शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, पण गुजरातचं काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:39 IST

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम १२ आॅक्टोबर रोजी जाहीर करताना निवडणूक आयोगाने गुजरातबाबत मात्र तशी घोषणा न केल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आयोगावर पक्षपाताची टीका सुरू केली होती.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम १२ आॅक्टोबर रोजी जाहीर करताना निवडणूक आयोगाने गुजरातबाबत मात्र तशी घोषणा न केल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आयोगावर पक्षपाताची टीका सुरू केली होती. सहा महिन्यांच्या अंतराने मुदत संपणा-या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची प्रथा आयोगाने मोडल्याबद्दल आयोगावर टीकाच नव्हे, आरोपही झाले. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये अनेक विकास कामांची उद्घाटने केली, गुजरात सरकारने अनेक घोषणा केल्या, काही कर्मचा-यांचे पगार वाढवून दिले. वृत्तवाहिनीच्या सर्वेतून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा निष्कर्षही आला. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला दिलासा व रोजगारनिर्मिती यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोठे निर्णयही जाहीर केले. म्हणजे आपले गुजरातबाबतचे गणित भाजपाने पक्के करून घेतले. त्यानंतरच निवडणूक आयोगाने बुधवारी गुजरातमधील निवडणुकांच्या तारखा व कार्यक्रम जाहीर केल्यामुळे विरोधकांनी केलेल्या टीका आणि आरोपांना एकप्रकारे बळ मिळण्यास मदतच झाली. गुजरातमध्ये विधानसभेसाठीचे मतदान ९ आणि १४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी ९ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशातील मतदान संपलेले असेल आणि दोन्ही राज्यांत मतमोजणी मात्र १८ डिसेंबर रोजी होईल. म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मतदारांना निकालासाठी सव्वा महिन्याहून अधिक काळ, तर गुजरातमधील मतदारांना केवळ चारच दिवस थांबावे लागेल. आचारसंहिताही हिमाचल प्रदेशात ६३ दिवस तर गुजरातमध्ये जेमतेम दीड महिना असेल. या साºया प्रकारांमुळेच भाजपाला आयोगाकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झुकते माप मिळत असल्याच्या आरोपालाही बळकटी मिळाली आहे. निष्पक्ष असलेल्या निवडणूक आयोगाला हे आरोप व टीका टाळणे शक्य होते. पण आयोगाने खुलासा करूनही वादावर पडदा पडू शकला नाही. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य. मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधान होईपर्यंत सलग १२ वर्षे तिथे मुख्यमंत्री म्हणून राज्य केले आहे. तिथे १९९५ पासून भाजपा सतत बहुमत मिळवत आली आहे. यंदा तर नरेंद्र मोदींमुळे तेथील निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आपण केंद्रात गेल्यावरही गुजरातवर आपला व भाजपाचाच वरचष्मा आहे, हे दाखविण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. मात्र मोदी कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. त्यामुळेच एका महिन्यात त्यांनी गुजरातचे तीन दौरे केले. त्याच्या निम्मा वेळही त्यांनी हिमाचलला दिला नाही. मात्र मोदींच्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती येताना, काही राज्यांतील ताकद वाढल्याचे त्यांना दाखवायचे आहे. हिमाचलमध्ये विजयाची खात्री नाही. त्यामुळे भिस्त आहे गुजरातवर. नोटाबंदीमुळे अस्वस्थता, व्यापाºयांचा जीएसटीला विरोध, अर्थव्यवस्थेतील मंदी, पटेल समाजाची नाराजी या साºयांचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण शंकरसिंह वाघेला आणि काही आमदारांना फोडून भाजपाने काँग्रेसला धक्का दिला आहे. ती मंडळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मतेही फोडतील, अशीही व्यूहरचना भाजपाने केली आहे. भाजपाविषयी नाराजी असली तरी काँग्रेसबद्दल सहानुभूती आहे, असे मात्र नाही. म्हणूनच हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवाणी या विविध जातींच्या, ओबीसींच्या नेत्यांना काँग्रेसने हाताशी धरले आहे. मात्र त्यांचा जनाधार मर्यादित आहे. शिवाय प्रतिस्पर्धी भाजपा सर्वार्थाने खूपच प्रबळ आहे. त्यामुळे दीड महिना दोन्ही बाजूंनी तोफा धडाडत राहणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक