शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

न्यायसंस्थेतही हिंदुत्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 4:57 AM

​​​​​​​न्यायाधीशांनी आपली व्यक्तिगत मते बाजूला ठेवून न्यायासनावर बसावे आणि न्यायदान करताना एखाद्या साधू-फकिराप्रमाणे निरिच्छ वृत्तीने विवेचन करावे, हे सर्वमान्य तत्त्व आहे. परंतु अनेकांना याचे भान राहत नाही.

मेघालय उच्च न्यायालयाचे एकमेव न्यायाधीश न्या. सुदीप रंजन सेन यांनी एखाद्या हिंदुत्ववादी व्यासपीठावरून केलेले भाषण असावे असे निकालपत्र दोन दिवसांपूर्वी दिले. या निकालपत्रातील काही मतप्रदर्शने अशी : ‘धर्माच्या आधारे देशाची फाळणी होऊन पाकिस्तान हे स्वतंत्र इस्लामी राष्ट्र निर्माण झाल्यावर खरे तर भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवे होते. देशाची फाळणी अन्याय्य पद्धतीने झाली. पण आपल्या (त्या वेळच्या) राजकीय नेत्यांना स्वातंत्र्याची एवढी घाई झाली होती की त्यांनी भावी पिढ्या आणि देशाच्या हिताला वाऱ्यावर सोडून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून आता असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत’. ‘पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानसह जगात कुठेही राहत असलेल्या मुस्लीम वगळून इतरांना भारतात परत येण्याचे कायमचे मुक्तद्वार द्यावे.‘ ‘सरकारने सर्व नागरिकांसाठी समान कायदे करावेत. अशा कायद्यांचे जे पालन करणार नाहीत त्यांना देशाचे नागरिक मानता येणार नाही.’ ‘भारतात दुसरे इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. तसे झाल्यास ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरेल.’ ‘पंतप्रधान मोदी यांचे सध्याचे सरकार या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून खंबीर पावले उचलेल याविषयी खात्री वाटते.’ याहून धक्कादायक म्हणजे एका नागरिकास अधिवास दाखला मिळाला नाही म्हणून त्याने केलेल्या याचिकेच्या निकालात न्या. सेन यांनी ही वायफळ बडबड केली आहे. केवळ राजकीय रंगामुळेच नव्हे तर मूळ विषयाला सोडून लिहिलेले म्हणूनही हे निकालपत्र सर्वस्वी चुकीचे आहे.न्यायाधीशांनी आपली व्यक्तिगत मते बाजूला ठेवून न्यायासनावर बसावे आणि न्यायदान करताना एखाद्या साधू-फकिराप्रमाणे निरिच्छ वृत्तीने विवेचन करावे, हे सर्वमान्य तत्त्व आहे. परंतु अनेकांना याचे भान राहत नाही. जनता सरकार पडल्यावर इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या तेव्हा न्या. पी.एन. भगवती यांनी अधिकृतपणे पत्र लिहून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. आता मोदी पंतप्रधान झाल्यावर ए. एल. दत्तू आणि एम.आर. शहा या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी त्यांची जाहीरपणे स्तुती केली. यातील न्या. भगवती व न्या. दत्तू नंतर सरन्यायाधीश झाले.न्या. एम.सी. छागला हे न्यायसंस्थेतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व. पण न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून कुठे काय बोलू नये याचे त्यांनाही भान राहिले नाही. लोकमान्य टिळकांवरील देशद्रोहाचे दोन खटले मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती दालनात चालले होते. त्यापैकी एका खटल्यात शिक्षा सुनावल्यावर टिळकांनी ‘या न्यायालयाहूनही वरचे न्यायालय आहे व तेथे मला नक्की न्याय मिळेल’, असे न्यायाधीशांना बाणेदारपणे सांगितले होते. टिळकांचे ते शब्द कोरलेली संगमरवरी पट्टिका त्याच न्यायदालनाच्या बाहेर बसविली गेली. त्याच्या अनावरणाच्या वेळी मुख्य न्यायाधीश म्हणून केलेल्या भाषणात न्या. छागला यांनी टिळकांना दिलेल्या शिक्षा हा या न्यायालयाला कलंक आहे व तो आज या पट्टिकेच्या स्वरूपात पुसला गेला आहे, असे सांगितले. न्या. छागला यांचे ते विधान चूक नव्हते. पण ज्या संस्थेवर आपण टीका करत आहोत तिचे आपण प्रमुख आहोत व पुढच्या पिढ्यांमधील न्यायाधीशांनी पूर्वसूरींवर अशी टीका केली तर एक संस्था म्हणून या उच्च न्यायालयास काही विश्वासार्हताच राहणार नाही, याचे भान न्या. छागला यांना देशप्रेमाच्या भरात राहिले नाही.मध्यंतरी राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने निवृत्तीआधीच्या शेवटच्या निकालपत्रात गोमूत्र आणि गोमय यांच्या महात्म्याचे पांडित्य पाजळले होते. न्यायाधीशांच्या नेमणुकांचे अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाने ‘कॉलेजियम’च्या रूपाने हट्टाने आपल्याकडे ओरबडून घेतले. न्या. सेन यांची निवडही याच ‘कॉलेजियम’ने केली यावरून या पद्धतीचा भंपकपणा स्पष्ट होतो. न्या. सेन यांची मूळ नेमणूक फेब्रुवारी २०१२ मध्ये आसाम उच्च न्यायालयावर झाली होती. त्या वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ सरकार होते. तरीही हा एवढा गडद भगवा न्यायाधीश कसा नेमला गेला, हेही कोडेच आहे. जिच्याकडे शेवटचा आसरा म्हणून विश्वासाने पाहावे त्या न्यायसंस्थेचे पायही मातीचे असावेत ही लोकशाहीची आणि तिचा केंद्रबिदू असलेल्या सामान्य माणसाची घोर विटंबना आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय