शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

आनंद पसरूदे

By admin | Updated: October 24, 2014 03:04 IST

अखंड चैतन्यमयी जगणे आपल्या वाट्याला यावे असे प्रत्येकालाच वाटते. दिवाळीचा हा सण या भावनेची जाणीव करून देणारा.

अखंड चैतन्यमयी जगणे आपल्या वाट्याला यावे असे प्रत्येकालाच वाटते. दिवाळीचा हा सण या भावनेची जाणीव करून देणारा. माजघरापासून दारावरचा प्रत्येक कोपरा न् कोपरा पणतीने उजळून निघतो आणि मनातल्या सांदीकोपऱ्यात दडलेल्या अंधारालाही दूर लोटल्याचा भास घडवून आणतो. दीपावलीचे हेच वैशिष्ट्य असल्याने सणांचा राजा म्हणून याकडे पाहिले जाते. बाहेर पेटलेल्या छोट्याशा दिव्याची ज्योत कुठेतरी खोल अंतमर्नात जागल्याची आठवण करून देते आणि हे आयुष्य दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जगावं, ही स्वाभाविक जाणीवही करून देते. दर वर्षी येणारी ही दिवाळी नवे काहीतरी शिकवून जातेच. हल्लीच्या शहरी कोलाहलात शिरशिऱ्या थंडीचा अनुभव देणारी दिवाळी हरवत चालली आहे. ही खंत असली तरी आनंदाची प्रक्रिया मात्र तशीच आहे. त्यामुळे कितीही व्यापारी वृत्ती या सणात घुसल्या तरी दिवाळीचा आनंद आजपावेतो कमी झालेला नाही. किंबहुना तो दर वर्षी वाढताना दिसतो आहे. यंदाची दिवाळी तशी उशिराच सुरू झाली. महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्याआधी सहा महिने केंद्रातील निवडणुका पार पडल्या. दोन्ही ठिकाणी मतदारांनी सत्तांतराच्या बाजूने कौल दिला. केंद्रात भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली. त्याच वेळी राज्यातही भाजपाचा विजयोत्सवी किल्ला बांधण्याचे काम सुरू आहे. मंत्रालयावरचा हा किल्ला बांधण्यासाठी शिवसेनेच्या मावळ्यांची गरज लागणार की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण यंदाची दिवाळी राज्यातही भाजपाचीच होती, हेही मतदारांनी स्पष्ट केले. सत्तांतराचा हा आनंद घेताना तो निर्भेळ नाही याची जाणीवही महाराष्ट्राने करून दिली आहे. एक प्रकारे ही विजयाची दिवाळी साजरी करताना वास्तवाचे भानही ठेवा, असा संदेश मराठी जनाने दिला. खरेतर प्रकाशाचे नाते हे थेट आत्म्याशी जोडले आहे, असे म्हणतात. त्यामुळे बाह्यरंगाच्या दीपोत्सवाबरोबरच अंतर्मनातल्या दिवाळीलाही तितकेच महत्त्व आहे. दिवाळीत आपण रांगोळ्यांनीही परिसर सजवितो. ठिपक्यांना जोडून जशी सुबक, सुंदर रांगोळी तयार होते, तशीच समाजाचीही रचना असते. माणसा-माणसांना जोडत मानवी साखळीची, सुहृदयांची एक अनोखी समाजरांगोळी तयार होते. माणसांना जोडण्याचा, त्यांना सोबत घेण्याचा आनंद प्रकाशाइतकाच अनोखा असतो. समाजातल्या सर्व घटकांना मग ते कुुुणी वंचित, अपंग, दुर्लक्षित अशा कितीतरी जणांना दिवाळीमुळे आपण मुख्य प्रवाहात आल्याचा आनंद होतो. अलीकडे काही सेलिब्रिटी कर्करुग्णांसोबत, अंधासोबत, वृद्धांसोबत दिवाळी साजरी करताना दाखविले जातात. त्यात प्रसिद्धीचा सोस असला तरी त्यानिमित्ताने वंचितवर्गाला काही क्षणांचा का होईना दिलासा मिळतो हेही तितकेच खरे. यंदा भारतीय शास्त्रज्ञांनी मंगळावर झेप घेत दिवाळीचा देशाभिमानाचा प्रकाशमयी आनंद याआधीच मिळवून दिला आहे. सर्वांत कमी खर्चात मंगळावर झेपावणारे पहिले यान भारतीयांनी तयार केले. त्यामुळे सातत्याने यशासाठी, प्रगतीसाठी अमेरिकेकडे रांग लावणाऱ्या तरुणांना ही बुद्धिमंतांची भूमी वाटायला लागली आहे. नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियाचीनमध्ये सीमेवर असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करीत नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पूरग्रस्त काश्मीरवासीयांसोबतही त्यांनी वेळ घालविला. सध्या पाकिस्तानी कुरापती वाढल्या असताना पंतप्रधानांची ही चाल सीमेवरील जवानांसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. राजकीयदृष्ट्या हे वर्ष वळणाचे ठरले. त्यामुळे नव्या वर्षाकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि असणारही. दिवाळी जरी वर्षातून एकदा येत असली तरी दररोज आपल्या आयुष्यात दिवाळी असावी, अशी स्वाभाविक इच्छा असते. दिव्यांची माळ तयार होताना त्याचा प्रकाश सर्वदूर पसरायला हवा व सर्वसमानतेची दिवाळी प्रत्येकाच्या वाट्याला यायला हवी. अशी धारणा बाळगायला हवी; तरच दिवाळी साजरी केल्याचे समाधान लाभेल. इसिस आणि इबोला ही अतिरेकी आणि अनारोग्याची संकटे यंदा मानवतेवर आली आहेत. यंदा दिवाळीच्या निमित्ताने जगभर सुख-समृद्धीची संवेदना व्यक्त करतानाच अशा संकटांपासून लवकर सुटका होऊ दे, अशी प्रार्थना करावी लागणार आहे. अतिरेकी संकटे वाढल्याने ऐन दिवाळीत चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या पोलिसांनाही सलाम ठोकला पाहिजे. आपण कुटुंबात दिवाळी साजरी करताना पोलीस असो वा सीमेवरचे जवान, त्यांची आठवण मनात साठवीत आनंद घ्यायला हवा. दीपावलीची शिकवणही तीच आहे. तोच आनंद, तेच परमार्थ, तेच सत्कर्म तोचि दिवाळी, दसरा... मनामनांतला, जनाजनांतला...