शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

आॅनलाइन निकाल प्रक्रियेच्या नावे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा करण्यास कारणीभूत ठरलेल्या मुंबई विद्यापीठाची ऐतिहासिक नामुश्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 05:09 IST

आॅनलाइन निकाल प्रक्रियेच्या नावे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा करण्यास कारणीभूत ठरलेले आाणि त्याचे खापर परीक्षा विभागावर फोडून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची कुलपती विद्यासागर राव यांनी केलेली बडतर्फी अपेक्षितच होती.

आॅनलाइन निकाल प्रक्रियेच्या नावे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा करण्यास कारणीभूत ठरलेले आाणि त्याचे खापर परीक्षा विभागावर फोडून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची कुलपती विद्यासागर राव यांनी केलेली बडतर्फी अपेक्षितच होती. देशमुख यांनी ती आपल्या कर्माने ओढवून घेतली. १६० वर्षांची परंपरा सांगणाºया मुंबई विद्यापीठात कुलगुरूंच्या बडतर्फीचा नवा नामुश्कीचा इतिहास घडला. उत्तरपत्रिकांच्या आॅनलाइन तपासणीची योजना, त्यामागील हेतू योग्यच होता. पण प्रशासकीय निर्णयात केवळ हेतू चांगला असून भागत नाही, तर निर्णयाची अंमलबजावणी व परिणाम महत्त्वाचे ठरतात. हाताशी असलेला वेळ, लाखो उत्तरपत्रिका, प्रशिक्षण ही सारी समीकरणे प्रतिकूल असतानाही कुलगुरूंनी अट्टाहास केला. वास्तविक पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर काही परीक्षांसाठी आॅनलाइन तपासणीची अंमलबजावणी करून नंतरच ती सर्व परीक्षांसाठी वापरायला हवी होती. पण चमत्काराचा सोस नडला. निकाल रखडल्यानंतर कुलपती विद्यासागर राव यांनी निकालासाठी मुदत घालून दिली. तो इशारा तरी देशमुख यांनी समजून घ्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. त्यामुळे अद्यापही पुनर्मूल्यांकन, गहाळ उत्तरपत्रिका-पुरवण्यांचा घोळ विद्यापीठाला निस्तरायचा आहे. अर्थात देशमुख यांच्या बडतर्फीने हे सारे प्रश्न सुटलेले नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून निघणाऱ? हाही प्रश्न आहे. भ्रष्टाचार, गुणांची फेरफार, शैक्षणिक क्षमतांचा घोळ यातून मुंबई विद्यापीठाच्या याआधीच्या वेगवेगळ्या कुलगुरूंची कारकिर्द वादग्रस्त ठरली. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता यादीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक पहिल्या शंभरात नसल्याचे उघड झाले, तेव्हाच त्याच्या गुणवत्तेची पातळी काय लायकीची आहे, याची लक्तरे राष्ट्रीय स्तरावर पोहोचली! विद्यापीठाचा दर्जा सुधारण्याऐवजी कुलगुरूपदावर नियुक्तीनंतर राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणे, पायलट ट्रेनिंगसाठी विमान खरेदीचा प्रस्ताव, पुढे स्वस्तातील हेलिकॉप्टर राइड, परदेशात कॅम्पस उभारणे या कारणांमुळे संजय देशमुख प्रसिद्धीच्या झोतात येत राहिले आणि टीकेचे धनीही ठरले. आॅनलाइन मूल्यांकन आणि निकालांचा गोंधळ यामुळे राज्यपालांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर देशमुखांनी स्वत:हून पद सोडले असते तर त्यांची आणि पदाची शोभा राहिली असती, पण त्यांना विवेकाने निर्णय घेता आला नाही. परिणामी त्यांची हकालपट्टी झाली आणि ‘गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले, तोंड काळे जाले जगामाजी’ अशी संत तुकारामांनी वर्णन केलेली नामुश्की त्यांच्यासोबत विद्यापीठावरही ओढवली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ