शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता आपल्या बापाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 11:05 IST

रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालण्याचा काही हक्क असतो, हे आता आपण विसरूनच गेलो आहोत. मुंबईच्या विशेषत: रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या रस्त्याने चालणे केवळ मुश्किल असते.

- विनायक पात्रुडकर

रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालण्याचा काही हक्क असतो, हे आता आपण विसरूनच गेलो आहोत. मुंबईच्या विशेषत: रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या रस्त्याने चालणे केवळ मुश्किल असते.  हा रस्ता जणू फेरीवाले डोळ्यापुढे ठेवून बांधला आहे की काय अशी शंका येते. वर त्यांची दादागिरी प्रचंड त्यामुळे पोटासाठी बाहर पडणारा पादचारी फेरीवाल्याच्या संसाराला सहाय्य होईल तेवढे करीत असतो. परिणामी फेरीवाल्याचे बस्तान बळकट होत गेले. मुंबईत अनेक उपाय झाले, पण फेरीवाले पुरून उरले. त्यामुळे डोमासाईल (अधिवास) प्रमाणपत्राची अट घातली़ त्यामध्ये २३ हजार अर्जदारांपैकी ५ हजार अर्ज वैध ठरले. भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या हेतूने अधिनिवास प्रमाणपत्राची अट महापालिकेने फेरीवाला धोरण राबवताना घातली होती. आज त्याचे फलित झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र फेरीवाला म्हणून जे पात्र ठरले आहेत, त्यांना फेरीवाला परवाना अद्याप देण्यात आलेला नाही. अधिनिवास प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अजून काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरच फेरीवाला परवाना वाटप होणार आहे. पालिका अधिकाऱ्यांना कोट्यवधी रूपयांची लाच अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळते. त्यामुळेच हे धोरण राबवण्यात विलंब केला जात आहे, असा आरोप पात्र अर्जदारांनी केला आहे़ या आरोपामुळे पालिकेच्या धोरणावरच संशय निर्माण झाला आहे़ एकीकडे भूमिपुत्रांचे हित बघायचे आणि दुसरीकडे अनधिकृत फेरीवाल्यांना बळ द्यायचे, अशा भूमिकेत सध्या पालिका असल्याचे चित्र आहे. पालिकेने धोरण पारदर्शक ठेवताना त्याची अंमलबजावणी देखील पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा या धोरणातून कोणाचेही हित साधता येणार नाही. मुंबईतून अनधिकृत फेरीवाले हद्दपार व्हावेत व भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही सर्वांचीच इच्छा आहे. त्याला विलंब करण्यात कोणाचाही स्वार्थ नसावा़ कारण हे धोरण निश्चित होण्यासाठी एक दशकाचा काळ गेला आहे.

या धोरणांतर्गत पदपथही फेरीवालेमुक्त होणार आहेत. पालिकेने हे धोरण आखताना अधिनिवासाची अट घालणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र आपल्याकडे कायदा झाला, की त्याच्या पळवाटा शोधायला वेळ लागत नाही. अगदी टॅक्सी, रिक्षाचा परवाना काढून दुसऱ्यालाच टॅक्सी, रिक्षा चालवायला देण्याचा प्रकार मुंबईत सर्रास चालतो. एवढेच काय तर फार्मसीचे प्रमाणपत्र दुसऱ्याकडून घेऊन मुंबईत मेडिकल स्टोअर सुरू करणारे परप्रांतीय आज शेकडोंच्या संख्येने असतील़ सुशिक्षिताला हा गैरप्रकार जमू शकतो, तर अशिक्षित फेरीवाल्यांना असे जमले तर गैर नाही. त्यामुळे फेरीवाल्याचा परवाना घेऊन दुसऱ्यालाच ठेला मांडायला देणारे तयार होतील याची शक्यता नाकारता येत नाही. फेरीवाल्यांकडून अगदी दहा रुपयांचा दिवसाचा हप्ता घेणारेही मुंबईत आहेत. त्यांना राजकीय व पोलिसांचे असणारे छुपे पाठबळ न बोलून सर्वांनाच ज्ञात असावे़ अशा परिस्थितीत विना डोमिसाईल फेरीवाले आपला व्यवसाय सुरू ठेवतीलच, असे म्हणणे तूर्त तरी वावगे ठरणार नाही. त्याला अनुसरूनच अधिकृत फेरीवाल्यांनी हे धोरण तातडीने राबवण्याची मागणी पात्र अर्जदारांनी केली आहे. धोरण तातडीने राबवल्यास भ्रष्टाचार कमी होईल. मुंबईतील पदपथ, रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील. तेव्हा पालिकेने विना विलंब हे धोरण पारदर्शकपणे राबवावे अर्थात यातून हे फेरीवाले पळवाट काढतील ही गोष्ट वेगळी, पण काहीतरी नियंत्रण असायलाच हवे. अधिवास हा एक त्यातला प्रयत्न. 

टॅग्स :hawkersफेरीवालेMumbaiमुंबई