शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘उमवि’चा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:12 IST

जळगावच्या उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची राज्य सरकारने घोषणा केल्याने खान्देशच्या विद्यापीठाचा सन्मान झाला आहे, असेच म्हणावे लागेल. विद्यापीठाच्या स्थापनेपासून असलेल्या या मागणीची दखल घेतली गेली याचा खान्देशवासीयांना निश्चित आनंद आहे. राज्यातील बहुसंख्य विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली गेली असली तरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ त्याला अपवाद होते. ...

जळगावच्या उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची राज्य सरकारने घोषणा केल्याने खान्देशच्या विद्यापीठाचा सन्मान झाला आहे, असेच म्हणावे लागेल. विद्यापीठाच्या स्थापनेपासून असलेल्या या मागणीची दखल घेतली गेली याचा खान्देशवासीयांना निश्चित आनंद आहे. राज्यातील बहुसंख्य विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली गेली असली तरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ त्याला अपवाद होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मोर्चे, आंदोलने, निवेदने, ठराव या माध्यमातून मागणी लावून धरली, परंतु शासनदरबारी खान्देशचा आवाज नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहत होता. अगदी दोन महिन्यांपूर्वी भोरगाव लेवा पंचायतच्या महाअधिवेशनातदेखील नामकरणाचा ठराव प्रामुख्याने करण्यात आला होता. ‘देर आए, दुरुस्त आए’ असे म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. १९९० मध्ये पुणे विद्यापीठापासून विभाजित होत उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ स्थापन झाले. नावात ‘उत्तर महाराष्टÑ’ असले तरी महसूल विभागातील नगर आणि नाशिक जिल्ह्याचा या विद्यापीठात समावेश नाही. केवळ नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचे व भौगोलिकदृष्ट्या खान्देशचे हे विद्यापीठ आहे. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव या विद्यापीठाला देणे त्यामुळेच संयुक्तिक आहे. १८८० चा जन्म असलेल्या बहिणाबाई स्वत: निरक्षर होत्या. जळगावजवळील असोदा हे त्यांचे जन्मगाव. १३ व्या वर्षी लग्न होऊन त्या सासरी म्हणजे जळगावला आल्या. शेती हाच त्यांचा उपजीविकेचा व्यवसाय. शेतकरी कुटुंबातील बहिणाबार्इंना प्रतिभाशक्तीचे वरदान आणि डोळस जीवनदृष्टी लाभली होती. अनुभूती, आविष्कार आणि काव्यमय शब्दांनी त्यांनी दैनंदिन जीवनातील घडामोडींवर भाष्य केले. अतिशय गोडवा असलेल्या लेवा गणबोलीत त्यांनी कविता रचल्या. बहिणाबार्इंच्या मृत्यूनंतर त्यांच्या ५० कविता प्रकाशित झाल्या. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्या लिहून घेतल्या होत्या. आचार्य अत्रे यांना हे हस्तलिखित दाखविल्यावर त्यांनी या कविता प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. अरे संसार संसार, मन वढाय वढाय, अरे खोप्यामधी खोपा यासारख्या जीवनाचे सार साध्या, सोप्या भाषेत सांगणाऱ्या बहिणाबाई त्यांच्या काव्यातून अजरामर आहेत. स्वत: अशिक्षित असूनही असोद्याच्या शाळेच्या वर्णनापासून तर माणसाला कोºया कागदाची उपमा देणाºया बहिणाबाई प्रकांडपंडित म्हणायला हव्या. त्यांच्या काव्यावर अनेकांनी एम.फिल., पीएच.डी. केली असून अजूनही अभ्यास आणि मीमांसा सुरू आहे. सरस्वतीच्या दरबाराला त्यांचे नाव देऊन त्या दरबाराचा गौरव झाला आहे. सरस्वतीचे देणे त्यांनी एका कवितेत वर्णन केले आहे,माझी माय सरसोती, माले शिकवते बोलीलेक बहिनाच्या मनी, किती गुपीतं पेरली

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ