शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

आरोग्य आणि तारतम्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:43 IST

उत्तम आरोग्य आणि उत्तम तारतम्य हे सर्वात मोठे आशीर्वाद आहेत! रोचक आणि बोधप्रद वाकप्रचारांसाठी प्रसिद्ध असलेले लॅटिन लेखक पब्लिअस ...

उत्तम आरोग्य आणि उत्तम तारतम्य हे सर्वात मोठे आशीर्वाद आहेत! रोचक आणि बोधप्रद वाकप्रचारांसाठी प्रसिद्ध असलेले लॅटिन लेखक पब्लिअस सायरस यांच्या या वचनाचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे रघुराम राजन आणि पी. चिदम्बरम यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात केलेली ताजी वक्तव्ये ! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद आणि देशाचे अर्थमंत्रिपद भूषविलेल्या या दोन्ही दिग्गजांच्या वक्तव्यांचा सार हा आहे, की देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि ती दुरुस्त करण्यासाठी तारतम्य बाळगून पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

जून-ऑगस्ट या आर्थिक तिमाहीत आर्थिक विकास दरात झालेली २३.९ टक्क्यांची घसरण धोक्याची घंटा वाजविणारी असून, सरकारने आत्ममग्न अवस्थेतून बाहेर पडून तातडीने अर्थपूर्ण उपाययोजना आखण्याची गरज आहे, असा इशारा राजन यांनी त्यांच्या ‘ब्लॉग’मधून दिला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात अधिक सक्रिय सरकारची आवश्यकता आहे; मात्र कोरोना संकटातील प्रारंभीच्या सक्रियतेनंतर सरकार आता जणू काही कोषातच गेले आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. पी. चिदम्बरम यांनीही त्यांच्या ताज्या साप्ताहिक लेखात, अर्थव्यवस्थेची भीषण दशा आकडेवारीसह मांडली आहे. त्यांनी सरकारवर अत्यंत कठोर शब्दात प्रहार केले आहेत. विशेषत: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या ‘देवाची करणी’ (अ‍ॅक्ट आॅफ गॉड) या शब्दप्रयोगाचा तर त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सीतारामण यांनी काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेतील घसरण ही ‘देवाची करणी’ असल्याचे विधान करून, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. तो धागा पकडून, देवावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करू नका, असा सज्जड इशाराच चिदम्बरम यांनी सरकारला दिला आहे. अर्थव्यवस्थेची सर्वदूर घसरण सुरू असताना, केवळ कृषी, वने आणि मत्स्योत्पादन या क्षेत्रानेच ३.४ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. रघुराम राजन आणि पी. चिदम्बरम हे दोघेही नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत. दोघांनीही भारतीयअर्थव्यवस्था केवळ जवळून बघितलेलीच नाही, तर तिला दिशा देण्याचेही काम केलेले आहे. त्यामुळे त्यांची विधाने काही ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्याला’ या प्रकारात मोडणारी नाहीत. त्यामागे सखोल अभ्यास, प्रदीर्घ अनुभव आणि वर्षानुवर्षाचे चिंतन आहे.

चिदम्बरम हे विद्यमान सरकारचे राजकीय विरोधक असले तरी राजन यांची संपूर्ण कारकीर्द तर उच्च शिक्षण आणि प्रशासनातच घडली आहे. त्यामुळे चिदम्बरम यांनी केलेल्या टीकेमागे राजकीय आकसबुद्धी असल्याचे एकदाचे मान्य करता येईल; पण राजन यांच्या टीकेसंदर्भात तसा आरोप कुणीही करू शकत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत हलाखीची असल्याचे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञ असण्याची अजिबात गरज नाही. चटके बसू लागले की आंधळाही आग लागल्याचे सांगू शकतो आणि चिदम्बरम यांनी म्हटल्याप्रमाणे आता सर्वसामान्य नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे आरोग्य चांगलेच ढासळले आहे, हे सरकारने आता मान्य केलेच पाहिजे. एखाद्यावर सूड उगवायचा असल्यास त्याच्या आजारपणासारखी अनुकूल स्थिती कोणतीच नसते. सध्या चीन सीमेवर त्याचाच प्रत्यय आणून देत आहे. पाकिस्तानही तापलेल्या तव्यावर पोळी शेकून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. सीमांवरील तणाव एवढा चरणसीमेला पोहोचला आहे, की युद्धाला कधीही तोंड फुटू शकते !

दुर्दैवाने तसे घडल्यास, आधीच कमजोर झालेल्या अर्थव्यवस्थेला तो भार पेलवेल का? सरकारमधील धुरिणांनी त्यावर विचार करणे गरजेचे आहे. कोरोना संकटामुळे जर्जर झालेली अर्थव्यवस्था आणि त्यातच सीमांवर निर्माण झालेले युद्धाचे ढग ही स्थिती राष्ट्रीय आपातकालासारखीच आहे. अशा संकटकाळी पुढारलेल्या देशांनीही राष्ट्रीय सरकारचे प्रयोग केले आहेत. आपण राष्ट्रीय सरकार जरी नव्हे, तरी देशात उपलब्ध तज्ज्ञ मनुष्यबळाच्या सल्ल्याचा, देशाच्या भल्यासाठी उपयोग करून घेण्यास हरकत काय?

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत हलाखीची असल्याचे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञ असण्याची अजिबात गरज नाही. चटके बसू लागले की आंधळाही आग लागल्याचे सांगू शकतो !

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत