शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टी आवडे सर्वांना; आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बदलण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 05:30 IST

आंतरराष्ट्रीय स्तरांवर पाच दिवसांचा आठवडा, आठवड्याला ३५ ते ४0 तास काम, नियमित सुट्ट्या हे सूत्र स्वीकारले गेले आहे. आपल्याकडे दुसऱयाच्या सुट्ट्या आणि पगार हा सतत सार्वत्रिक चर्चेचा, प्रसंगी टवाळकीचा विषय राहिलेला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करून सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पाच दिवसांचा आठवडा लागू केला तेव्हापासून आपल्याकडे ही मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली होती. विवाद्य किंवा वर्षानुवर्षे प्रलंबित गोष्टींवर तत्काळ निर्णय घेण्याच्या नवीन प्रथेनुसार हा जलद निर्णय झाला. त्याबद्दल ठाकरे सरकारचेही अभिनंदन. १८ लाख अधिकारी-कर्मचारी यांची दैनंदिन कामाची वेळ त्यामुळे वाढणार आहे. रविवारला जोडून आणखी एक दिवस हक्काची सुट्टी त्यांना मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच दिवसांचा आठवडा, आठवड्याला ३५ ते ४० तास काम, नियमित सुट्ट्या हे सूत्र स्वीकारले गेले आहे. मंत्रालयासह राज्य सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि ते स्वाभाविक आहे. आपल्याकडे सुट्टी हा नेहमीच आनंदाचा विषय असतो. दुसºया महायुद्धानंतर जपानी लोकांनी तो देश पुन्हा उभा करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. ते अखंड काम करीत राहिले. जपानी लोकांच्या कष्टातून तो देश पुन्हा उभा राहिला. आपल्या देशासाठी काम करायचे आहे या भावनेने लोक काम करीत राहिले. ते कधीही सुट्टी घेत नव्हते. शेवटी सरकारला आदेश काढून सक्तीची सुट्टी द्यावी लागली. अर्थात, हे टोकाचे उदाहरण असले तरी आपल्याकडे सरकारी नोकरीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाºयांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर झाला की त्यांच्या कामाचे मूल्यमापन सुरू झाले. सुट्टी हा आवडीचा भाग असला तरी कामाच्या वेळेत समर्पित वृत्तीने काम करण्याची वृत्ती सरकारी कर्मचाºयांनी ठेवणे आता आवश्यक आहे. अर्थात, सर्वच कर्मचारी कामचुकार नाहीत, पण काहींच्या वर्तनाचा फटका इतर सर्वांना बसतो. त्यालाही आळा घालण्याची गरज आहे.

सध्या केंद्र सरकारसह सात राज्य सरकारांनी पाच दिवसांचे आठवडे केले आहेत. एमएमआरडीए आणि एमआयडीसीमध्येही हाच नियम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कामावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसत नाही. सरकारी बाबू आधीच कामचुकार त्यात पाच दिवसच का, असा सूर उमटणेही स्वाभाविक आहे. परंतु केवळ एकच बाजू न तपासता याच्या अन्य कारणांकडेही सकारात्मकपणे पाहणे गरजेचे आहे. सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो कर्मचारी अधिक सक्षम राहू शकतो. शिवाय दररोज ४५ मिनिटे काम वाढल्याने आठवड्याच्या एकूण कामात तसा फारसा फरक पडणार नाही. आता प्रश्न आहे तो जबाबदारीचा. कर्मचारी संघटनांची ही महत्त्वाची मागणी मान्य झाल्याने सरकारी कर्मचाºयांना कामात कसूर ठेवता येणार नाही. त्यांची जबाबदारीही तितकीच वाढणार आहे. सुट्टीची ही सवलत इतर ़अनेक महत्त्वाच्या खात्यांना लागू नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

मंत्रालय असो की, तालुक्यातील सरकारी कचेरी तेथील कर्मचाºयांची उपलब्धता हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. वेळेवर कामावर येणे, वेळेत काम करणे ही शिस्त पाळण्यासाठी आपल्याकडे नियम करावे लागतात. वेळ पाळणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे काही प्रगत देशांनी इतके अवलंबले आहे, की ते तेथील नागरिकांच्या वृत्तीतच ते आलेले आहे. आपण त्यापासून कोसो मैल दूर आहोत. त्या मार्गावर जाण्याची सुरुवात तरी यानिमित्ताने होत असेल तर तो सकारात्मक संकेत मानायला हवा. म्हणूनच कामाचे तास कमी तर पगार कमी, ते कामच कुठे करतात, अशा केवळ टोमणेबाजीपेक्षा कार्यक्षमता वाढवण्यास काय करायला हवे याची सनद तयार केली तर अधिक योग्य होईल. वर्षानुवर्षे प्रलंबित गोष्टीचा निकाल लागला तर या सकारात्मकतेचे प्रतिबिंब कामकाजातही उमटलेले दिसू लागेल, अशी आशा आहे. चांगला निर्णय घेऊन ठाकरे सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता प्रशासनाने वाढीव कार्यक्षमता दाखवून सरकार दरबारी हमखास होणार काम, असा कृतिशील बदल दाखवून द्यावा, म्हणजे महाराष्ट्रातील आम जनता सगळ्यांनाच दुवा देईल. 

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र