकाने शेतकऱ्यांच्या घरात सुबत्ता आणली आहे. देशाच्या महसुली उत्पन्नात मोठी भर घातली आहे. आता इथेनॉलच्या माध्यमातून इंधनाची बचत होणार आहे. देशभरातील साडेचार कोटी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे हक्काचे साधन आणि ४० लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देणारे हे पीक आहे. शिवाय पूरक व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या पिकाशी निगडित आहे. याकडे कोणीच पाहिले नाही. केवळ उसामुळे पाणी जास्त वापरले जाते या एकाच गोष्टीकडे लक्ष दिले आहे. कमी पाणी लागणारी इतर पिके शेतकऱ्यांनी घेऊन पाहिली पण अशा पिकांच्या काढणीसाठी मजूर जास्त लागतात आणि ते मिळतही नाहीत. शिवाय भावाची हमी नाही. उसाशिवाय शेतकऱ्यांनी कांदा, केळी, द्राक्षे अशी इतरही पिके लावून पाहिली. पण या पिकांचे बाजारभाव पाहिले तर मनाने कठोर असलेलाच शेतकरी जिवंत राहू शकतो इतकी भयाण अवस्था आहे. दोनच दिवसांपूर्वी जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली. पाणी असूनही पिकाला भाव नाही म्हणून आत्महत्त्या करायची वेळ येत असेल तर मग हमीभाव देणारे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे आणि लाखोंना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उसाच्या पिकाकडे वक्रदृष्टी टाकण्याला काय अर्थ आहे.