शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

लहरी पाऊस, सरकारच्या धोरणामुळे विमा कंपन्यांची चांदी

By सुधीर महाजन | Updated: July 20, 2019 16:29 IST

पब्लिक जमा करण्यासाठी या निवडणुकीत कोणती पुंगी वाजवावी या संभ्रमात अनेक पक्ष आहेत. भगव्या, हिरव्या, तिरंगी, निळ्या, चट्टेरी-पट्टेरी पुंग्या वाजवून झाल्या.

- सुधीर महाजन

आपल्या राजकीय पक्षांचं कसं असतं, तर गारुड्यासारखं त्याच्याकडे पोतडी असते. साप-नाग असतो आणि एक पुंगी असते. तो पोतडीतून नाग काढतो, मैदानात सोडतो आणि पुंगी वाजवतो. पुंगीचा आवाज ऐकला की, लोक जमा होतात. वातावरण निर्मिती झाली की, पुंगीची लय बदलते आणि नाग डोलायला सुरुवात होते. आताही निवडणुकीची मांडामांड सुरू झाली आहे. पब्लिक जमा करण्यासाठी या निवडणुकीत कोणती पुंगी वाजवावी या संभ्रमात अनेक पक्ष आहेत. भगव्या, हिरव्या, तिरंगी, निळ्या, चट्टेरी-पट्टेरी पुंग्या वाजवून झाल्या. आता या पुंग्यांवर पब्लिक डोलणार नाही, याची खात्री असल्याने शिवसेनेने शिळ्या कढीला ऊत आणत पीक विम्याची पुंगी वाजवायला सुरुवात केली. पीक विमा हा कळीचा मुद्दा केव्हाच होता. आपल्याला विमा कंपन्यांनी गंडवलं हे लक्षात घेऊन राज्यभर बळीराजानं रुमणं हाती घ्यायची तयारी चालवली, तसं सरकार व विमा कंपन्यांचं धाबं दणाणलं; पण यादरम्यान नव्या हंगामाचा पीक विमा काढून घेण्याची वेळ आली. सत्ताधारी भाजपला तर सारवासारवीपलीकडे काही करता येत नव्हतं; पण शिवसेनेच्या ‘वाघा’ला सत्तेत राहूनही सरकारवर डरकाळ्या फोडण्याची सवय लागल्यानं त्यानं ‘हे चालणार नाही’, अशी ललकारी देत रान उठविण्याचा प्रयत्न करीत ही नवी पुंगी वाजवायचा धडाका लावला; पण खेड्यातला माणूस हिकमती. उडत्या पाखराचे पिसं मोजणारा. या पुंगीवर फारशा माना डोलवल्या नाहीत, कारण विधानसभा निवडणुकीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी हा खेळ चालला, हे लक्षात यायला वेळ लागत नाही.

आपल्या राजकीय पक्षांचं वरातीमागून घोड्यासारखं असतं. गेल्या वर्षी विमा कंपन्या पोते भरून भरून नोटा घेऊन गेल्या अन् नंतर मावळ्यांना जाग आली. वर सरकार त्यांचं, कंपन्या त्यांनीच नेमल्या, तर त्यांनी कंपन्यांच्याच कानाखाली जाळ काढायचा; पण हे सगळीकडे शंख करीत फिरत होते आणि सरकारनंच फळबागांच्या पीक विम्याचे निकष बदलले याचा पत्ताही सत्ताधारी शिवसेनेला नाही. हे नियम शेतकरीशेतीची माती करणारे आहेत, याचा विचार कृषी खाते, सरकार यांनी केला नाही. जेव्हा ओरड सुरू झाली तेव्हा धावपळ उडाली. सरकार व कृषी मंत्रालयाचा उफराटा कारभार तर कसा पूर्वी निकषामध्ये ५ ते १० मि.मी.पासून झाला, तर १६,००० विम्याचे मिळायचे. डाळिंबाच्या बागांचे हे निकष आहेत. आता २० दिवसांच्या कालावधीत २.५ मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला, तरच विम्याच्या रकमेला पात्र ठरणार आहे. अडीच मि.मी. पावसाने अंगावरचे कपडेही ओले होत नाहीत आणि पावसाळ्यात २० दिवसांत यापेक्षा जास्त पाऊस पडतोच आणि पाऊस पडलाच नाही, तर अनुदान मिळणार ५,५०० रुपये, म्हणजे सगळाच व्यवहार शेतकऱ्याच्या दृष्टीने आतबट्ट्याचा. असे निकष सगळ्याच फळपिकांसाठी बनवले. त्याच्या परिणामाची, वास्तवाची सरकारला व सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला कल्पनाही नाही आणि इकडे राज्यभर फळबागाधारक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तीन वर्षांच्या निरीक्षणातून हे निकष तयार केले. विद्यापीठांनी त्याला मान्यता दिली व सरकारने अमलात आणले; पण हे नियम शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत का? याचा विचार झाला नाही. पावसाचे तंत्र बिघडले आहे. तो येतोच कुरकुर करीत. बरसत नाही आणि बरसला तर बदाबदा पाणी ओततो. या त्याच्या लहरीपणात हे नवे निकष सहजपणे वाहून जातात. त्याच्यासारखे लहरी झाले सरकार, प्रशासन हे सगळेच. या लहरीपणाने शेतकरी आणि शेतीची विल्हेवाट लागली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाPoliticsराजकारणFarmerशेतकरीagricultureशेती